शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

खरोश्यातील तलावाला गळती, दुर्गंधीमुळे रोगराईची भीती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:08 IST

खरोसा : काही वर्षांपूर्वी श्रमदानातून निर्माण करण्यात आलेल्या औसा तालुक्यातील खरोसा येथील सार्वजनिक गावतळ्यास गळती लागली आहे. दरम्यान, झाडे- ...

खरोसा : काही वर्षांपूर्वी श्रमदानातून निर्माण करण्यात आलेल्या औसा तालुक्यातील खरोसा येथील सार्वजनिक गावतळ्यास गळती लागली आहे. दरम्यान, झाडे- झुडपे वाढली असून काही जण त्यात कचरा टाकत असल्याने पाण्याची दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

उत्तर प्रदेशातून औसा तालुक्यातील कारला येथे मठाधीश म्हणून वास्तव्याला असलेल्या नाथपंथी नाथ महाराजांनी सन १९१८ च्या दरम्यान खरोसा येथे तलाव बांधण्याची संकल्पना केली. ग्रामस्थांच्या श्रमदानातून सहा महिन्यात गावात तलावाचे काम झाले. त्यामुळे नाथ महाराजांनी भंडारा म्हणून ग्रामस्थांना भोजन दिले, असे सांगितले जात असल्याचे येथील ज्येष्ठ नागरिक विठ्ठलराव खरपडे म्हणाले.

हा तलाव सर्व्हे क्र. २११ मध्ये ५ एकर २ गुंठे गावठाण जागेत बांधण्यात आला. विशेष म्हणजे हा तलाव कुठल्याही सरकारी योजनेतून बांधण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, सिमेंट, वाळू, चुन्याचा वापर न करता केवळ दगड- मातीने बांधण्यात आला आहे. भूकंपानंतर तळ्याच्या सभोवताली गाववस्ती झाली. त्यामुळे या परिसरात नागरिक, पशुधनांचा वावर वाढला.

दरम्यान, या तलावास सध्या गळती लागली आहे. त्यातच वस्तीतील काही जण कचरा टाकण्याबराेबरच परिसराचा वापर शौचासाठी करीत आहेत. त्यामुळे तलावातील पाणी घाण होऊन दुर्गंधी पसरत आहे. त्याचा गावातील नागरिकांना त्रास होत आहे. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन तलावाची दुरुस्ती करावी, तसेच दुर्गंधी थांबण्यासाठी आवश्यक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.

नोंद नसल्याने देखभाल नाही...

आम्ही गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात अभियंत्यांना दुरुस्तीसंदर्भात सांगितले, तेव्हा त्यांनी या तळ्याची नोंद आमच्याकडे नाही. ती कोणत्या विभागाकडे आहे, याची माहिती नसल्याचे सांगितले. तसेच गावातील व्यक्तीने तलावाचा ठेका घेतल्यामुळे आम्ही त्यात ब्लिचिंग पावडर टाकत नाही. त्यामुळे मासे मृत्युमुखी पडतात. पाळूची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. दुरुस्तीसाठी २५ ते ३० लाख लागतील, असे ग्रामसेवक आय. आर. शेख म्हणाले.

प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी...

या तलावाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. येथे सुशोभिकरण करावे. त्यामुळे नागरिक त्याची जपणूक करतील, असे सीताराम भातमोडे, सुभाष तोडकर, अजय साळुंके, राजकुमार तोडकर, शिवशंकर डोके, आत्मलिंग पाटील, विलास पाटील, अशोक खरपडे, दीपक डोके, पाश्यमियाॅ अत्तार म्हणाले.