शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

उदगीर जिल्ह्याच्या निर्मितीसाठी राज्यपालांना साकडे

By संदीप शिंदे | Updated: August 10, 2023 19:42 IST

राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची चर्चा

उदगीर : लातूर जिल्ह्याचे विभाजन करून उदगीर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी उदगीरचे आमदार व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी महामहिम राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेवून केली आहे.

तीन राज्याच्या सीमेवर असलेल्या उदगीर शहराला ऐतिहासिक वारसा असून, जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून उदगीरचे नाव आहे. व्यापारी व शैक्षणिकदृष्ट्या उदगीर शहर हे परिपूर्ण असून, उदगीर जिल्हा व्हावा म्हणून विविध प्रकारची आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी मागील अनेक वर्षापासून असल्याने यावेळी नवीन जिल्हा निर्मितीची घोषणा करताना उदगीरचा समावेश व्हावा याबाबत चर्चा करून या मागणीचे निवेदन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

तसेच उदगीर मतदार संघात मराठा समाजाच्या मुला मुलींची संख्या जास्त आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या नावे ग्रामपंचायतपर्यंत लागू होणारी शासनाची ध्येय उद्दिष्टपूर्ण योजना राज्यात लागू करावी, संस्कार देण्याचे काम करणाऱ्या कीर्तनकार मंडळींना मानधन देण्यात यावे यासह विविध विषयावर यावेळी महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यावेळी जेष्ठ कीर्तनकार शिवराज नावंदे गुरुजी, भाजपचे प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे, जळकोट काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव कुणाल बागबंदे उपस्थित होते.

टॅग्स :laturलातूर