शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

हरंगुळ ते पुणे रेल्वेसेवा मंगळवारपासून सुरू होणार

By आशपाक पठाण | Updated: October 6, 2023 21:28 IST

विशेष रेल्वे तीन महिने धावणार: दररोज दुपारी ३ वाजता निघणार पुण्याला.

आशपाक पठाण, लातूर : मागील अनेक दिवसांपासून मागणी असलेली हरंगुळ (लातूर) ते पुणे रेल्वेसेवा मंगळवार १० ऑक्टोबरपासून दैनंदिन सुरू होत आहे. मात्र, लातूर रेल्वेस्टेशनऐवजी ही गाडी हरंगुळ स्थानकातून सुटणार आहे. यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. दररोज दुपारी ३ वाजता हरंगुळ येथून निघणारी ही रेल्वे पुण्यात ९ वाजता पाेहचणार आहे.

मुंबईहून येणाऱ्या लातूर रेल्वेत अनेकदा पुण्याच्या प्रवाशांना जागा मिळत नव्हती. त्यामुळे स्थानकातून मध्यरात्रीच्या वेळी प्रवाशांना परत जावे लागत होते. आता मुंबईहून येणाऱ्या रेल्वेत जागा नाही मिळाली सकाळी पुण्याहून लातूरपर्यंतच्या प्रवाशांची नव्या रेल्वेमुळे सोय होणार आहे. पुणे येथून दररोज सकाळी ६.१० वाजता हरंगुळसाठी रेल्वे निघणार आहे. दुपारी १२.५० वाजता ही गाडी हरंगुळला येईल. येथील स्थानकात जवळपास दोन तास थांबल्यावर पुन्हा परतीच्या प्रवासाला निघणार आहे. पुण्यासाठी दुपारी ३ वाजता येथून ही रेल्वे निघणार आहे. पुणे स्टेशन येथे रात्री ९ वाजता पोहचणार आहे.

१५ डब्याची रेल्वे, इथे आहे थांबा...

हरंगुळ- पुणे ही रेल्वे १५ डब्याची आहे. त्यामुळे जवळपास एक हजार ते बाराशे प्रवासी सहजपणे प्रवास करू शकतील. हडपसार, उरूळी, केडगाव, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, बार्शी, धाराशिव आदी स्थानकावर थांबेल. ८ ऑक्टोबरपासून बुकींग सुविधा सुरू होणार आहे.

प्रवाशांची चांगली सोय झाली...

पुणे ते हरंगुळ ही विशेष रेल्वे १० ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. मुंबई-लातूर रेल्वेत जागा न मिळणाऱ्या प्रवाशांना ही रेल्वे फायद्याची ठरणार आहे. दिवसा सुविधा असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिलांसाठी हा प्रवास सुखकर होईल. - मोतीलाल डोईजोडे. सदस्य, दक्षिण मध्य रेल्वे सल्लागार समिती.

लातूर स्टेशनवर यायला हवी...

पुणे हरंगुळ ही नविन विशेष रेल्वे सेवा सुरू होणार आहे. पण ती गाडी दीड तास हरंगुळ स्टेशनवर उभी राहणार आहे. पुढे लातूरला येणार नाही, हे चुकीचे आहे. लातूरच्या स्टेशनवर आल्या प्रवाशांची सोय होईल. रेल्वे बाेर्डाने यावर त्वरीत निर्णय घ्यावा. - शिवाजी नरहरे, दक्षिण मराठवाडा रेल्वे संघर्ष समिती, लातूर.

प्रतिसाद मिळाल्यास कायम राहील...

दिवाळी सणात फायदा होईल. कोणतीही नवीन गाडी सुरू करीत असताना काही दिवस प्रयोग केला जातो. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला की ती गाडी कायम केली जाते. त्यामुळे आपल्या भागातील प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा. परिणामी, ही रेल्वे कायमस्वरूपी सुरू राहील.  शामसुंदर मानधना, सदस्य, मध्य रेल्वे रेल्वे सल्लागार समिती.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे