शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

अखेर उदगीरचा शासकीय दूध भुकटी प्रकल्प भंगारात !

By संदीप शिंदे | Updated: July 1, 2024 18:54 IST

शासकीय स्तरावरील निविदा प्रक्रिया पूर्ण : मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९७८ मध्ये उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्पाचे भूमिपूजन केले. १९ जानेवारी १९७९ या वर्षी तो सुरू झाला.

- विनायक चाकुरेउदगीर : तालुक्याचे वैभव असलेल्या शासकीय दूध भुकटी प्रकल्प आता भंगारात निघाला आहे. शासकीय स्तरावरून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयाने उच्चतम दराने निविदा भरलेल्या संस्थेच्या नावाने प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयात प्रस्ताव पाठवल्याची माहिती आहे. यापूर्वी दूध डेअरी बचाव समितीने हा प्रकल्प ‘एनडीडीबी’कडे चालवण्यासाठी द्यावा, यासाठी प्रयत्न केले होते. डिसेंबर महिन्यात या पथकाने प्रकल्पाची पाहणी केली होती. आता हा प्रकल्प भंगारात गेल्यामुळे या ठिकाणी पुन्हा नवीन प्रकल्प होणार की १४ एकरचा भूखंड रिकामा राहणार याकडे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९७८ मध्ये उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्पाचे भूमिपूजन केले. १९ जानेवारी १९७९ या वर्षी तो सुरू झाला. जून २००२ पर्यंत हा प्रकल्प सुरू होता. त्यानंतर या ना त्या कारणांनी तो बंद पडला. नोव्हेंबर २००८ मध्ये तत्कालीन आ. चंद्रशेखर भोसले यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. मात्र, त्यानंतर पुन्हा बंद पडला तो अद्यापपर्यंत.

उदगीरच्या दूध भुकटी प्रकल्पाची क्षमता ही दररोज १ लाख २० हजार लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची होती. मलईविरहित दूध भुकटी ११.७ टन, तर पांढरे लोणी ५ टन उदगीर दूध भुकटी प्रकल्पाच्या ६० किलोमीटर परिसरातील अंबाजोगाई, गंगाखेड, भूम, परंडा, कळंब, अहमदपूर, लोहा, निलंगा, परभणी, धाराशिव, उमरगा आदी ठिकाणचे कच्चे थंड केलेले दूध भुकटी प्रकल्पासाठी येत होते. दूध भुकटी प्रकल्पातून तयार झालेली दूध भुकटी व पांढरे लोणी देशात अनेक भागांत विकले जात होते व यातून राज्य शासनास चांगला उत्पन्न मिळत होते. सुरुवातीला या प्रकल्पात ५३५ कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष रोजगार मिळत होता. तर या भागातील हजारो शेतकऱ्यांना शेतीपूरक म्हणून दूध उत्पादनाद्वारे उत्पन्नाचे साधन निर्माण झाले होते. २४ वर्षे हा प्रकल्प उत्तमरीत्या चालून शेवटी जो बंद पडला तो आजपर्यंत पुन्हा सुरू झालाच नाही.

भंगार गेल्यावर इमारत जमीनदोस्त होणार...माजी खा. सुधाकर शृंगारे यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्या उपस्थितीमध्ये २९ जानेवारी रोजी दूध डेअरीच्या प्रांगणात शेतकरी संवाद मेळावा घेऊन या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत डेअरीचे पुनरुज्जीवित करण्याची घोषणा केली होती. बरोबर एक महिन्यानंतर २९ फेब्रुवारी रोजी हा प्रकल्प आहे त्या परिस्थितीमध्ये भंगारात विकण्याची निविदा शासनाने प्रसिद्ध केली आहे. आता या ठिकाणचे भंगार गेल्यानंतर सदरील इमारत जमीनदोस्त करण्यात येईल, यानंतरच केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला तरच नवीन प्रकल्प उभा राहू शकतो.

नव्याने प्रकल्प सुरू होण्यासाठी प्रयत्न...उदगीर मतदारसंघाचे आमदार तथा क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासोबत दूध डेअरी बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, दुग्ध विकासमंत्री यांची भेट घेऊन हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. तसेच केंद्रीय दुग्धविकास मंत्र्याकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली. सदरील प्रकल्पाची ‘एनडीडीबी’मार्फत पाहणी करून या ठिकाणी नव्याने प्रकल्प सुरू करण्याचे प्रयत्न केले होते.

आता नागरिकांच्या नजरा ‘एनडीडीबी’कडे...अनेक शासकीय दूध योजनेचे प्रकल्प भंगारात निघाले आहे. उदगीर येथील दूध योजना व दूध भुकटी प्रकल्पाची मशिनरी नव्याने उभी करण्यासाठी ‘एनडीडीबी’शिवाय पर्याय नसल्याने येणाऱ्या काळात ‘एनडीडीबी’ काय भूमिका घेते, यावर या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे. दूध भुकटी प्रकल्प भंगारात निघण्याची निविदा पूर्ण झाली असली, तरी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी क्रीडामंत्री संजय बनसोडे व खा. डॉ. शिवाजी काळगे यांच्यामार्फत ‘एनडीडीबी’कडे पाठपुरावा करू, असे समितीचे निमंत्रक मोतीलाल डोईजोडे यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरmilkदूध