शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

सर्व्हर बंद पडल्यामुळे पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST

अहमदपूर : खरीप हंगामाचा पीक विमा भरण्याची गुरुवारी अंतिम मुदत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऑनलाइन विमा भरण्यासाठी रेलचेल सुरू आहे. ...

अहमदपूर : खरीप हंगामाचा पीक विमा भरण्याची गुरुवारी अंतिम मुदत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ऑनलाइन विमा भरण्यासाठी रेलचेल सुरू आहे. दरम्यान, बुधवारी बहुतांश ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पीक विमा भरता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची धावाधाव झाली. दरम्यान, मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अहमदपूर तालुक्यात खरिपाचे ७८ हजार हेक्टर क्षेत्र असून, ९० टक्के पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला असून, ४० हजार हेक्‍टर आहे. त्यापाठोपाठ तूर, ऊस, कापूस, मूग, उडदाचा पेरा आहे. दरम्यान, दोन वर्षांपासून तालुक्यातील सहा मंडळांत सोयाबीनचा अत्यंत कमी विमा आल्याने शेतकरी पीक विमा भरण्यास निरुत्साही दिसत आहेत. पीक विमा भरण्यासाठी १५ जुलै अंतिम तारीख असल्यामुळे आणि दोन दिवसांपासून ऑनलाइन पद्धतीने विमा भरण्यासाठी सर्व्हर डाऊन असल्यामुळे, तसेच इंटरनेटचा वेग कमी असल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे महा-ई- सेवा केंद्रचालकही गाेंधळात पडले आहेत. कागदपत्रे अपलोड होत नसल्यामुळे केंद्र अडचणीत आहेत.

याबाबत महा-ई-सेवा केंद्रांनी इंटरनेट पुरविणाऱ्या कंपनीशी संपर्क साधला असता राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे केबल तुटली आहे त्यामुळे इंटरनेटला गती नाही, तसेच राज्यातील शेतकरी याच पोर्टलवर अर्ज करीत असल्यामुळे काही अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. ही तांत्रिक अडचण असली तरी शेतकऱ्यांना गुरुवारी रात्रीपर्यंत विमा भरणे गरजेचे असल्यामुळे समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे पीक विम्याची तारीख वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

इंटरनेटचा वेग कमी...

दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन आहे, तसेच इंटरनेटचा वेग कमी असल्यामुळे कागदपत्रे अपलोड होण्यास अडचणी येत आहेत, असे महा-ई-सेवा केंद्राचे उदय गुंडिले यांनी सांगितले.

मुदत वाढवून द्यावी...

तालुक्यात ९० टक्के पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित शेतकरी पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत. दोन दिवसांपासून चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी पेरणीला लागले आहेत. खरीप पीक विम्याची तारीख वाढवून मिळाल्यास अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल, असे शेतकरी दिलीप महाजन, प्रकाश संपते, विठ्ठल फुलमंटे यांनी सांगितले.

शेतकरी निरुत्साही...

पीक विमा भरूनही दोन वर्षांपासून अहमदपूर तालुक्याला केवळ तूर व ज्वारीचा कमी प्रमाणातील विमा मिळाला. त्यामुळे शेतकरी निरुत्साही आहेत. दहा वर्षांतून केवळ दोनदा चांगला विमा मिळाला. पीक विम्याच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे, असे प्रगतिशील शेतकरी मनोहर पाटील यांनी सांगितले.