शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

दहावी, बारावी वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार? विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालकांना चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:21 IST

लातूर : कोरोनाच्या संकटामुळे शाळा- महाविद्यालये बंद होती. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइनचा उपक्रम राबविण्यात आला. आता प्रत्यक्ष ...

लातूर : कोरोनाच्या संकटामुळे शाळा- महाविद्यालये बंद होती. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइनचा उपक्रम राबविण्यात आला. आता प्रत्यक्ष नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण होतो की नाही, अशी पालक- विद्यार्थ्यांना चिंता आहे. आता परीक्षा तोंडावर आली आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल नसल्याने ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागले. आता शाळा सुरू झाल्या असून, जिल्ह्यात ४८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. आजमितीस दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्के तर बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्के झाला आहे. ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाते. आता परीक्षा महिना-दीड महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नाही. परीक्षेपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण होईल का, असा प्रश्न असल्याने, पालक, विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दहावीचा अभ्यासक्रम

शाळा सुरू होऊन दीड महिना होत आला आहे. अभ्यासक्रम २५ ते ३० टक्के पूर्ण झाला आहे. मोजक्याच धड्यावर विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांवर ताण येणार आहे. मार्च महिन्यापर्यंत दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण केला जाऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसल्याचे शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले.

बारावीचा अभ्यासक्रम

दहावीनंतर बारावीचे वर्ग जवळपास दोन आठवड्यांनंतर सुरू झाले. २० ते २५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. ऑनलाइनलाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे. सर्वसाधारण २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. तरीही उरलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तासिका घ्याव्या लागतील.

परीक्षा जवळ आल्या असल्याने अभ्यासक्रम लवकरात लवकर पूर्ण करावा. लाॅकडाऊन काळात अभ्यासावर भर दिला. मात्र, काही अडचणी आल्यास शिक्षकांना विचारण्यास शाळा सुरू नव्हत्या. आता शाळा सुरू असल्याने अभ्यासातील अडचणी दूर करण्यास मदत होत आहे.

- दहावीचा विद्यार्थी

महाविद्यालय उशिरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे वैयक्तिक अभ्यासावर अधिक भर दिला जात आहे. शिक्षकांचे मागर्गदर्शनही मिळत आहे. वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यास बोर्ड परीक्षेचा सराव करता येईल.

- बारावीचा विद्यार्थी