शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

३३ गावांतील रुग्णांसाठी वलांडी आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST

वलांडी : देवणी तालुक्यातील आणि कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमा भागातील वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन ...

वलांडी : देवणी तालुक्यातील आणि कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमा भागातील वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात यावे, असा ठराव देवणी पंचायत समितीने घेतला आहे. येथे ग्रामीण रुग्णालय निर्माण झाल्यास ३३ गावांतील व परिसरातील रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

वलांडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून, या केंद्रा अंतर्गत ८ उपकेंद्रे आहेत. ३३ गावांतील रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविली जाते. याशिवाय सीमावर्ती भागातील कर्नाटक राज्यातील रुग्णही येथे मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमीच रुग्णांची गर्दी असते. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात नोंदणीचे प्रमाण अधिक आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चांगल्या सुविधा मिळत असल्याने उद्दिष्टापेक्षा अधिक कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया होतात. सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. अशा परिस्थितीतही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कमी प्रमाणात असतानाही आरोग्य सुविधा तत्काळ देण्यात येत आहेत.

परिणामी, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ताण पडत असल्याने येथे ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय निर्माण करण्यात यावे, असा ठराव ग्रामपंचायतीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी २५ मार्च रोजी विशेष ग्रामसभा घेऊन पंचायत समितीकडे दाखल केला होता. या ठरावाची दखल घेऊन पंचायत समितीच्या सभापती सविता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २३ एप्रिल रोजी झालेल्या मासिक सभेत चर्चा करण्यात आली. त्यानंतर वलांडीत ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा ठराव घेतला आणि पुढील मंजुरीसाठी आरोग्य विभागाकडे पाठविला आहे.

जिल्हा परिषदेकडील ठराव प्रलंबित...

वलांडी येथे ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय निर्माण करण्यात यावे, यासाठी २९ सप्टेंबर २०१८ रोजी जिल्हा परिषदेकडे ग्रामपंचायतीने ठराव सादर केला होता. तेव्हा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करून ३ सप्टेंबर २०१९ रोजी तो आरोग्य मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र हा प्रस्ताव अद्यापही प्रलंबितच आहे. येथील आरोग्य केंद्रावरील रुग्णसंख्येचा ताण व सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पालकमंत्री अमित देशमुख व राज्यमंत्री संजय बनसोडे यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आल्याची माहिती सरपंच राणीताई भंडारे, मोहम्मद रफी सय्यद, उपसरपंच महेमुद सौदागर यांनी दिली.