शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

शेरा येथील लग्न साहेळ्यातील गर्दीप्रकरणी दहा हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:18 IST

: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेणापूर शहर आणि पिंपळफाटा येथे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकावर रेणापूर पाेलीस, नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कार्यवाई ...

:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेणापूर शहर आणि पिंपळफाटा येथे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकावर रेणापूर पाेलीस, नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कार्यवाई करण्यात आली. यातून एकूण ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर शेरा येथील एका लग्नसाेहळ्यात माेठ्या प्रमाणावर गर्दी जमविल्याप्रकरणी प्रशासनाकडून दहा हजारांचा दंड ठाेठावला आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. रेणापूर नगर पंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्याची माेहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेला गुरुवारपासून रेणापूर-औसा विभागाचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, रेणापूर येथील तहसीलदार राहुल पाटील, रेणापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, रेणापूर नगरपंचायतीचे पाणीपुरवठा प्रमुख विभुते यांनी रस्त्यावर उतरत विन मास्क फिरणाऱ्या, वाहन चालविणाऱ्या नागरिकांसह वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शनिवारअखेर ३५० जणावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून जवळपास ३५ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, ही संख्या आणि काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा, स्थानिक प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे समाेर आले आहे. अशा नागरिकांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. रेणापूर आणि पिंपळफाटा येथील पाेलीस प्रशासनाच्या वतीने नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. याची नाेंदही पाेलीस ठेवत आहेत. विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्यांना दंड केला जात आहे.

लग्नसाेहळा अयाेजकांवरही झाली कारवाई...

रेणापूर तालुक्यातील शेरा येथे एक लग्न साेहळा हाेता. दरम्यान, या लग्न साेहळ्यासाठी माेठ्या संख्यने पाहुणे-रावळे एकत्रित आले हाेते. लग्न साेहळ्यासाठी एकत्रितपणे जमलेल्या नागरिकांवर स्थानिक प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन, जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियमावली ठरविण्यात आली आहे. या नियमांचे पालन हाेत नसल्याचे समाेर आले आहे. लग्न साेहळे, इतर गर्दीचे कार्यक्रम बिनधास्तपणे आयाेजित केले जात आहेत. शिवाय, सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्याही माेठी आहे. काही नागरिकांकडून काेराेनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे.