शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

४३ महसूल मंडळातील पीकविमाधारक शेतकऱ्यांना मिळणार २५ टक्के अग्रीम

By हरी मोकाशे | Updated: November 10, 2023 21:15 IST

दिवाळी होणार आनंदात : विभागस्तरीय समितीचे निर्देश

लातूर : खरिपात पावसाने ताण दिल्याने सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिकची घट होऊनही पीकविमा कंपनीकडून २५ टक्के अग्रीम देण्यास टाळाटाळ होत होती. दरम्यान, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक झाली. तेव्हा विभागीय आयुक्तांनी ४३ महसूल मंडळातील पीकविमाधारकांना २५ टक्के अग्रीम तत्काळ देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खरीप हंगामात जिल्ह्यात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. ऑगस्टमध्ये पावसाने महिनाभरापेक्षा अधिक दिवस ताण दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ६० महसूल मंडळातील पीकविमाधारकांना २५ टक्के अग्रीम देण्याचे आदेश पीकविमा कंपनीस दिले होते. तेव्हा पीकविमा कंपनीने आक्षेप घेतले होते.

यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी प्रधानमंत्री पीकविमा योजना विभागस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक झाली. या बैठकीस विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक अशा एकूण १२ जणांची उपस्थिती होती. या बैठकीत पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीने ६० पैकी ४३ महसूल मंडळांना अग्रीम देण्यास आम्ही तयार असल्याचे सांगितले. तेव्हा विभागीय आयुक्तांनी उर्वरित १७ महसूल मंडळांमध्ये पावसाचा २१ दिवसांचा खंड नव्हता का अशी विचारणा केली आणि सर्वच महसूल मंडळांना २५ टक्के अग्रीम देण्याचे निर्देश दिले. तेव्हा विमा कंपनीने १७ महसूल मंडळांसाठी पुनर्मूल्यांकन करून सुधारित निर्णय घेण्यासाठी मुदत मागितली आहे.

अग्रीम तत्काळ वाटप करा...जिल्ह्यातील ६० पैकी ४३ महसूल मंडळांतील पीकविमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम तत्काळ वितरित करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी पीकविमा कंपनीस दिले आहेत. उर्वरित १७ महसूल मंडळांचे १७ नोव्हेंबरपर्यंत पुनर्मूल्यांकन करावे आणि त्यांनाही २५ टक्के अग्रीम रक्कम वितरित करावी, असे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.