शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

अनुदानित बियाणांसाठी १८७७ अर्जांतून ५४३ शेतकऱ्यांचेच नशीब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST

अहमदपूर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतंर्गत अनुदानावर बियाणे वाटप करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तालुक्यातून १ हजार ८७७ शेतकऱ्यांनी ऑनलाईन ...

अहमदपूर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतंर्गत अनुदानावर बियाणे वाटप करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. तालुक्यातून १ हजार ८७७ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. मात्र, यापैकी केवळ ५४३ शेतकऱ्यांची सोडतीमध्ये निवड झाली आहे. निवड झालेल्यांना सोयाबीन आणि तुरीचे बियाणे वाटप होणार आहे. अर्ज करुनही सोडतीमध्ये उर्वरित शेतकऱ्यांची निवड न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

अहमदपूर तालुक्यातील ४० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार असून, त्यासाठी अनुदानावर केवळ ४५० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. तालुक्यात ७० हजार पेरणीयोग्य क्षेत्र असून, सर्वाधिक ४० हजार हेक्‍टरवर सोयाबीन पेरणी केली जाणार आहे. त्यासाठी २९ हजार ५०० क्विंटल बियाण्यांची गरज आहे. मात्र मागील काही वर्षापासून बियाणांचा प्रचंड तुटवडा असल्याने यंदा अनेक शेतकरी महाबीजच्या बियाण्यांवर अवलंबून होते. मात्र शासनाने यासाठी ऑनलाईन अर्ज भरून त्यासाठी लॉटरी पद्धतीने वाटप करण्याविषयी धोरण स्वीकारल्यामुळे अहमदपूर तालुक्यातील १ हजार ८७७ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. त्यातील ५४३ शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड झाली असून त्यांना ४५० क्विंटल बियाणे मिळणार आहे. सोयाबीन ३० किलोची बॅग २ हजार ४० रुपयाला असून त्यावर २६० रुपये अनुदान आहे. तुरीच्या दोन किलोच्या बॅगची किंमत २६० रुपये असून १०० रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे सदर अनुदान अत्यंत तोकडे असून बॅगांची उपलब्धता तर खूपच कमी आहे. त्यातच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सातबारा, ८ अ, पासबुक, शासनाची २३ रुपये फी भरावी लागते. तसेच ऑनलाईन सेवा केंद्रावर शंभर रुपये घेतले जातात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांचे किमान १२० ते १५० रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे सदर योजनेमुळे शासनालाच महसूल प्राप्त झाल्याचा दिसून येत आहे.

गावस्तरावर होणार बियाणांचे वाटप...

लॉटरी पद्धतीने बियाणे वाटप करण्यासाठी संगणकीय प्रणालीत १ हजार ८७७ शेतकऱ्यांपैकी ५४३ जणांची लॉटरी लागली आहे. निवड झालेल्यांना सोयाबीन व तुरीचे बियाणे वाटप होणार आहे. बियाणांची उपलब्ध करण्यात आली असून, लॉटरीत नाव आलेल्या शेतकऱ्यांच्या गावातील कृषी सहायकाकडून त्यासंबंधीचे परमिट उपलब्ध करून घ्यावे, बियाणे घेऊन जावे, असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी भुजंग पवार यांनी केले आहे.

सर्व बियाण्यांवर अनुदान द्या...

महाबीज बियाणे २ हजार ते २२०० रुपयाला आहे. बाजारात इतर सोयाबीन बियाणे ३३०० ते ३४०० रुपये प्रति ३० किलोप्रमाणे आहे. त्यामुळे शासनाने सर्वच बियाण्यांवर १ हजार ते १२०० रुपये अनुदान देऊन कमीत कमी पैशांमध्ये बियाणे उपलब्ध करून द्यावेत. असे शेतकरी शिवकुमार उटगे म्हणाले.

शासनाचा महसूल वाढवणारी योजना...

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम शासनाकडे २३ रुपयांचा भरणा केला जातो. १ हजार ८७७ शेतकऱ्यांनी जवळपास ४३ हजार रुपयांचा शासनाकडे महसूल भरणा केला आहे. त्यातही मोजक्याच शेतकऱ्यांची निवड झाली आहे. या योजनेमुळे शासनाचा महसूल वाढला आहे. त्यामुळे सर्वांनाच मोफत बियाणे द्यावे. असे बालाजी बोबडे म्हणाले.