शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील खतांच्या कारखान्यांना नवसंजीवनी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST

अहमदपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पणन महासंघाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आ. बाबासाहेब पाटील यांचा सत्कार साेहळा आयाेजि ...

अहमदपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पणन महासंघाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आ. बाबासाहेब पाटील यांचा सत्कार साेहळा आयाेजि करण्यात आला हाेता. यावेळी ते बाेलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती शिवानंद हेंगणे, नायब तहसीलदार मोरे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांब महाजन, काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष सिराजुद्दीन जाहागीरदार, जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजहर भाई बागवान, दिलीप जाधव, विकास महाजन, चंद्रकांत मद्दे, तुकाराम पाटील, शिवाजीराव खांडेकर, निवृत्तीराव कांबळे, प्रशांत भोसले, अ‍ॅड भारतभूषण क्षिरसागर, बाळासाहेब पाटील आंबेगावकर, अ‍ॅड. सांब शेटकर, अनिल मेंनकुडळे, सुभाष मुढे, श्याम देवकट्टे, दयनोबा देवकत्ते, गाेपीनाथ जोंधळे, दयानंद पाटील, अभय मिरकले, सतीश नवटक्के, आशिष तोगरे, अजहर सय्यद, फिरोज शेख, अतिश खुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार पाटील म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना योग्य दरात खत पुरवठा करण्यासाठी कारखाने उभारण्यात आले होते. मात्र, या कारखान्याला घरघर लागली आहे. त्यांना नवसंजिवनी देऊन शेतकऱ्यांना भगीरथ, युरिया या खताचा शासन दराप्रमाणे पुरवठा करणार आहाेत. अहमदपूर तालुक्यात शेती सिंचन क्षेत्रखाली आणण्यासाठी ११ कोटींची बंधारे बांधून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक, धवल आणि हरितक्रांती होणार आहे. रस्ते, वीज, पाणी, मार्केटिंगची व्यवस्था करून जिल्ह्यात टाेमॅटाेचा व्यापार खूप मोठा आहे. आपले टाेमॅटाे रेल्वेने दिल्लीत पोहोचविण्यासाठी व्यवस्था करायची आहे. दूध प्रकल्पामधून दूध, दही, तूप, बटरची विक्री वाढली की शेतकऱ्याच्या दूध व्यवसायाला चांगले दिवस येतील.

शिवभोजन याेजना महत्वाची...

अहमदपूर येथे सुरु करण्यात आलेली पाच रुपयांत शिवभाेजन थाळी याेजना महाविकास आघाडीची महत्वाची आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे म्हणाले, आ. बाबासाहेब पाटील हातात माती घेतली तरी त्याचं सोनं करतात. ते ज्या-ज्या क्षेत्रात गेले त्या-त्या ठिकाणी योजनेला लागलेली घरघर त्यांनी संपुष्टात आणली आहे. त्या व्यवस्थेलाही पुनर्जीवित केले आहे. प्रारंभी शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन झाले. प्रारंभी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या वतीने आ. बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. आडत व्यापारी, हमाल संघटना, महिला संघटनांच्या वतीनेही आमदार पाटील यांचा सत्कार झाला.