शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

शेरा येथील लग्न साहेळ्यातील गर्दीप्रकरणी दहा हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:18 IST

: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेणापूर शहर आणि पिंपळफाटा येथे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकावर रेणापूर पाेलीस, नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कार्यवाई ...

:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेणापूर शहर आणि पिंपळफाटा येथे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकावर रेणापूर पाेलीस, नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कार्यवाई करण्यात आली. यातून एकूण ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर शेरा येथील एका लग्नसाेहळ्यात माेठ्या प्रमाणावर गर्दी जमविल्याप्रकरणी प्रशासनाकडून दहा हजारांचा दंड ठाेठावला आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. रेणापूर नगर पंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्याची माेहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेला गुरुवारपासून रेणापूर-औसा विभागाचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, रेणापूर येथील तहसीलदार राहुल पाटील, रेणापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, रेणापूर नगरपंचायतीचे पाणीपुरवठा प्रमुख विभुते यांनी रस्त्यावर उतरत विन मास्क फिरणाऱ्या, वाहन चालविणाऱ्या नागरिकांसह वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शनिवारअखेर ३५० जणावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून जवळपास ३५ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, ही संख्या आणि काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा, स्थानिक प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे समाेर आले आहे. अशा नागरिकांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. रेणापूर आणि पिंपळफाटा येथील पाेलीस प्रशासनाच्या वतीने नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. याची नाेंदही पाेलीस ठेवत आहेत. विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्यांना दंड केला जात आहे.

लग्नसाेहळा अयाेजकांवरही झाली कारवाई...

रेणापूर तालुक्यातील शेरा येथे एक लग्न साेहळा हाेता. दरम्यान, या लग्न साेहळ्यासाठी माेठ्या संख्यने पाहुणे-रावळे एकत्रित आले हाेते. लग्न साेहळ्यासाठी एकत्रितपणे जमलेल्या नागरिकांवर स्थानिक प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन, जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियमावली ठरविण्यात आली आहे. या नियमांचे पालन हाेत नसल्याचे समाेर आले आहे. लग्न साेहळे, इतर गर्दीचे कार्यक्रम बिनधास्तपणे आयाेजित केले जात आहेत. शिवाय, सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्याही माेठी आहे. काही नागरिकांकडून काेराेनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे.