शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलबंदीने महिलांची भाजी भाकरी थांबली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:19 IST

लातूर : शहर व जिल्ह्यात हाॅटेल, फॅमिली रेस्टाॅरंट आणि बिअर बार, हाॅटेलचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. मात्र, कोरोनाच्या ...

लातूर : शहर व जिल्ह्यात हाॅटेल, फॅमिली रेस्टाॅरंट आणि बिअर बार, हाॅटेलचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे या व्यवसायावर मोठी संक्रांत आली आहे. परिणामी व्यवसाय थांबल्याने हाॅटेलमध्ये भाजी-भाकरी आणि पोळी करणाऱ्या महिलांचीच भाकर कोरोनाने हिसकावून घेतली आहे.

लातूर शहरात जवळपास ३५० च्या वर हाॅटेल्स आहेत. शहरात खवय्यै आणि शौकिन असल्याने हाॅटेल व्यवसाय तेजीत होता. शिवाय, लातूर शहर हे शैक्षणिक हब आहे. त्यामुळे या शहरामध्ये शिक्षणासाठी बाहेरगावाहून हजारो विद्यार्थी येतात. २०२० पर्यंत पुण्या-मुंबईची मुलं शहरात शिक्षणासाठी वास्तव्याला होती. त्यामुळे हाॅटेल, मेस हा व्यवसाय तेजीत होता. अचानक कोरोना आल्याने गेल्या वर्षभरापासून हा व्यवसाय मोडकळीस आला आहे. मेस बंद झाल्या आहेत. तर काही मोठ्या हाॅटेल्समधून पार्सल सेवा सुरू आहेत. त्यात काही मोजक्या महिलांनाच भाजी-भाकरी करण्याचे काम आहे. अन्य महिलांना आता काम नाही. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पार्सल सेवा सुरू असली तरी ग्राहक कमी झाला आहे. शिवाय, पुण्या-मुंबईहून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या मेसही आता नाहीत. त्यामुळे या ठिकाणी पोळी-भाजी करणाऱ्या महिलांचा रोजगार बंद झाला आहे. परिणामी, या महिलांची भाजी-भाकरीच करपून गेली आहे. वर्ष उलटून गेले, आता किती दिवस कोरोना उपाशी ठेवणार, असा प्रश्न या व्यवसायातील महिलांना पडला आहे.

उसनवारीवर काढले वर्ष; आता कसे जगायचे..!

मागील वर्षी लाॅकडाऊन झाल्यामुळे मार्च महिन्यातच लातुरात शिक्षणाला आलेली मुलं त्यांच्या गावी परतली. त्यामुळे खानावळीचा व्यवसाय बंद झाला. त्यानंतर उसनवारीवर दिवस काढले, आता पुढे कसे जगावे, असा प्रश्न आहे. मजुरीला जावे तर तेही बंद आहे, अशा भावना या भाजी-भाकरी करणाऱ्या महिलांनी व्यक्त केल्या.

गेल्या काही महिन्यांपासून हाॅटेलमध्ये भाजी-भाकरी करण्याचे काम मिळाले होते; परंतु गेल्या दोन दिवसांपासून ते बंद झाले आहे, असे शोभा गायकवाड म्हणाल्या. उसनवारीवर काढले वर्ष; आता कसे जगायचे..!

मागील वर्षी लाॅकडाऊन झाल्यामुळे मार्च महिन्यातच लातुरात शिक्षणाला आलेली मुलं त्यांच्या गावी परतली. त्यामुळे खानावळीचा व्यवसाय बंद झाला. त्यानंतर उसनवारीवर दिवस काढले, आता पुढे कसे जगावे, असा प्रश्न आहे. मजुरीला जावे तर तेही बंद आहे, अशा भावना या भाजी-भाकरी करणाऱ्या महिलांनी व्यक्त केल्या.

गेल्या काही महिन्यांपासून हाॅटेलमध्ये भाजी-भाकरी करण्याचे काम मिळाले होते; परंतु गेल्या दोन दिवसांपासून ते बंद झाले आहे, असे शोभा गायकवाड म्हणाल्या.