शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

ग्रा.पं. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या ‘कोरोना’ चाचणीला बगल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:14 IST

लातूर : जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यापैकी २५ ग्रामपंचायती ...

लातूर : जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यापैकी २५ ग्रामपंचायती बिनविराेध आल्या आहेत. जिल्ह्यात १ हजार ४५९ केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी ८ हजार ७५४ मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, यापैकी कोणाचीच कोरोना चाचणी झाली नसल्याचे चित्र आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७ हजार २८६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये ३ हजार ७१ पुरुष तर ४ हजार २१५ महिला उमेदवार आहेत. निवडणूक विभागाच्या वतीने १ हजार ४५९ मतदान केंद्र तयार करण्यात आली असून ८ हजार ७५४ मनुष्यबळ नियुक्त केले आहे. यामध्ये १४१ निवडणूक निर्णय अधिकारी असून ११६ क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर ३७ राखीव कर्मचारी राहणार आहेत. निवडणूक विभागाच्या वतीने मतदानाचे नियोजन करण्यात आले असून प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. मात्र, जिल्ह्यात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या झाल्या नसल्याने प्रशासनाने सदरील चाचण्यांना बगल दिल्याचे सध्यातरी चित्र आहे.

जिल्ह्यात ११६ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची निवड

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात ११६ क्षेत्रीय अधिकारी, १४१ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ३७ जण राखीव आहेत. १४५९ केंद्रावर मतदान होणार असून यामध्ये लातूर २३२, रेणापूर ८६, औसा १७४, निलंगा १८०, शिरूर अनंतपाळ २२९, देवणी १०८, उदगीर २२५, जळकोट ८४, अहमदपूर १५५ तर चाकूर तालुक्यातील १०२ मतदान केंद्रांचा समावेश आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचारी नियुक्त

निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य कर्मचारी नियुक्त राहणार असून प्रत्येक मतदाराची थर्मल स्क्रिनिंग केली जाणार आहे. तसेच मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोज, फेसशिल्ड आदी साहित्य पुरविले जाणार आहे. तसेच १४ जानेवारी रोजी मतदान साहित्य वितरित करताना संबंधित मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांची स्क्रिनिंग केली जाणार असून, गरज पडल्यास रॅपिड ॲन्टीजेन चाचणी केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.