शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

गृहखाते मुख्यमंत्र्यांना पेलवेत नाही : विखे-पाटील

By admin | Updated: September 9, 2016 20:15 IST

राज्यात पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. बदनापूरच्या पोलिस निरीक्षक विद्यानंद काळेंना भाजपाचा आमदार धमकावतो. सेनेचे कार्यकर्ते राजरोसपणे पोलिसांना मारतात.

ऑनलाइन लोकमत 
लातूर, दि. ९ -  राज्यात पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. बदनापूरच्या पोलिस निरीक्षक विद्यानंद काळेंना भाजपाचा आमदार धमकावतो. सेनेचे कार्यकर्ते राजरोसपणे पोलिसांना मारतात. मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच पोलिसांवर हल्ला होतो. हे वाढते हल्ले पाहता गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पेलवत नाही हेच सिध्द होते, अशी टिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे लातुरात केली. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भेटीसाठी लातूर येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. 
ते पुढे बोलताना म्हणाले की, सत्ताधारीच पोलिसांवर तुटून पडत आहेत हे गंभीर आहे. शिवसेना सरकारला सत्तेत राहून विरोध करते. त्यांची ही नौटंकी आहे. सरकारवर टिका करण्यापेक्षा तुम्ही सरकारमधून बाहेर पडा. 
जलयुक्त शिवार ही आमच्या महात्मा फुले जलभूमी अभियानची कॉपी !
जलयुक्त शिवार योजना ही या सरकारची नाही. आमच्या सरकारने महात्मा फुले जलभूमी अभियान राबविले. त्याची या सरकारने कॉपी केली. मूळ कल्पना आमची. या सरकारने शब्द बदलून लोकांपुढे आणली आहे. राज्यातील सर्वात मोठे खोरे गोदावरी खोरे आहे. त्याची मजबुती होणे आवश्यक आहे. त्यासाठी सह्याद्री आणि ठाणे-मुंबईला पडणारे पावसाचे समुद्राला मिळते. ते पाणी बोगद्याचे सहाय्याने कृष्णा - गोदावरीच्या खोºयात सोडल्यास राज्याचा पाणीप्रश्न निकाली  निघणार आहे. यासाठी बोगदेच हवेत. जम्मू-कश्मीरमध्ये अनेक रस्ते बोगद्यातून गेले आहेत. लोणावळामार्गे मुंबईला जाणारा एक रस्ता ४० किमी बोगद्यातून जातो. पाणी आणायला अडचण काय आहे ? असा सवालही त्यांनी केला. लातूर जिल्ह्याची पाण्याची स्थिती चांगली नाही. यासाठी उजनीतून सीना कोळेगाव येथून पाणी पाईपलाईनने मांजरा धरणात सोडावे, अशी मागणीही त्यांनी केली. यासाठी आवश्यक त्या ठिकाणी लिफ्टींग झाले तरी पाणी द्या. कारवण टेंभू, म्हैसमाळ  या योजना लिफ्टींगनेच पूर्ण झाल्या आहेत. तिकडे होते मग मराठवाड्यासाठी का नाही ? असा सवालही त्यांनी केला. 
शिवराज पाटील चाकूरकरांशी विखे - पाटील यांची तीन तास  चर्चा 
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे कोणत्याही कार्यक्रमाशिवाय लातूरला आले होते. त्यांनी माझा हा दौरा खासगी असल्याचे सांगितले. या दौºयाला काहीही विषय नसून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची भेट घ्यायची होती. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठीच मी लातूरला आल्याचे ते म्हणाले. या भेटीत त्यांनी शिवराज पाटील चाकूरकरांशी मनसोक्त चर्चा केली. तब्बल तीन तास ही चर्चा चालू होती. नेमकी चर्चा काय झाली याचा तपशील काही मिळू शकला नाही. परंतु या चर्चेकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मात्र कान लागले होते.