शहरं
Join us  
Trending Stories
1
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
2
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
3
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
4
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
5
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
6
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
7
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
8
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
9
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
10
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
11
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
12
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
13
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
14
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
15
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
16
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
17
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
18
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
19
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
20
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
Daily Top 2Weekly Top 5

तोडणीचा खर्चही पदरी पडत नसल्याने शेतकऱ्यांनी सोडले शेतातच टोमॅटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST

औराद शहाजानी : लाखो रुपये खर्चून औराद शहाजानी परिसरातील शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली; परंतु सततच्या पावसामुळे टोमॅटोस फटका बसला ...

औराद शहाजानी : लाखो रुपये खर्चून औराद शहाजानी परिसरातील शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली; परंतु सततच्या पावसामुळे टोमॅटोस फटका बसला आहे. त्यातच बाजारपेठेत दर कोसळल्याने तोडणीचा खर्चही पदरी पडेनासा झाला आहे. परिणामी, बहुतांश शेतकऱ्यांनी तोडणी न केल्याने टाेमॅटो शेतातील रोपांनाच सडून जात आहेत.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह जिल्ह्यातील वडवळ, किल्लारी, हेर, जानवळ, औसा, लातूरराेड आदी भागात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. जवळपास ५० गावांतील शेकडाे एकर जमिनीवर पावसाळी टोमॅटोचे पीक घेतले जाते. येथील टोमॅटोस राज्यातील प्रमुख बाजारपेठांसह परराज्यातही मागणी असते. व्यापारी या भागात येऊन स्वत: खरेदी करतात. त्यामुळे नगदी पीक म्हणून टोमॅटोस ओळखले जाते.

टोमॅटोसाठी एकरी ७० ते १ लाखापर्यंत खर्च येताे. यंदा लागवड क्षेत्र वाढले असले तरी सततच्या मुसळधार पावसामुळे फळधारणा कमी झाली. अतिपावसामुळे टोमॅटो चिरला गेला. अशा परिस्थितीत बाजारपेठेत मागणी नसल्याने दर घसरले आहेत. सध्या किरकोळ बाजारात २ ते ४ रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. त्यातून लागवडीचाच नव्हे तर तोडणीचाही खर्च निघेनासा झाला आहे. त्यातच इंधनाचे दर वाढल्याने वाहतूक खर्च वाढला आहे.

परिणामी, या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी तोडणीस आलेल्या टोमॅटोची तोडणीही केली नाही. त्यामुळे शेतातच ते सडत आहेत. दरम्यान, गावरान टोमॅटो आंबट जास्त असल्याने जनावरांनाही टाकता येत नाही.

टोमॅटोसाठी खर्च वाढला...

लागवडीसाठी राेपे, खत, औषध लागतात. त्याचा खर्च वाढला आहे. याशिवाय, मजूर, मल्चिंग पेपर, तार, काठी, सुतळीचा खर्च लाखाच्या घरात जातो. सध्या भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी टोमॅटो उत्पादक करीत आहेत.

एक जिल्हा, एक उत्पादनात समावेश...

शासनाच्या एक जिल्हा, एक पीक याेजनेत लातूर जिल्ह्यासाठी टोमॅटोची निवड करण्यात आली आहे. यात पीएमएसएमई या याेजनेचा जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादकांनी लाभ घ्यावा. गट व कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारावेत. त्यासाठी ३५ टक्के अनुदान देण्यात येते.

- राजेंद्र कदम, उपविभागीय कृषी अधिकारी, लातूर.

लागवड जास्त झाल्याने घसरण...

यंदा लागवड जास्त झाली असून, मागणीपेक्षा आवक वाढली आहे. त्यामुळे दर कोसळले आहेत. सततच्या पावसामुळे टोमॅटो चिरला गेला आहे. त्यातच फळमाशीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे दूरच्या बाजारपेठेत हा शेतमाल पाठविता येत नाही, असे खरेदीदार व्यापारी वहाब पटेल म्हणाले.

भाजीपाल्याला भाव नाहीत...

सावरी येथील शेतकरी विठ्ठल अंचुळे म्हणाले की, मी दरवर्षी टोमॅटोची लागवड करतो, तसेच इतर भाजीपाल्याचीही लागवड केली आहे. गत महिन्यापासून कुठल्याही भाजीपाल्याला भाव नाहीत. त्यामुळे उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ लागत नाही. शासनाने हमीभाव द्यावा. त्यामुळे ग्राहकांनाही योग्य भावात भाजीपाला मिळेल आणि शेतकऱ्यांनाही उत्पादन खर्च मिळेल.

पावसाचा परिणाम झाला...

औराद येथील शेतकरी सुधाकर म्हेत्रे म्हणाले की, यंदा टोमॅटो लागवडीनंतर सतत महिनाभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकाची वाढ झाली नाही. जे फळ लागले, ते नंतर अतिपावसाने चिरून सडून गेले. उर्वरित टोमॅटोला बाजारात मागणी नाही.