शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

अहमदपूरला हेलिकॉप्टर मागविले

By admin | Updated: October 1, 2016 21:22 IST

अतिवृष्टी झाल्याने अहमदपुरातील मन्याड व झराडी तसेच रेणापुरातील रेणा नदीस शनिवारी पूर आला आहे.

ऑनलाइन लोकमत
अहमदपूर / रेणापूर, दि. १ -  अतिवृष्टी झाल्याने अहमदपुरातील मन्याड व झराडी तसेच रेणापुरातील रेणा नदीस शनिवारी पूर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे मावलगाव (ता. अहमदपूर) चे १० तर कामखेड्यातील २१ शेतकरी अडकले आहेत. दरम्यान, मावलगावच्या शेतक-यांना पुराबाहेर काढण्यासाठी प्रशासनाने सायंकाळी हेलिकॉप्टर मागविले आहे. 
 
अहमदपूर तालुक्यातील मन्याड व झराडी या दोन नद्यांचा संगम तांबटसांगवी येथे होतो. या संगमावर मावलगाव येथील शेतकरी शेतातच राहतात. शनिवारी या दोन्ही नद्यांना पूर आल्याने त्यात बालासाहेब भदाडे, विजय भदाडे, भाग्यश्री भदाडे, शाम भदाडे, गुलाब शेख, मन्नाबाई शेख, कौसर रईस शेख, चिंगू रईस शेख, अस्लम शेख, असद शेख हे अडकले आहेत. पुराच्या पाण्यामुळे काहीजण घराच्या छतावर तर काही जण झाडावर बसले आहेत. 
 
दरम्यान, पुरात अडकलेल्या या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांना पाचारण केले होते. त्यांनी बोटीद्वारे या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, ऐनवेळी बोटीमध्ये बिघाड झाल्याने हा प्रयत्न फसला. त्यामुळे सायंकाळी मदतीसाठी हेलिकॉप्टरची मागणी प्रशासनाने केली आहे. तसेच एन.डी.आर.एस. जवानांनाही बोलाविण्यात आले आहे. 
रात्री ७.२० वाजेपर्यंत हे जवान पोहोचले नव्हते. घटनास्थळाकडे अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदेकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे, तहसीलदार प्रवीण मेंगशेट्टे यांनी धाव घेऊन पाहणी केली आहे. 
 
रेणापूर तालुक्यातील रेणा नदीस पूर आल्याने नदीपात्राशेजारी असलेल्या कामखेडा गावातील २१ नागरिक पाण्यात अडकले आहेत. त्यामुळे ते घरावरील पत्र्यावर बसले आहेत. 
 
हेलिकॉप्टर, एनडीआरएसच्या जवानांना पाचारण
पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने बीदर येथून हेलिकॉप्टर व एनडीआरएसच्या जवानांना बोलाविण्यात आले आहे. लवकरच हे नागरिक सुखरुप बाहेर पडतील, असा विश्वास तहसीलदार प्रवीण मेंगशेट्टे यांनी व्यक्त केला. 
 
साडेचार तासानंतर सुटका... 
चाकूर तालुक्यातील उकाचीवाडी परिसरातून वाहणा-या नदीला पूर आल्याने गावातील पाच तरुण अडकले होते. दरम्यान, एका झाडाचा आश्रय घेत तब्बल साडेचार तास थांबले. पाणी ओसरताच ते सुखरुप बाहेर आले आहेत.