शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीतील शेडचे निष्कृष्ट काम; पेटलेल्या चितेवर पावसाचे पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST

चाकूर : शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीतील शेडचे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक वर्षांपासून समस्या आहेत. पावसाचे ...

चाकूर : शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीतील शेडचे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक वर्षांपासून समस्या आहेत. पावसाचे पाणी शेडच्या मध्यभागातून पेटलेल्या चितेवर पडते आणि प्रेताची अवहेलना होते. या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नाही. सोमवारी रात्री भर पावसात अंत्यसंस्कार करताना पेटविलेल्या चितेवर छतावरून पावसाचे पाणी पडत होते, याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

चाकूर शहरातील एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार सोमवारी रात्री ९ च्या सुमारास सार्वजनिक स्मशानभूमीत गेले. स्मशानभूमीत प्रेतावर सरण रचण्यात आले. प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी भडाग्नी देण्यात आली. दरम्यान, पावसाने चांगलाच जोर धरला. शवदाहिनीत मध्यभागातून पाऊस पडत होता. तर प्रेत जाळण्यासाठी अग्नी पेटविण्यात आला. वरून पाऊस थेट चितेवर पडत होता. त्यामुळे स्मशानभूमीतील सुभाष मुकूटमोरे हे चितेवर पाणी पडू नये. म्हणून टोपल्यात पाणी घेण्याचा प्रयत्न करत होते. पावसाचा चांगलाच जोर असल्याने पेटलेल्या चितेवर पाणी पडत होते. नातेवाइकांना पावसात थांबण्यासाठी स्मशानभूमीत आडोसा नाही. या परिस्थितीमुळे मित्र, नातेवाइकांनी घराकडे जाण्याला प्राधान्य दिले. मोजकेच जवळचे लोक पावसातच थांबून प्रेत पूर्णपणे जळण्यासाठी प्रयत्न करत होते. त्या वेळी पावसाचे पाणी चितेवर पडू नये म्हणून टोपले धरणारा मुकूटमोरे यांच्या हाताला आगीची झळ बसली. स्मशानभूमीत २००७ मध्ये एक पत्र्याची शवदाहिनी करण्यात आली. त्यानंतर सन २००९ मध्ये सिमेंटची शवदाहिनी ग्रामपंचायतीच्या काळात तयार करण्यात आली. या शववाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिन्यांत प्रेतावर अंत्यसंस्कार करणे अवघड आहे. २०१५ मध्ये ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले. परंतु, या निकृष्ट बांधकामाकडे आजतागायत कोणाचेही लक्ष गेले नाही. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी जमलेल्या लोकांना थांबण्यासाठी साधी शेडसुद्धा या ठिकाणी नाही. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. स्मशानभूमीत बांधण्यात आलेल्या या निकृष्ट दर्जाच्या शवदाहिनीच्या कामाची चौकशी होणार काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सध्या नगरपंचायतीवर प्रशासक आहे. शवदाहिनीच्या वरच्या भागातून पाणी गळते. त्याची तत्काळ दुरुस्ती करून घेण्यात येणार आहे. नवीन शवदाहिनीसाठी प्रयत्न सुरू आहेत. - अजिंक्य रणदिवे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, चाकूर