शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
6
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
7
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
8
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
9
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
10
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
11
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
12
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
13
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
14
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
15
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
16
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
17
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
18
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
19
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
20
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या गुणांवरच होणार अकरावी प्रवेश प्रक्रिया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:24 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या लेखी परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला, तर अकरावी प्रवेशासाठी २१ ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या लेखी परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला, तर अकरावी प्रवेशासाठी २१ ऑगस्ट रोजी सीईटी घेण्यात येणार होती. मात्र, न्यायालयाने सीईटी परीक्षा रद्द केली असून, दहावीच्या गुणांवरच अकरावी वर्गाचे प्रवेश होणार आहे. जिल्ह्यात अकरावी कला शाखेच्या १६ हजार २००, विज्ञान शाखा १७ हजार ६४०, वाणिज्य ५ हजार ४० तर एमसीव्हीसी अभ्यासक्रमाच्या २ हजार ६० जागा आहेत, तर दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४० हजार २८१ आहे. त्यामुळे सर्वच जागांवर प्रवेश होण्याची शक्यता आहे.

६५२ शाळांचा शंभर टक्के निकाल...

जिल्ह्यातील ६६१ पैकी ६५२ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला असून, २२ हजार ८१९ मुले तर १७ हजार ४६२ मुली असे एकूण ४० हजार २८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर झाला असल्याने विद्यार्थी उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक आहे.

जिल्ह्यात १९७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण...

लातूर विभागीय शिक्षण मंडळांतर्गत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील २४, उस्मानाबाद ५७ तर लातूर जिल्ह्यातील १९७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत, तर विभागात १२ हजार ३९३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत. दरम्यान, दहावीच्या गुणांवरच प्रवेश होणार असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.

आयटीआयच्या ३ हजार ६०४ जागा...

लातूर जिल्ह्यात ११ शासकीय तर ८ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या आहे. यामध्ये शासकीय आणि खाजगी मिळून ३ हजार ६०४ प्रवेश क्षमता आहे. दरम्यान, आयटीआयची प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सुरू असून, गुणवत्ता यादीनुसारच आयटीआयची प्रवेश प्रक्रिया होणार आहे.

तंत्रनिकेतनची १ हजार ५०० प्रवेश क्षमता...

जिल्ह्यात दोन शासकीय तर १० खाजगी तंत्रनिकेतन महाविद्यालये आहेत. शासकीयमध्ये ८०० तर खाजगी तंत्रनिकेतनमध्ये ७०० प्रवेश क्षमता असून, अर्ज प्रक्रिया सुरू असून, गुणवत्ता यादीनुसारच प्रवेश होणार असल्याचे प्राचार्य डॉ.के.एम. बकवाड यांनी सांगितले.

अकरावी, आयटीआय, तंत्रनिकेतन एकूण प्रवेश क्षमता - ४६,१४४

कला शाखा - १६,२००

विज्ञान शाखा - १७,६४०

वाणिज्य शाखा - ५,०४०

एमसीव्हीसी शाखा - २,०६०

तंत्रनिकेतन - १,५००

आयटीआय - ३,६०४

गुणांवरच होणार विद्यार्थ्यांचे प्रवेश...

दहावीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झालेला आहे. सीईटी रद्द झाल्याने मेरिटनुसार अकरावीसाठी प्रवेश दिले जातील. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. - प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, शाहू महाविद्यालय

विद्यार्थ्यांना महाविद्यालयात नाेंदणी करावी लागणार असून त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतरच अकरावी वर्गासाठी प्रवेश दिले जातील. - प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, दयानंद महाविद्यालय

अकरावीसाठी दरवर्षी गुणवत्ता यादीनुसारच प्रवेश देण्यात येतात. यंदा सीईटी होणार होती. मात्र, ती रद्द करण्यात आली असल्याने शासनाच्या निर्देशानुसारच प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाईल. प्राचार्य. डॉ. सिद्राम डोंगरगे, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय

शासन निर्णयानुसार महाविद्यालयांना सूचना...

सीईटी रद्द करण्यात आली असली तरी शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांना सूचना केल्या जातील. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया पार पडेल. जिल्ह्यात ४१ हजार ४० जागा आहेत. - डॉ. गणपत मोरे, शिक्षण उपसंचालक