शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अग्नी प्रतिबंधक नळकांड्या गायब !

By admin | Updated: November 10, 2014 01:17 IST

लातूर : अचानक लागलेली आग विझविण्यासाठी अग्नी प्रतिबंधक नळकांड्या बसेसमध्ये असण्याचा नियम आहे़ परंतु एसटी महामंडळाच्या अनेक बसेसमध्ये आग आटोक्यात आणण्याचे

लातूर : अचानक लागलेली आग विझविण्यासाठी अग्नी प्रतिबंधक नळकांड्या बसेसमध्ये असण्याचा नियम आहे़ परंतु एसटी महामंडळाच्या अनेक बसेसमध्ये आग आटोक्यात आणण्याचे कोणतेही साहित्य नसल्याचे समोर आले आहे़ ‘लोकमत’ चमूने रविवारी दुपारी १२ ते १़३० वाजेपर्यंत लातूर बसस्थानकात लांब पल्ल्याच्या तसेच जिल्ह्यात धावणाऱ्या अनेक बसेसमध्ये अग्नी प्रतिबंधक नळकांड्या आहेत का? याचे स्टिंग आॅपरेशन केले़ दीड तासात लातूर बसस्थानकात पाहिलेल्या १५ गाड्यांपैकी केवळ एका बसमध्ये अग्नी प्रतिबंधक नळकांडी होती़ त्याचीही कालमर्यादा संपलेलीच़दोन दिवसांपूर्वी देगलूर आगाराच्या धावत्या बसला अचानक आग लागली होती़ या घटनेचा बोध घेऊन, बसेसमधील अग्नी प्रतिबंधक नळकांड्या व अन्य साहित्य ठेवले जाईल अशी अपेक्षा होती़ परंतु बहुतांश गाड्यामध्ये अग्नी प्रतिबंधक नळकांड्या नसल्याचे निदर्शनास आले आहे़ शोभेची वस्तू म्हणून तरी महामंडळाने अग्नी प्रतिबंधक उपाययोजना नळकांड्या ठेवल्या नाहीत़निजामाबाद-मंगळवेढा, उदगीर-सोलापूर, अहमदपूर-सोलापूर, लातूर-पोहरेगाव, लातूर-पानगाव, लातूर-नांदेड, नांदेड-भोकर, लातूर-औसा, औसा-लातूर, निलंगा-गुलबर्गा, भोकर-अक्कलकोट, उदगीर-पुणे, लातूर-उदगीर या बसेसमध्ये आग आटोक्यात आणण्याच्या प्रतिबंधक नळकांड्या नावालाही नव्हते़ चालकाच्या पाठीमागे अथवा बसच्या आतील मागच्या बाजूस आग प्रतिबंधक नळकांड्या बसविण्याचा नियम आहे़ परंतु या १४ बसेसमध्ये आग प्रतिबंधक नळकांड्या नसल्याचे स्टिंग आॅपरेशन नंतर समोर आले आहे़ जालना-गुलबर्गा या बसमध्ये अग्नी प्रतिबंधक नळकांडी होती़ परंतु त्याची कालमर्यादा संपलेली होती़ तीन प्रकारचे अग्नी प्रतिबंधक नळकांड्या असतात़ एक पाण्याने भरलेली, दुसरी केमिकलयुक्त पावडरने भरलेली तर तिसरी गॅसने भरलेली असते़ यापैकी कोणतीही एक अग्नी प्रतिबंधक नळकांडी असावी, असा नियम आहे़ परंतु या नियमाचे महामंडळाच्या बसेसमधून उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे़ प्रादेशिक परिवहन कार्यालयाने खाजगी प्रवासी बसेसना अग्नी प्रतिबंधक नळकांड्याची सक्ती केली आहे़ ज्या खाजगी बसेसमध्ये अग्नी प्रतिबंधक नळकांड्या नाहीत, अशा बसेसची प्रवाशी वाहतुकीची नोंदणी रद्द करण्यात येते़ काल-परवाच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहतूक नियमांचे आणि बसेसच्या रचनेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे १५ बसेस जप्त केल्या आहेत़ इकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने मात्र देगलूर घटनेचाही बोध घेतला नाही़ प्राथमिक आग आटोक्यात आणण्यासाठी या नळकांड्या यशस्वी ठरू शकतात़ आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर या नळकांड्यांच्या द्वारे आग विझविता येवू शकते़ परंतु महामंडळाच्या बसेसमधूनच या नळकांड्या गायब झाल्या आहेत़