शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बाजारात हरभऱ्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचा हमीभाव केंद्राकडे कल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST

वलांडी : यंदाच्या रबी हंगामात हरभऱ्याचे उत्पादन वाढण्याबरोबरच दरही आधारभूत किमतीपेक्षा अधिक असल्याने शेतकरी बाजार समितीत हरभरा विक्रीस प्राधान्य ...

वलांडी : यंदाच्या रबी हंगामात हरभऱ्याचे उत्पादन वाढण्याबरोबरच दरही आधारभूत किमतीपेक्षा अधिक असल्याने शेतकरी बाजार समितीत हरभरा विक्रीस प्राधान्य देत होते. आता बाजारपेठेतील भावात घसरण झाल्याने शेतकरी पुन्हा हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा विक्रीसाठी वळले आहेत. परिणामी, देवणी तालुक्यातील वलांडी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या ९०० पैकी ४०६ शेतकऱ्यांनी ५ हजार ७१५ क्विंटल हरभऱ्याची विक्री केली आहे.

वलांडी येथे ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. दोन जानेवारीपासून सदर केंद्रावर हरभरा खरेदी नोंदणी प्रारंभ झाला. केंद्रावर वलांडीसह परिसरातील ९०० शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली. आतापर्यंत या केंद्रावर ९०० पैकी ४०६ शेतकऱ्यांनी ५ हजार ७१६ क्विंटल हरभऱ्याची विक्री केली असल्याचे संचालक बिभीषण भोसले यांनी सांगितले. गेल्या पावसाळ्यात अधिक पाऊस पडल्याने जलसाठे तुडुंब भरले होते. त्याचा लाभ रबी हंगामासाठी झाला. त्यामुळे या परिसरातील रबीचा पेरा जास्त झाला होता. पिकांना पुरेसे पाणी मिळाल्याने उत्पादनही चांगले झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभऱ्याची काढणी केल्यानंतर विक्री करण्यास सुरुवात केली. कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरुवातीपासूनच हरभऱ्याला चांगला दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळाला. केंद्र शासनाने हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल अशी आधारभूत किंमत जाहीर केली होती. त्यामुळे वलांडीसह परिसरातील ९०० शेतकऱ्यांनी येथील हमीभाव केंद्रावर हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली. त्यानुसार नाफेडच्या वतीने शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून २४ फेब्रुवारीपासून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले; परंतु बाजार समितीत हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरवीत बाजार समितीत हरभऱ्याची विक्री केली. दरम्यान, काही दिवसांपासून बाजार समितीतील हरभऱ्याच्या दरात घसरण झाली आहे, बुधवारी हरभऱ्याला ४५०० ते ४६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. त्यामुळे हमीभावाच्या तुलनेत शेतकऱ्यांना किमान ५०० रुपयांपेक्षा अधिकचा फटका क्विंटलमागे बसत असल्याचे चित्र आहे.

नोंदणीस मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा...

हमीभाव केंद्रावर हरभरा विक्री व नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. आता शासनाने नोंदणीचा व खरेदीचा कालावधी वाढविल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बाजारापेक्षा हमीभाव केंद्रावर अधिकचा दर मिळत असल्याने शेतकरी हमीभाव केंद्राकडे वळले असल्याचे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रशेखर महाजन यांनी सांगितले.

आतापर्यंत १ कोटी ५६ लाख वर्ग...

यंदाच्या रबी हंगामात वलांडी येथील देवणी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या हमीभाव खरेदी केंद्रावर ४०६ शेतकऱ्यांचा ५ हजार ७१५ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. त्यापोटी संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर १ कोटी ५६ लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. हरभरा खरेदी नोंदणीस १८ जूनपर्यंत मुदतवाढ मिळाली असून, २५ जूनपर्यंत हरभऱ्याची खरेदी करण्यात येणार असल्याचे संचालक बिभीषण भोसले यांनी सांगितले.