शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

सासर, माहेरला सांभाळत दिली आरोग्य सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST

भातांगळी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सगीरा जे. ए. पठाण-सिद्दीकी यांचे सासर व माहेर हे लातूरच आहे. माहेरकडील परिस्थिती ...

भातांगळी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सगीरा जे. ए. पठाण-सिद्दीकी यांचे सासर व माहेर हे लातूरच आहे. माहेरकडील परिस्थिती सर्वसाधारण असतानाही त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. भाऊ नसल्याने आई- वडील आणि बहिणींकडे त्याच जबाबदारीने लक्ष देतात. तसेच सासरकडे डॉक्टर पती, ज्येष्ठ सासू-सासरे असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. कोराेनाच्या संकटकाळात स्वत:बरोबर दोन्ही कुटुंबांची काळजी घेत, आरोग्य केंद्राअंतर्गतच्या ग्रामीण आणि शहरी भागांत कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून त्यांनी दिवस-रात्र परिश्रम घेतले. अनेकदा शहरातून काहीजण रात्री-अपरात्री गावात आल्यानंतर त्यांचे स्राव घेणे, विलगीकरण कक्षात ठेवणे असे कार्य करावे लागले. शाळेच्या विलगीकरण केंद्रातील व्यक्तींची तपासणी करण्याबरोबरच काही वेळेस विलगीकरणात एखादी महिला असल्यास तिच्या संरक्षणाची खबरदारीही त्यांनी घेतली.

आशा स्वयंसेविका, एएनएममार्फत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याबरोबरच कंटेन्मेंट झोनला नियमित भेट देणे, काही गुंतागुंत निर्माण झाल्यास तपासणीसाठी लातूरला पाठविणे, समुदाय आरोग्याधिकाऱ्यांच्या मदतीने हाय रिस्कमधील व्यक्तींचा शोध घेणे असे कार्य त्यांनी केले. मोबाईल टीमच्या माध्यमातून त्यांच्या पथकाने ६०० बाधितांना शोधून काढले.

प्रत्येक गावास नियमित भेटी...

जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक गावात ॲन्टी कोरोना फोर्सची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे नवीन व्यक्ती आल्यास तिची सहज माहिती होत असे. तसेच गावातील व्यक्ती बाहेरगावी जाण्यास पायबंद बसत असे. दरम्यान, सर्वांची नजर चुकवून गावात नवीन व्यक्ती कोण आली आहे का, हे समजण्यासाठी आणि रेड झोन शोधण्यासाठी त्या ग्रामपंचायतीचा एकजण, तलाठी, महिला आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत त्या गावात फिरत असत.

गैरसमजुतीने गावकऱ्यांनी टाकले वाळीत...

महापूर येथे मनोविकार असलेला एकजण त्यांच्या घरी आला. तेव्हा गावकऱ्यांनी गावात येऊ दिले नाही. त्यामुळे तो शेतात थांबला. दरम्यान, त्याच्या अंगात ताप भरला. त्यामुळे त्याला कोरोना झाल्याचा गावकऱ्यांनी संशय व्यक्त करीत आम्हाला माहिती दिली. तपासणीसाठी त्याला ‘सर्वोपचार’कडे पाठविण्यात आले; पण अहवाल येईपर्यंत तिथे त्यास ॲडमिट करून घेण्यास नकार देण्यास आला. त्यामुळे त्याला कुठे ठेवायचे असा प्रश्न निर्माण झाला. अखेर शाळेत ठेवण्यात येऊन त्याची भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्याचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला होता, असे डॉ. सगीरा पठाण यांनी सांगितले.

माणुसकीची जपणूक...

प्रत्येकजण आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी कर्तव्य पार पाडत असतो. मात्र, महिला अधिकारी त्यापुढे जाऊन माणुसकी, भावना जपतात. त्यामुळे न्याय मिळतो आणि त्यातून कुठल्याही कामात यश मिळते, असे डॉ. सगीरा पठाण यांनी सांगितले.