शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

चारचाकीची दुचाकीला धडक; एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:18 IST

बनीम का जाळलास म्हणून मारहाण लातूर : गेल्या वर्षी सोयाबीनची बनीम जाळल्याच्या कारणावरून संगनमत करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना ...

बनीम का जाळलास म्हणून मारहाण

लातूर : गेल्या वर्षी सोयाबीनची बनीम जाळल्याच्या कारणावरून संगनमत करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शिरूर अनंतपाळ तालुक्यातील वळसांगवी येथे १३ मार्च रोजी घडली. याप्रकरणी फिर्यादी दशरथ रंगराव बिरादार यांच्या तक्रारीवरून कालिदास भीमराव बिरादार व सोबत असलेल्या दोघांविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वामी करीत आहेत.

खाडगाव परिसरात मोकळ्या प्लॉटवर कचरा

लातूर : शहरातील खाडगाव परिसरात मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमित घंटागाडी येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. घंटागाडी येत नसल्याने रस्त्याच्या कडेला, मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात शहर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने नियमित घंटागाडी सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.

उड्डाणपुलाच्या भिंतीची रंगरंगोटी मोहीम

लातूर : शहरातील उड्डाण पुलाच्या रंगरंगोटीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वच्छ शहर सुंदर शहर या उपक्रमांतर्गत आकर्षक रंगरंगोटी केली जात आहे. विविध प्रकारचे संदेश देणारी चित्र रेखाटली जात असून, वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत आहे. आतापर्यंत अर्धे काम पूर्ण झाले असून, लवकरच संपूर्ण रंगरंगोटी पूर्ण केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

शहरातील बाजारात भाजीपाल्याची आवक

लातूर : शहरातील भाजीपाला बाजारात शेतमालाची आवक वाढली आहे. दररोज सायंकाळच्या वेळी ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी दाखल होत आहे. आवक वाढली असल्याने दरही स्थिर आहेत. यासोबतच उन्हाचा पारा वाढत असल्याने रसाळ फळांना मागणी होत आहे. टरबूज, द्राक्ष, सफरचंद, मोसंबी, संत्री आदी फळांना ग्राहकांची पसंती आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत व्यवहार पार पाडले जात आहेत.

शहरात रात्रीच्या वेळी वाहनांची तपासणी

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात रात्री ८ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी पुकारण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील बार्शी रोड, रेणापूर नाका, औसा रोड, नांदेड नाका आदी भागात वाहनांच्या तपासणीसाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.