रेणापूर येथील रविकांत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २५ एप्रिल रोजी रात्री ११.४५ वा. सुमारास एमएच २४, बीएफ १९९१ क्रमांकाच्या दुचाकीवरून लातूरहून रेणापूरकडे येत होते. तेव्हा महापूर पुलाच्या पुढे अनोळखी चौघांनी सदरील दुचाकीचा पाठलाग करून मोटारसायकल आडवी लावली, तेव्हा वाहन थांबविले असता तू बाईचे मंगळसूत्र, पैसे चोरले आहेस, ते परत दे असे म्हणून त्यांच्या जवळील असलेली दुचाकीची चावी काढून घेतली, तसेच फिर्यादीस मारहाण करून जखमी केले. त्यांना रस्त्याच्या बाजूच्या नाल्यात टाकून देत फिर्यादीजवळील रोख रक्कम २० हजार, एक मोबाइल काढून घेतला. याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक क्रांती निर्मळ, सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, पोहे कांबळे, पोना. गौतम घाडगे, धर्मवीर शिंदे, संतोष गायकवाड, अभिजित थोरात यांच्या पथकाने करून बुधवारी गुन्ह्यातील सराईत चौघा आरोपींना पकडून गुन्ह्यात पळविलेला मुद्देमाल, वापरलेले हत्यार व रोख रक्कम जप्त केली.