शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

बोरसुरी साठवण तलावासाठी ५७.८७ कोटींच्या निधीस मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:20 IST

शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली ...

शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विशेष पुढाकार घेऊन राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी विशेष निधी मंजूर करून दिला आहे. या माध्यमातून बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथे उभारण्यात येत असलेल्या साठवण तलावाचे उर्वरित बांधकाम व भूसंपादनासाठी ५७.८७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हा निधी मंजूर झाला असल्याने आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांचे आभार मानले. तसेच आ. निलंगेकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करुन घेतल्याने बोरसुरी व परिसरातील शेतक-यांसह ग्रामस्थांतून आनंद व्यक्त होत आहे.

३५२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली...

हा साठवण तलाव ९५.१२ हेक्टर जमिनीवर उभारला जात असून त्याची पाणी साठवण क्षमता २.३४७ दलघमी असणार आहे. या माध्यमातून चार गावांतील ४५३ शेतक-यांचे ३५२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्याचबरोबर बोरसुरी, टाकळी, चिलवंतवाडी, कलमुगळी, चांदोरी व चांदोरीवाडी या परिसरातील विंधन विहिरी व विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यासह बोरसुरी परिसरातील गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कायमस्वरुपी दूर होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. हा निधी प्राप्त झाल्यामुळे सदर साठवण तलाव जून २०२१ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.