शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

अहमदपूरला हेलिकॉप्टर मागविले

By admin | Updated: October 1, 2016 21:22 IST

अतिवृष्टी झाल्याने अहमदपुरातील मन्याड व झराडी तसेच रेणापुरातील रेणा नदीस शनिवारी पूर आला आहे.

ऑनलाइन लोकमत
अहमदपूर / रेणापूर, दि. १ -  अतिवृष्टी झाल्याने अहमदपुरातील मन्याड व झराडी तसेच रेणापुरातील रेणा नदीस शनिवारी पूर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे मावलगाव (ता. अहमदपूर) चे १० तर कामखेड्यातील २१ शेतकरी अडकले आहेत. दरम्यान, मावलगावच्या शेतक-यांना पुराबाहेर काढण्यासाठी प्रशासनाने सायंकाळी हेलिकॉप्टर मागविले आहे. 
 
अहमदपूर तालुक्यातील मन्याड व झराडी या दोन नद्यांचा संगम तांबटसांगवी येथे होतो. या संगमावर मावलगाव येथील शेतकरी शेतातच राहतात. शनिवारी या दोन्ही नद्यांना पूर आल्याने त्यात बालासाहेब भदाडे, विजय भदाडे, भाग्यश्री भदाडे, शाम भदाडे, गुलाब शेख, मन्नाबाई शेख, कौसर रईस शेख, चिंगू रईस शेख, अस्लम शेख, असद शेख हे अडकले आहेत. पुराच्या पाण्यामुळे काहीजण घराच्या छतावर तर काही जण झाडावर बसले आहेत. 
 
दरम्यान, पुरात अडकलेल्या या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांना पाचारण केले होते. त्यांनी बोटीद्वारे या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, ऐनवेळी बोटीमध्ये बिघाड झाल्याने हा प्रयत्न फसला. त्यामुळे सायंकाळी मदतीसाठी हेलिकॉप्टरची मागणी प्रशासनाने केली आहे. तसेच एन.डी.आर.एस. जवानांनाही बोलाविण्यात आले आहे. 
रात्री ७.२० वाजेपर्यंत हे जवान पोहोचले नव्हते. घटनास्थळाकडे अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदेकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे, तहसीलदार प्रवीण मेंगशेट्टे यांनी धाव घेऊन पाहणी केली आहे. 
 
रेणापूर तालुक्यातील रेणा नदीस पूर आल्याने नदीपात्राशेजारी असलेल्या कामखेडा गावातील २१ नागरिक पाण्यात अडकले आहेत. त्यामुळे ते घरावरील पत्र्यावर बसले आहेत. 
 
हेलिकॉप्टर, एनडीआरएसच्या जवानांना पाचारण
पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने बीदर येथून हेलिकॉप्टर व एनडीआरएसच्या जवानांना बोलाविण्यात आले आहे. लवकरच हे नागरिक सुखरुप बाहेर पडतील, असा विश्वास तहसीलदार प्रवीण मेंगशेट्टे यांनी व्यक्त केला. 
 
साडेचार तासानंतर सुटका... 
चाकूर तालुक्यातील उकाचीवाडी परिसरातून वाहणा-या नदीला पूर आल्याने गावातील पाच तरुण अडकले होते. दरम्यान, एका झाडाचा आश्रय घेत तब्बल साडेचार तास थांबले. पाणी ओसरताच ते सुखरुप बाहेर आले आहेत.