शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

तोडणीचा खर्चही पदरी पडत नसल्याने शेतकऱ्यांनी सोडले शेतातच टोमॅटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST

औराद शहाजानी : लाखो रुपये खर्चून औराद शहाजानी परिसरातील शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली; परंतु सततच्या पावसामुळे टोमॅटोस फटका बसला ...

औराद शहाजानी : लाखो रुपये खर्चून औराद शहाजानी परिसरातील शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली; परंतु सततच्या पावसामुळे टोमॅटोस फटका बसला आहे. त्यातच बाजारपेठेत दर कोसळल्याने तोडणीचा खर्चही पदरी पडेनासा झाला आहे. परिणामी, बहुतांश शेतकऱ्यांनी तोडणी न केल्याने टाेमॅटो शेतातील रोपांनाच सडून जात आहेत.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह जिल्ह्यातील वडवळ, किल्लारी, हेर, जानवळ, औसा, लातूरराेड आदी भागात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. जवळपास ५० गावांतील शेकडाे एकर जमिनीवर पावसाळी टोमॅटोचे पीक घेतले जाते. येथील टोमॅटोस राज्यातील प्रमुख बाजारपेठांसह परराज्यातही मागणी असते. व्यापारी या भागात येऊन स्वत: खरेदी करतात. त्यामुळे नगदी पीक म्हणून टोमॅटोस ओळखले जाते.

टोमॅटोसाठी एकरी ७० ते १ लाखापर्यंत खर्च येताे. यंदा लागवड क्षेत्र वाढले असले तरी सततच्या मुसळधार पावसामुळे फळधारणा कमी झाली. अतिपावसामुळे टोमॅटो चिरला गेला. अशा परिस्थितीत बाजारपेठेत मागणी नसल्याने दर घसरले आहेत. सध्या किरकोळ बाजारात २ ते ४ रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. त्यातून लागवडीचाच नव्हे तर तोडणीचाही खर्च निघेनासा झाला आहे. त्यातच इंधनाचे दर वाढल्याने वाहतूक खर्च वाढला आहे.

परिणामी, या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी तोडणीस आलेल्या टोमॅटोची तोडणीही केली नाही. त्यामुळे शेतातच ते सडत आहेत. दरम्यान, गावरान टोमॅटो आंबट जास्त असल्याने जनावरांनाही टाकता येत नाही.

टोमॅटोसाठी खर्च वाढला...

लागवडीसाठी राेपे, खत, औषध लागतात. त्याचा खर्च वाढला आहे. याशिवाय, मजूर, मल्चिंग पेपर, तार, काठी, सुतळीचा खर्च लाखाच्या घरात जातो. सध्या भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकारने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी टोमॅटो उत्पादक करीत आहेत.

एक जिल्हा, एक उत्पादनात समावेश...

शासनाच्या एक जिल्हा, एक पीक याेजनेत लातूर जिल्ह्यासाठी टोमॅटोची निवड करण्यात आली आहे. यात पीएमएसएमई या याेजनेचा जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादकांनी लाभ घ्यावा. गट व कंपनीच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारावेत. त्यासाठी ३५ टक्के अनुदान देण्यात येते.

- राजेंद्र कदम, उपविभागीय कृषी अधिकारी, लातूर.

लागवड जास्त झाल्याने घसरण...

यंदा लागवड जास्त झाली असून, मागणीपेक्षा आवक वाढली आहे. त्यामुळे दर कोसळले आहेत. सततच्या पावसामुळे टोमॅटो चिरला गेला आहे. त्यातच फळमाशीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे दूरच्या बाजारपेठेत हा शेतमाल पाठविता येत नाही, असे खरेदीदार व्यापारी वहाब पटेल म्हणाले.

भाजीपाल्याला भाव नाहीत...

सावरी येथील शेतकरी विठ्ठल अंचुळे म्हणाले की, मी दरवर्षी टोमॅटोची लागवड करतो, तसेच इतर भाजीपाल्याचीही लागवड केली आहे. गत महिन्यापासून कुठल्याही भाजीपाल्याला भाव नाहीत. त्यामुळे उत्पादन आणि खर्चाचा ताळमेळ लागत नाही. शासनाने हमीभाव द्यावा. त्यामुळे ग्राहकांनाही योग्य भावात भाजीपाला मिळेल आणि शेतकऱ्यांनाही उत्पादन खर्च मिळेल.

पावसाचा परिणाम झाला...

औराद येथील शेतकरी सुधाकर म्हेत्रे म्हणाले की, यंदा टोमॅटो लागवडीनंतर सतत महिनाभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकाची वाढ झाली नाही. जे फळ लागले, ते नंतर अतिपावसाने चिरून सडून गेले. उर्वरित टोमॅटोला बाजारात मागणी नाही.