शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या काळात तरी ‘स्पेशल’ तिकीट कसे परवडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST

सध्याला रेल्वे माेठ्या संख्येने सुरू झाल्या असल्या तरी अजूनही त्या स्पेशल नावानेच धावत आहेत. यातून अधिकचे भाडे आकारले जात ...

सध्याला रेल्वे माेठ्या संख्येने सुरू झाल्या असल्या तरी अजूनही त्या स्पेशल नावानेच धावत आहेत. यातून अधिकचे भाडे आकारले जात आहे. त्याचवेळी जनरल डबे असूनही ‘लाॅक’ आहेत. यातून सर्वसामान्य प्रवाशांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. लातूर रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या मिरज ते परळी वैजनाथ आणि पंढरपूर ते निजामाबाद रेल्वे गत दीड वर्षापासून बंदच आहे. केवळ सात एक्स्प्रेस रेल्वे लातूर येथून सुसाट आहेत. या रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ग्रामीण भागातील प्रवाशांना या रेल्वेतून प्रवास करणे अशक्य आहे. कारण या रेल्वेला ग्रामीण भागातील रेल्वे स्थानकावर थांबा नाही. लातूर राेड, लातूर, उदगीर येथील रेल्वेस्थानकावरच या एक्स्प्रेस रेल्वे थांबत आहेत.

दुप्पट प्रवासभाडे किती दिवस सहन करणार...

मार्च २०२० पासून पॅसेंजर रेल्वेसेवा बंद आहे. आता टप्प्या-टप्प्याने सुरू झालेल्या रेल्वेगाड्यात सर्वच रेल्वे या एक्स्प्रेस आणि स्पेशल रेल्वेचा समावेश आहे. अशा स्थितीत सामान्य प्रवाशांना प्रवास करणे अशक्य आहे. स्पेशल आणि एक्स्प्रेसचे दुप्पट प्रवासभाडे किती दिवस सहन करणार, असा प्रश्न प्रवाशांतून विचारला जात आहे.

ग्रामीण भागातील सामान्य प्रवाशांच्या साेयीसाठी रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वेसेवा सुरू करण्याची गरज आहे. हा प्रवास खेड्या-पाड्यातील प्रवाशांसाठी साेयीचा आहे.

जनरल डबे कधी ‘अनलाॅक’ हाेणार...

रेल्वे विभागाच्या वतीने लातूर जिल्ह्यातून सुरू करण्यात आलेल्या सात एक्स्प्रेस रेल्वेचे जनरल डबे लाॅकच आहेत. हे डबे अनलाॅक कधी हाेणार, असा प्रश्न सामान्य प्रवाशांतून उपस्थित केला आहे. हे डबे गत दीड वर्षापासून लाॅक आहेत. आता पॅसेंजर रेल्वे सुरू झाल्या तरच खेड्या-पाड्यातील सामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

‘स्पेशल’ भाडे कसे परवडणार?

रेल्वे विभागाने सध्या सुरू केलेल्या रेल्वेगाड्यामध्ये सर्वच एक्स्प्रेस आहेत. परिणामी, एक्स्प्रेसचे प्रवास भाडे सामान्यांना परवडणारे नाही. यासाठी पॅसेंजर रेल्वेसेवा सुरू करण्याची गरज आहे. तरच ग्रामीण भागातील प्रवाशांची हेळसांड थांबवणार आहे.

- अंगद मुळे, उदगीर

सणासुदीच्या दिवसांत सुरू असलेल्या एक्स्प्रेस रेल्वेला माेठ्या प्रमाणावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या स्पेशल आणि एक्स्प्रेस रेल्वे सामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. एकतर त्या छाेट्या-छाेट्या रेल्वे स्थानकांवर थांबत नाहीत. या रेल्वेने प्रवास करायचा म्हटल्यावर उदगीर, लातूर राेड आणि लातूर येथील रेल्वे स्थानकांचा वापर करावा लागताे.

- पुंडलिक सूर्यवंशी, लातूर