शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
3
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
4
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
7
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
8
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
9
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
10
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
11
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
12
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
13
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
14
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
15
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
16
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
17
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
18
Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
19
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
20
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

सणासुदीच्या काळात तरी ‘स्पेशल’ तिकीट कसे परवडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST

सध्याला रेल्वे माेठ्या संख्येने सुरू झाल्या असल्या तरी अजूनही त्या स्पेशल नावानेच धावत आहेत. यातून अधिकचे भाडे आकारले जात ...

सध्याला रेल्वे माेठ्या संख्येने सुरू झाल्या असल्या तरी अजूनही त्या स्पेशल नावानेच धावत आहेत. यातून अधिकचे भाडे आकारले जात आहे. त्याचवेळी जनरल डबे असूनही ‘लाॅक’ आहेत. यातून सर्वसामान्य प्रवाशांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. लातूर रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या मिरज ते परळी वैजनाथ आणि पंढरपूर ते निजामाबाद रेल्वे गत दीड वर्षापासून बंदच आहे. केवळ सात एक्स्प्रेस रेल्वे लातूर येथून सुसाट आहेत. या रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ग्रामीण भागातील प्रवाशांना या रेल्वेतून प्रवास करणे अशक्य आहे. कारण या रेल्वेला ग्रामीण भागातील रेल्वे स्थानकावर थांबा नाही. लातूर राेड, लातूर, उदगीर येथील रेल्वेस्थानकावरच या एक्स्प्रेस रेल्वे थांबत आहेत.

दुप्पट प्रवासभाडे किती दिवस सहन करणार...

मार्च २०२० पासून पॅसेंजर रेल्वेसेवा बंद आहे. आता टप्प्या-टप्प्याने सुरू झालेल्या रेल्वेगाड्यात सर्वच रेल्वे या एक्स्प्रेस आणि स्पेशल रेल्वेचा समावेश आहे. अशा स्थितीत सामान्य प्रवाशांना प्रवास करणे अशक्य आहे. स्पेशल आणि एक्स्प्रेसचे दुप्पट प्रवासभाडे किती दिवस सहन करणार, असा प्रश्न प्रवाशांतून विचारला जात आहे.

ग्रामीण भागातील सामान्य प्रवाशांच्या साेयीसाठी रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वेसेवा सुरू करण्याची गरज आहे. हा प्रवास खेड्या-पाड्यातील प्रवाशांसाठी साेयीचा आहे.

जनरल डबे कधी ‘अनलाॅक’ हाेणार...

रेल्वे विभागाच्या वतीने लातूर जिल्ह्यातून सुरू करण्यात आलेल्या सात एक्स्प्रेस रेल्वेचे जनरल डबे लाॅकच आहेत. हे डबे अनलाॅक कधी हाेणार, असा प्रश्न सामान्य प्रवाशांतून उपस्थित केला आहे. हे डबे गत दीड वर्षापासून लाॅक आहेत. आता पॅसेंजर रेल्वे सुरू झाल्या तरच खेड्या-पाड्यातील सामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

‘स्पेशल’ भाडे कसे परवडणार?

रेल्वे विभागाने सध्या सुरू केलेल्या रेल्वेगाड्यामध्ये सर्वच एक्स्प्रेस आहेत. परिणामी, एक्स्प्रेसचे प्रवास भाडे सामान्यांना परवडणारे नाही. यासाठी पॅसेंजर रेल्वेसेवा सुरू करण्याची गरज आहे. तरच ग्रामीण भागातील प्रवाशांची हेळसांड थांबवणार आहे.

- अंगद मुळे, उदगीर

सणासुदीच्या दिवसांत सुरू असलेल्या एक्स्प्रेस रेल्वेला माेठ्या प्रमाणावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या स्पेशल आणि एक्स्प्रेस रेल्वे सामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. एकतर त्या छाेट्या-छाेट्या रेल्वे स्थानकांवर थांबत नाहीत. या रेल्वेने प्रवास करायचा म्हटल्यावर उदगीर, लातूर राेड आणि लातूर येथील रेल्वे स्थानकांचा वापर करावा लागताे.

- पुंडलिक सूर्यवंशी, लातूर