शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

दहावी, बारावी वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार? विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालकांना चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:21 IST

लातूर : कोरोनाच्या संकटामुळे शाळा- महाविद्यालये बंद होती. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइनचा उपक्रम राबविण्यात आला. आता प्रत्यक्ष ...

लातूर : कोरोनाच्या संकटामुळे शाळा- महाविद्यालये बंद होती. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइनचा उपक्रम राबविण्यात आला. आता प्रत्यक्ष नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण होतो की नाही, अशी पालक- विद्यार्थ्यांना चिंता आहे. आता परीक्षा तोंडावर आली आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल नसल्याने ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागले. आता शाळा सुरू झाल्या असून, जिल्ह्यात ४८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. आजमितीस दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्के तर बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्के झाला आहे. ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाते. आता परीक्षा महिना-दीड महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नाही. परीक्षेपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण होईल का, असा प्रश्न असल्याने, पालक, विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दहावीचा अभ्यासक्रम

शाळा सुरू होऊन दीड महिना होत आला आहे. अभ्यासक्रम २५ ते ३० टक्के पूर्ण झाला आहे. मोजक्याच धड्यावर विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांवर ताण येणार आहे. मार्च महिन्यापर्यंत दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण केला जाऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसल्याचे शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले.

बारावीचा अभ्यासक्रम

दहावीनंतर बारावीचे वर्ग जवळपास दोन आठवड्यांनंतर सुरू झाले. २० ते २५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. ऑनलाइनलाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे. सर्वसाधारण २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. तरीही उरलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तासिका घ्याव्या लागतील.

परीक्षा जवळ आल्या असल्याने अभ्यासक्रम लवकरात लवकर पूर्ण करावा. लाॅकडाऊन काळात अभ्यासावर भर दिला. मात्र, काही अडचणी आल्यास शिक्षकांना विचारण्यास शाळा सुरू नव्हत्या. आता शाळा सुरू असल्याने अभ्यासातील अडचणी दूर करण्यास मदत होत आहे.

- दहावीचा विद्यार्थी

महाविद्यालय उशिरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे वैयक्तिक अभ्यासावर अधिक भर दिला जात आहे. शिक्षकांचे मागर्गदर्शनही मिळत आहे. वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यास बोर्ड परीक्षेचा सराव करता येईल.

- बारावीचा विद्यार्थी