शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

हॉटेलबंदीने महिलांची भाजी भाकरी थांबली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:19 IST

लातूर : शहर व जिल्ह्यात हाॅटेल, फॅमिली रेस्टाॅरंट आणि बिअर बार, हाॅटेलचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. मात्र, कोरोनाच्या ...

लातूर : शहर व जिल्ह्यात हाॅटेल, फॅमिली रेस्टाॅरंट आणि बिअर बार, हाॅटेलचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे या व्यवसायावर मोठी संक्रांत आली आहे. परिणामी व्यवसाय थांबल्याने हाॅटेलमध्ये भाजी-भाकरी आणि पोळी करणाऱ्या महिलांचीच भाकर कोरोनाने हिसकावून घेतली आहे.

लातूर शहरात जवळपास ३५० च्या वर हाॅटेल्स आहेत. शहरात खवय्यै आणि शौकिन असल्याने हाॅटेल व्यवसाय तेजीत होता. शिवाय, लातूर शहर हे शैक्षणिक हब आहे. त्यामुळे या शहरामध्ये शिक्षणासाठी बाहेरगावाहून हजारो विद्यार्थी येतात. २०२० पर्यंत पुण्या-मुंबईची मुलं शहरात शिक्षणासाठी वास्तव्याला होती. त्यामुळे हाॅटेल, मेस हा व्यवसाय तेजीत होता. अचानक कोरोना आल्याने गेल्या वर्षभरापासून हा व्यवसाय मोडकळीस आला आहे. मेस बंद झाल्या आहेत. तर काही मोठ्या हाॅटेल्समधून पार्सल सेवा सुरू आहेत. त्यात काही मोजक्या महिलांनाच भाजी-भाकरी करण्याचे काम आहे. अन्य महिलांना आता काम नाही. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पार्सल सेवा सुरू असली तरी ग्राहक कमी झाला आहे. शिवाय, पुण्या-मुंबईहून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या मेसही आता नाहीत. त्यामुळे या ठिकाणी पोळी-भाजी करणाऱ्या महिलांचा रोजगार बंद झाला आहे. परिणामी, या महिलांची भाजी-भाकरीच करपून गेली आहे. वर्ष उलटून गेले, आता किती दिवस कोरोना उपाशी ठेवणार, असा प्रश्न या व्यवसायातील महिलांना पडला आहे.

उसनवारीवर काढले वर्ष; आता कसे जगायचे..!

मागील वर्षी लाॅकडाऊन झाल्यामुळे मार्च महिन्यातच लातुरात शिक्षणाला आलेली मुलं त्यांच्या गावी परतली. त्यामुळे खानावळीचा व्यवसाय बंद झाला. त्यानंतर उसनवारीवर दिवस काढले, आता पुढे कसे जगावे, असा प्रश्न आहे. मजुरीला जावे तर तेही बंद आहे, अशा भावना या भाजी-भाकरी करणाऱ्या महिलांनी व्यक्त केल्या.

गेल्या काही महिन्यांपासून हाॅटेलमध्ये भाजी-भाकरी करण्याचे काम मिळाले होते; परंतु गेल्या दोन दिवसांपासून ते बंद झाले आहे, असे शोभा गायकवाड म्हणाल्या. उसनवारीवर काढले वर्ष; आता कसे जगायचे..!

मागील वर्षी लाॅकडाऊन झाल्यामुळे मार्च महिन्यातच लातुरात शिक्षणाला आलेली मुलं त्यांच्या गावी परतली. त्यामुळे खानावळीचा व्यवसाय बंद झाला. त्यानंतर उसनवारीवर दिवस काढले, आता पुढे कसे जगावे, असा प्रश्न आहे. मजुरीला जावे तर तेही बंद आहे, अशा भावना या भाजी-भाकरी करणाऱ्या महिलांनी व्यक्त केल्या.

गेल्या काही महिन्यांपासून हाॅटेलमध्ये भाजी-भाकरी करण्याचे काम मिळाले होते; परंतु गेल्या दोन दिवसांपासून ते बंद झाले आहे, असे शोभा गायकवाड म्हणाल्या.