शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित बियाणांसाठी १८७७ अर्जांतून ५४३ शेतकऱ्यांचेच नशीब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST

अहमदपूर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतंर्गत अनुदानावर बियाणे वाटप करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तालुक्यातून १ हजार ८७७ शेतकऱ्यांनी ऑनलाईन ...

अहमदपूर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतंर्गत अनुदानावर बियाणे वाटप करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तालुक्यातून १ हजार ८७७ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. मात्र, यापैकी केवळ ५४३ शेतकऱ्यांची सोडतीमध्ये निवड झाली आहे. निवड झालेल्यांना सोयाबीन आणि तुरीचे बियाणे वाटप होणार आहे. अर्ज करुनही सोडतीमध्ये उर्वरित शेतकऱ्यांची निवड न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

अहमदपूर तालुक्यातील ४० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार असून, त्यासाठी अनुदानावर केवळ ४५० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. तालुक्यात ७० हजार पेरणीयोग्य क्षेत्र असून, सर्वाधिक ४० हजार हेक्‍टरवर सोयाबीन पेरणी केली जाणार आहे. त्यासाठी २९ हजार ५०० क्विंटल बियाण्यांची गरज आहे. मात्र मागील काही वर्षापासून बियाणांचा प्रचंड तुटवडा असल्याने यंदा अनेक शेतकरी महाबीजच्या बियाण्यांवर अवलंबून होते. मात्र शासनाने यासाठी ऑनलाईन अर्ज भरून त्यासाठी लॉटरी पद्धतीने वाटप करण्याविषयी धोरण स्वीकारल्यामुळे अहमदपूर तालुक्यातील १ हजार ८७७ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. त्यातील ५४३ शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड झाली असून त्यांना ४५० क्विंटल बियाणे मिळणार आहे. सोयाबीन ३० किलोची बॅग २ हजार ४० रुपयाला असून त्यावर २६० रुपये अनुदान आहे. तुरीच्या दोन किलोच्या बॅगची किंमत २६० रुपये असून १०० रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे सदर अनुदान अत्यंत तोकडे असून बॅगांची उपलब्धता तर खूपच कमी आहे. त्यातच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सातबारा, ८ अ, पासबुक, शासनाची २३ रुपये फी भरावी लागते. तसेच ऑनलाईन सेवा केंद्रावर शंभर रुपये घेतले जातात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे किमान १२० ते १५० रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे सदर योजनेमुळे शासनालाच महसूल प्राप्त झाल्याचा दिसून येत आहे.

गावस्तरावर होणार बियाणांचे वाटप...

लॉटरी पद्धतीने बियाणे वाटप करण्यासाठी संगणकीय प्रणालीत १ हजार ८७७ शेतकऱ्यांपैकी ५४३ जणांची लॉटरी लागली आहे. निवड झालेल्यांना सोयाबीन व तुरीचे बियाणे वाटप होणार आहे. बियाणांची उपलब्ध करण्यात आली असून, लॉटरीत नाव आलेल्या शेतकऱ्यांच्या गावातील कृषी सहायकाकडून त्यासंबंधीचे परमिट उपलब्ध करून घ्यावे, बियाणे घेऊन जावे, असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी भुजंग पवार यांनी केले आहे.

सर्व बियाण्यांवर अनुदान द्या...

महाबीज बियाणे २ हजार ते २२०० रुपयाला आहे. बाजारात इतर सोयाबीन बियाणे ३३०० ते ३४०० रुपये प्रति ३० किलोप्रमाणे आहे. त्यामुळे शासनाने सर्वच बियाण्यांवर १ हजार ते १२०० रुपये अनुदान देऊन कमीत कमी पैशांमध्ये बियाणे उपलब्ध करून द्यावेत. असे शेतकरी शिवकुमार उटगे म्हणाले.

शासनाचा महसूल वाढवणारी योजना...

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शासनाकडे २३ रुपयांचा भरणा केला जातो. १ हजार ८७७ शेतकऱ्यांनी जवळपास ४३ हजार रुपयांचा शासनाकडे महसूल भरणा केला आहे. त्यातही मोजक्याच शेतकऱ्यांची निवड झाली आहे. या योजनेमुळे शासनाचा महसूल वाढला आहे. त्यामुळे सर्वांनाच मोफत बियाणे द्यावे. असे बालाजी बोबडे म्हणाले.