शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

लातूर जिल्ह्यातील साडेचार हजार शेतरस्ते झाले अतिक्रमणमुक्त !

By संदीप शिंदे | Updated: May 4, 2023 14:23 IST

महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४ हजार ५८५ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत.

लातूर : शेतात जाण्यासाठी रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. त्यात पुर्वीच्या असलेल्या रस्त्यावरही अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले होते. परिणामी, शेतरस्त्यामुळे शेतमाल घरी नेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४ हजार ५८५ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी पुढाकार घेतला आहे.

जिल्ह्यातील सर्व शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये गाव नकाशावरील नोंद असलेल्या ४ हजार ९८० शेतरस्त्यांवर अतिक्रमण होते. महाराजस्व अभियानातंर्गत ३० एप्रिलपर्यंत त्यापैकी ४ हजार ५८५ रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. गाव नकाशावर नोंद नसलेल्या १ हजार ९३ शेतरस्त्यांवर अतिक्रमण होते. ३० एप्रिलपर्यंत यापैकी ९७१ शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. उर्वरित रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सुरु असून त्यांनाही गती देण्यात आली आहे. 

अनेकदा शेतातील रस्त्यावरुन भावकीमध्ये वाद होतात. ही प्रकरणे तहसील तसेच न्यायालयापर्यंत जातात. तोपर्यंत शेतकऱ्यांना पर्यायी मार्ग शोधावा लागतो. मात्र, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी १ मे पर्यंत जिल्ह्यातील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जवळपास ४ हजार ५८५ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तसेच शेतमालाची वाहतूक करण्यासाठी मदत होणार आहे. जिल्ह्यातील उर्वरित अतिक्रमणमुक्त शेतरस्ते लवकरात लवकर मोकळे करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

नोंद नसलेले रस्तेही अतिक्रमणमुक्त...जिल्ह्यात गाव नकाशावर नोंद नसलेल्या १ हजार ९३ शेतरस्त्यांवर अतिक्रमण होते. ३० एप्रिलपर्यंत यापैकी ९७१ शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. महसूल विभागाकडून गावा-गावातील शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या अतिक्रमणमुक्त रस्त्यांवर शेतकरी मुरुम टाकून मजबुतीकरण करीत आहे. परिणामी, पावसाळ्यातही शेतापर्यंत जाण्यासाठी सोय होणार आहे.

महाराजस्व अभियानाची अंमलबजावणी...महाराजस्व अभियानांतर्गत शेतरस्ते, अतिक्रमणमुक्त रस्ते मोकळे करण्यासाठी योजना राबविली जात आहे. अनेक शेतकरी शेतरस्त्याचे प्रश्न घेऊन तहसील, जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करीत होते. मात्र, या अभियानाला प्रत्यक्ष गती मिळाल्याने बहूतांश रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :laturलातूरroad safetyरस्ते सुरक्षाgram panchayatग्राम पंचायत