शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
4
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
5
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
6
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
7
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
8
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
9
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
10
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
12
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
13
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
14
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
15
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
16
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
17
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
18
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
19
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
20
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Daily Top 2Weekly Top 5

हरंगुळ ते पुणे रेल्वेसेवा मंगळवारपासून सुरू होणार

By आशपाक पठाण | Updated: October 6, 2023 21:28 IST

विशेष रेल्वे तीन महिने धावणार: दररोज दुपारी ३ वाजता निघणार पुण्याला.

आशपाक पठाण, लातूर : मागील अनेक दिवसांपासून मागणी असलेली हरंगुळ (लातूर) ते पुणे रेल्वेसेवा मंगळवार १० ऑक्टोबरपासून दैनंदिन सुरू होत आहे. मात्र, लातूर रेल्वेस्टेशनऐवजी ही गाडी हरंगुळ स्थानकातून सुटणार आहे. यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. दररोज दुपारी ३ वाजता हरंगुळ येथून निघणारी ही रेल्वे पुण्यात ९ वाजता पाेहचणार आहे.

मुंबईहून येणाऱ्या लातूर रेल्वेत अनेकदा पुण्याच्या प्रवाशांना जागा मिळत नव्हती. त्यामुळे स्थानकातून मध्यरात्रीच्या वेळी प्रवाशांना परत जावे लागत होते. आता मुंबईहून येणाऱ्या रेल्वेत जागा नाही मिळाली सकाळी पुण्याहून लातूरपर्यंतच्या प्रवाशांची नव्या रेल्वेमुळे सोय होणार आहे. पुणे येथून दररोज सकाळी ६.१० वाजता हरंगुळसाठी रेल्वे निघणार आहे. दुपारी १२.५० वाजता ही गाडी हरंगुळला येईल. येथील स्थानकात जवळपास दोन तास थांबल्यावर पुन्हा परतीच्या प्रवासाला निघणार आहे. पुण्यासाठी दुपारी ३ वाजता येथून ही रेल्वे निघणार आहे. पुणे स्टेशन येथे रात्री ९ वाजता पोहचणार आहे.

१५ डब्याची रेल्वे, इथे आहे थांबा...

हरंगुळ- पुणे ही रेल्वे १५ डब्याची आहे. त्यामुळे जवळपास एक हजार ते बाराशे प्रवासी सहजपणे प्रवास करू शकतील. हडपसार, उरूळी, केडगाव, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, बार्शी, धाराशिव आदी स्थानकावर थांबेल. ८ ऑक्टोबरपासून बुकींग सुविधा सुरू होणार आहे.

प्रवाशांची चांगली सोय झाली...

पुणे ते हरंगुळ ही विशेष रेल्वे १० ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. मुंबई-लातूर रेल्वेत जागा न मिळणाऱ्या प्रवाशांना ही रेल्वे फायद्याची ठरणार आहे. दिवसा सुविधा असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी हा प्रवास सुखकर होईल. - मोतीलाल डोईजोडे. सदस्य, दक्षिण मध्य रेल्वे सल्लागार समिती.

लातूर स्टेशनवर यायला हवी...

पुणे हरंगुळ ही नविन विशेष रेल्वे सेवा सुरू होणार आहे. पण ती गाडी दीड तास हरंगुळ स्टेशनवर उभी राहणार आहे. पुढे लातूरला येणार नाही, हे चुकीचे आहे. लातूरच्या स्टेशनवर आल्या प्रवाशांची सोय होईल. रेल्वे बाेर्डाने यावर त्वरीत निर्णय घ्यावा. - शिवाजी नरहरे, दक्षिण मराठवाडा रेल्वे संघर्ष समिती, लातूर.

प्रतिसाद मिळाल्यास कायम राहील...

दिवाळी सणात फायदा होईल. कोणतीही नवीन गाडी सुरू करीत असताना काही दिवस प्रयोग केला जातो. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला की ती गाडी कायम केली जाते. त्यामुळे आपल्या भागातील प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा. परिणामी, ही रेल्वे कायमस्वरूपी सुरू राहील.  शामसुंदर मानधना, सदस्य, मध्य रेल्वे रेल्वे सल्लागार समिती.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे