शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

हर घर तिरंगा मोहिम : लातूर जिल्ह्यात प्रशासनाकडून २ लाख ८० हजार राष्ट्रध्वजाचे वितरण

By संदीप शिंदे | Updated: August 8, 2022 18:39 IST

१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात येणार आहे

लातूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ८ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहिम राबविण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासनाच्या वतीने २ लाख ८० हजार १६१ राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले असल्याचे अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले.

अपर जिल्हाधिकारी लोखंडे म्हणाले, जिल्ह्यात ५ लाख ९ हजार ६९६ कुटूंब संख्या आहे. त्यानुसार २ लाख ८० हजार ध्वजाचे वितरण केले आहे. उर्वरित २ लाख २९ हजार ५३५ ध्वजाचे नियोजन करण्यात येत असून, राज्य शासनाकडून एक लाख ध्वज मिळणार आहेत. हर घर तिरंगा मोहिमेसाठी आरोग्य विभागाला २९८, शिक्षण विभाग २५९४, महिला व बालकल्याण विभाग २७२१, समाजकल्याण विभाग १५९, पशुसंवर्धन विभाग १२२, पंचायत विभाग ७८६ तर इतर विभागांना ५८५ असे एकूण ७ हजार २६५ ध्वज वितरीत करण्यात आले आहेत.

तसेच स्वराज्य महोत्सवातंर्गत ८ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबविले जाणार असून, ग्रामसभा, स्वातंत्रसैनिकांचे मार्गदर्शन, महिला बचत गट मेळावा, मोबाईल दुष्परिणाम मार्गदर्शन, बालकांसाठी गोपाल पंगत, वृक्षारोपण होणार आहे. तसेच देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेने या उपक्रमाची १७ ऑगस्टला सांगता होणार असल्याचेही अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे म्हणाले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, जि.प.च्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.बी. गिरी यांची उपस्थिती होती.

टॅग्स :laturलातूरIndependence Dayस्वातंत्र्य दिन