शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

सर्व्हर बंद पडल्यामुळे पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST

अहमदपूर : खरीप हंगामाचा पीक विमा भरण्याची गुरुवारी अंतिम मुदत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऑनलाइन विमा भरण्यासाठी रेलचेल सुरू आहे. ...

अहमदपूर : खरीप हंगामाचा पीक विमा भरण्याची गुरुवारी अंतिम मुदत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऑनलाइन विमा भरण्यासाठी रेलचेल सुरू आहे. दरम्यान, बुधवारी बहुतांश ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पीक विमा भरता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची धावाधाव झाली. दरम्यान, मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अहमदपूर तालुक्यात खरिपाचे ७८ हजार हेक्टर क्षेत्र असून, ९० टक्के पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला असून, ४० हजार हेक्‍टर आहे. त्यापाठोपाठ तूर, ऊस, कापूस, मूग, उडदाचा पेरा आहे. दरम्यान, दोन वर्षांपासून तालुक्यातील सहा मंडळांत सोयाबीनचा अत्यंत कमी विमा आल्याने शेतकरी पीक विमा भरण्यास निरुत्साही दिसत आहेत. पीक विमा भरण्यासाठी १५ जुलै अंतिम तारीख असल्यामुळे आणि दोन दिवसांपासून ऑनलाइन पद्धतीने विमा भरण्यासाठी सर्व्हर डाऊन असल्यामुळे, तसेच इंटरनेटचा वेग कमी असल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे महा-ई- सेवा केंद्रचालकही गाेंधळात पडले आहेत. कागदपत्रे अपलोड होत नसल्यामुळे केंद्र अडचणीत आहेत.

याबाबत महा-ई-सेवा केंद्रांनी इंटरनेट पुरविणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला असता राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे केबल तुटली आहे त्यामुळे इंटरनेटला गती नाही, तसेच राज्यातील शेतकरी याच पोर्टलवर अर्ज करीत असल्यामुळे काही अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. ही तांत्रिक अडचण असली तरी शेतकऱ्यांना गुरुवारी रात्रीपर्यंत विमा भरणे गरजेचे असल्यामुळे समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे पीक विम्याची तारीख वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

इंटरनेटचा वेग कमी...

दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन आहे, तसेच इंटरनेटचा वेग कमी असल्यामुळे कागदपत्रे अपलोड होण्यास अडचणी येत आहेत, असे महा-ई-सेवा केंद्राचे उदय गुंडिले यांनी सांगितले.

मुदत वाढवून द्यावी...

तालुक्यात ९० टक्के पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत. दोन दिवसांपासून चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी पेरणीला लागले आहेत. खरीप पीक विम्याची तारीख वाढवून मिळाल्यास अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल, असे शेतकरी दिलीप महाजन, प्रकाश संपते, विठ्ठल फुलमंटे यांनी सांगितले.

शेतकरी निरुत्साही...

पीक विमा भरूनही दोन वर्षांपासून अहमदपूर तालुक्याला केवळ तूर व ज्वारीचा कमी प्रमाणातील विमा मिळाला. त्यामुळे शेतकरी निरुत्साही आहेत. दहा वर्षांतून केवळ दोनदा चांगला विमा मिळाला. पीक विम्याच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे, असे प्रगतिशील शेतकरी मनोहर पाटील यांनी सांगितले.