शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

उदगीरच्या समतानगरला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचा प्रशासनाला विसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:36 IST

उदगीर : शहरातील समतानगर मार्गावर असलेल्या रेल्वे रुळावरून वाहतुकीसाठी दिवसातून सातत्याने रेल्वे फाटक बंद होत असल्याने तासन्‌तास वाहतुकीचा ...

उदगीर : शहरातील समतानगर मार्गावर असलेल्या रेल्वे रुळावरून वाहतुकीसाठी दिवसातून सातत्याने रेल्वे फाटक बंद होत असल्याने तासन्‌तास वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे समतानगर व संतोषीमातानगरातील नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्ग उभारण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले होते; परंतु त्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.

उदगीरमधील रेल्वेस्थानकाच्या जवळपास ३०० मीटर अंतरावर समतानगर आहे, तसेच उदगीर शहराला जोडणाऱ्या भागावर दक्षिण मध्य रेल्वेचे फाटक आहे. या रुळावरून प्रवासी व मालवाहतुकीच्या रेल्वेगाड्यांची सतत ये-जा असते. त्यामुळे येथे रेल्वे येण्याअगोदर किमान १५ मिनिटे रेल्वेचे फाटक बंद करण्यात येते. समतानगर, संतोषीमातानगर, डॅम रोड, गोपाळनगर, क्रांतीनगर, नेत्रगाव, येणकी, मानकी, देवणी या भागांत जाणाऱ्या वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे.

समतानगर, गोपाळनगर, रेल्वे स्टेशनसमोरील भाग, संतोषीमातानगर, क्रांतीनगर आदी भागांत उदगीर शहरातील किमान २० टक्के नागरी वसाहत आहे. विधानसभा निवडणुकीवेळी या भागातील नागरिकांनी प्रशासनाने भुयारी मार्ग तयार करावा, अशी मागणी करून विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर हालचाली होऊन स्थानिक प्रशासन व दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता यांच्यात बैठक झाली आणि रेल्वे गेटच्या पलीकडे असलेला भुयारी मार्ग स्थानिक प्रशासनाने मोकळा करण्याचे व त्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करणे व इतर मदत रेल्वे खात्याने पुरविण्याचे ठरले.

मात्र, निवडणुका होऊन एक वर्ष झाले तरी स्थानिक प्रशासन व रेल्वे प्रशासनाने कुठलीही हालचाल केली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक प्रशासन व रेल्वे खात्याने लवकरात लवकर भुयारी मार्ग मोकळा करून द्यावा. जेणे करून या मार्गावर होणारी वाहतूक सुरळीत होईल, अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.

केवळ सर्व्हे करण्यात आला...

विधानसभा निवडणुकीवेळी केवळ सर्व्हे करण्यात आला होता. त्यानंतर कुठलीही कार्यवाही झाली नाही. आमदार अथवा खासदार फंंडातून काही आर्थिक तरतूद झाल्यास त्या ठिकाणी भुयारी मार्ग करणे शक्य होईल.

- बस्वराज बागबंदे, नगराध्यक्ष.

इच्छाशक्तीचा अभाव...

राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रश्न प्रलंबित आहे. स्थानिक राजकीय मंडळी, खासदारांनी पाठपुरावा केल्यास हे काम होईल, अन्यथा या भागातील नागरिकांची या त्रासातून सुटका होणे शक्य नाही, असे रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी सांगितले.

-------------------------------