शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

अखेर किल्लारीचा ३० खेडी पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST

किल्लारी : थकीत बिलामुळे महावितरणने २० जानेवारीस ३० खेडी वीजपुरवठा योजनेचा वीजपुरवठा तोडला होता. त्यामुळे नागरिकांची भटकंती सुरू झाली ...

किल्लारी : थकीत बिलामुळे महावितरणने २० जानेवारीस ३० खेडी वीजपुरवठा योजनेचा वीजपुरवठा तोडला होता. त्यामुळे नागरिकांची भटकंती सुरू झाली होती. दरम्यान, खा. ओमराजे निंबाळकर यांच्यापुढे ही समस्या मांडली असता त्यांनी वीजजोडणी तत्काळ करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नागरिकांनी पायपीट थांबली आहे.

औसा तालुक्यातील किल्लारीस निम्न तेरणा प्रकल्पातून ३० खेडी पाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. परंतु, सतत विविध कारणांनी पाणीपुरवठा बंद होतो. दरम्यान, महावितरणने थकीत बिलापोटी २० जानेवारीस या योजनेचा वीजपुरवठा तोडला. परिणामी, गावातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाली होती. ही समस्या सोडविण्यात यावी, अशी सातत्याने लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात येत होती.

दरम्यान, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयास भेट दिली होती. तेव्हा गावकऱ्यांनी पाण्याची व्यथा मांडली. यावेळी किशोर जाधव, उपसरपंच युवराज गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले, बाळू महाराज व नागरिकांनी पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी केली. गावातील नागरिकांची समस्या ऐकून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लातूरच्या मुख्य अभियंत्यांस सूचना करून वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. माकणी प्रकल्पावरील अभियंता कपाळे यांनी वीजपुरवठा जोडल्याने पाणीपुरवठा १ मे रोजी सुरू झाल्याचे सांगितले. पाणीपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

विकतच्या पाण्यावर तहान...

निम्न तेरणा प्रकल्पावरून किल्लारीस पाणीपुरवठा होतो. ही जलवाहिनी भूकंपानंतर टाकण्यात आली आहे. परंतु, ती निकृष्ट दर्जाची असल्याने सतत फुटत असते. तसेच विद्युत मोटार सातत्याने जळते. गेल्या अनेक महिन्यांपासून ही समस्या आहे. वास्तविक किल्लारी हे औसा तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. मात्र, येथील नागरिकांना सतत पाण्यासाठी भटकंती करावी लागते. विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. सध्या वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याने तात्पुरती अडचण दूर झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.