शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

गृहखाते मुख्यमंत्र्यांना पेलवेत नाही : विखे-पाटील

By admin | Updated: September 9, 2016 20:15 IST

राज्यात पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. बदनापूरच्या पोलिस निरीक्षक विद्यानंद काळेंना भाजपाचा आमदार धमकावतो. सेनेचे कार्यकर्ते राजरोसपणे पोलिसांना मारतात.

ऑनलाइन लोकमत 
लातूर, दि. ९ -  राज्यात पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. बदनापूरच्या पोलिस निरीक्षक विद्यानंद काळेंना भाजपाचा आमदार धमकावतो. सेनेचे कार्यकर्ते राजरोसपणे पोलिसांना मारतात. मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच पोलिसांवर हल्ला होतो. हे वाढते हल्ले पाहता गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पेलवत नाही हेच सिध्द होते, अशी टिका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे लातुरात केली. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भेटीसाठी लातूर येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. 
ते पुढे बोलताना म्हणाले की, सत्ताधारीच पोलिसांवर तुटून पडत आहेत हे गंभीर आहे. शिवसेना सरकारला सत्तेत राहून विरोध करते. त्यांची ही नौटंकी आहे. सरकारवर टिका करण्यापेक्षा तुम्ही सरकारमधून बाहेर पडा. 
जलयुक्त शिवार ही आमच्या महात्मा फुले जलभूमी अभियानची कॉपी !
जलयुक्त शिवार योजना ही या सरकारची नाही. आमच्या सरकारने महात्मा फुले जलभूमी अभियान राबविले. त्याची या सरकारने कॉपी केली. मूळ कल्पना आमची. या सरकारने शब्द बदलून लोकांपुढे आणली आहे. राज्यातील सर्वात मोठे खोरे गोदावरी खोरे आहे. त्याची मजबुती होणे आवश्यक आहे. त्यासाठी सह्याद्री आणि ठाणे-मुंबईला पडणारे पावसाचे समुद्राला मिळते. ते पाणी बोगद्याचे सहाय्याने कृष्णा - गोदावरीच्या खोºयात सोडल्यास राज्याचा पाणीप्रश्न निकाली  निघणार आहे. यासाठी बोगदेच हवेत. जम्मू-कश्मीरमध्ये अनेक रस्ते बोगद्यातून गेले आहेत. लोणावळामार्गे मुंबईला जाणारा एक रस्ता ४० किमी बोगद्यातून जातो. पाणी आणायला अडचण काय आहे ? असा सवालही त्यांनी केला. लातूर जिल्ह्याची पाण्याची स्थिती चांगली नाही. यासाठी उजनीतून सीना कोळेगाव येथून पाणी पाईपलाईनने मांजरा धरणात सोडावे, अशी मागणीही त्यांनी केली. यासाठी आवश्यक त्या ठिकाणी लिफ्टींग झाले तरी पाणी द्या. कारवण टेंभू, म्हैसमाळ  या योजना लिफ्टींगनेच पूर्ण झाल्या आहेत. तिकडे होते मग मराठवाड्यासाठी का नाही ? असा सवालही त्यांनी केला. 
शिवराज पाटील चाकूरकरांशी विखे - पाटील यांची तीन तास  चर्चा 
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे कोणत्याही कार्यक्रमाशिवाय लातूरला आले होते. त्यांनी माझा हा दौरा खासगी असल्याचे सांगितले. या दौºयाला काहीही विषय नसून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची भेट घ्यायची होती. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठीच मी लातूरला आल्याचे ते म्हणाले. या भेटीत त्यांनी शिवराज पाटील चाकूरकरांशी मनसोक्त चर्चा केली. तब्बल तीन तास ही चर्चा चालू होती. नेमकी चर्चा काय झाली याचा तपशील काही मिळू शकला नाही. परंतु या चर्चेकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मात्र कान लागले होते.