शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

लातूर जिल्ह्यातील साडेचार हजार शेतरस्ते झाले अतिक्रमणमुक्त !

By संदीप शिंदे | Updated: May 4, 2023 14:23 IST

महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४ हजार ५८५ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत.

लातूर : शेतात जाण्यासाठी रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. त्यात पुर्वीच्या असलेल्या रस्त्यावरही अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले होते. परिणामी, शेतरस्त्यामुळे शेतमाल घरी नेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४ हजार ५८५ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी पुढाकार घेतला आहे.

जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये गाव नकाशावरील नोंद असलेल्या ४ हजार ९८० शेतरस्त्यांवर अतिक्रमण होते. महाराजस्व अभियानातंर्गत ३० एप्रिलपर्यंत त्यापैकी ४ हजार ५८५ रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. गाव नकाशावर नोंद नसलेल्या १ हजार ९३ शेतरस्त्यांवर अतिक्रमण होते. ३० एप्रिलपर्यंत यापैकी ९७१ शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. उर्वरित रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सुरु असून त्यांनाही गती देण्यात आली आहे. 

अनेकदा शेतातील रस्त्यावरुन भावकीमध्ये वाद होतात. ही प्रकरणे तहसील तसेच न्यायालयापर्यंत जातात. तोपर्यंत शेतकऱ्यांना पर्यायी मार्ग शोधावा लागतो. मात्र, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी १ मे पर्यंत जिल्ह्यातील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जवळपास ४ हजार ५८५ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तसेच शेतमालाची वाहतूक करण्यासाठी मदत होणार आहे. जिल्ह्यातील उर्वरित अतिक्रमणमुक्त शेतरस्ते लवकरात लवकर मोकळे करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

नोंद नसलेले रस्तेही अतिक्रमणमुक्त...जिल्ह्यात गाव नकाशावर नोंद नसलेल्या १ हजार ९३ शेतरस्त्यांवर अतिक्रमण होते. ३० एप्रिलपर्यंत यापैकी ९७१ शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. महसूल विभागाकडून गावा-गावातील शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या अतिक्रमणमुक्त रस्त्यांवर शेतकरी मुरुम टाकून मजबुतीकरण करीत आहे. परिणामी, पावसाळ्यातही शेतापर्यंत जाण्यासाठी सोय होणार आहे.

महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी...महाराजस्व अभियानांतर्गत शेतरस्ते, अतिक्रमणमुक्त रस्ते मोकळे करण्यासाठी योजना राबविली जात आहे. अनेक शेतकरी शेतरस्त्याचे प्रश्न घेऊन तहसील, जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करीत होते. मात्र, या अभियानाला प्रत्यक्ष गती मिळाल्याने बहूतांश रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :laturलातूरroad safetyरस्ते सुरक्षाgram panchayatग्राम पंचायत