शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या गुणांवरच होणार अकरावी प्रवेश प्रक्रिया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:24 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या लेखी परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला, तर अकरावी प्रवेशासाठी २१ ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या लेखी परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला, तर अकरावी प्रवेशासाठी २१ ऑगस्ट रोजी सीईटी घेण्यात येणार होती. मात्र, न्यायालयाने सीईटी परीक्षा रद्द केली असून, दहावीच्या गुणांवरच अकरावी वर्गाचे प्रवेश होणार आहे. जिल्ह्यात अकरावी कला शाखेच्या १६ हजार २००, विज्ञान शाखा १७ हजार ६४०, वाणिज्य ५ हजार ४० तर एमसीव्हीसी अभ्यासक्रमाच्या २ हजार ६० जागा आहेत, तर दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ४० हजार २८१ आहे. त्यामुळे सर्वच जागांवर प्रवेश होण्याची शक्यता आहे.

६५२ शाळांचा शंभर टक्के निकाल...

जिल्ह्यातील ६६१ पैकी ६५२ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला असून, २२ हजार ८१९ मुले तर १७ हजार ४६२ मुली असे एकूण ४० हजार २८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर झाला असल्याने विद्यार्थी उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक आहे.

जिल्ह्यात १९७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण...

लातूर विभागीय शिक्षण मंडळांतर्गत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील २४, उस्मानाबाद ५७ तर लातूर जिल्ह्यातील १९७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत, तर विभागात १२ हजार ३९३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण आहेत. दरम्यान, दहावीच्या गुणांवरच प्रवेश होणार असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.

आयटीआयच्या ३ हजार ६०४ जागा...

लातूर जिल्ह्यात ११ शासकीय तर ८ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या आहे. यामध्ये शासकीय आणि खाजगी मिळून ३ हजार ६०४ प्रवेश क्षमता आहे. दरम्यान, आयटीआयची प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सुरू असून, गुणवत्ता यादीनुसारच आयटीआयची प्रवेश प्रक्रिया होणार आहे.

तंत्रनिकेतनची १ हजार ५०० प्रवेश क्षमता...

जिल्ह्यात दोन शासकीय तर १० खाजगी तंत्रनिकेतन महाविद्यालये आहेत. शासकीयमध्ये ८०० तर खाजगी तंत्रनिकेतनमध्ये ७०० प्रवेश क्षमता असून, अर्ज प्रक्रिया सुरू असून, गुणवत्ता यादीनुसारच प्रवेश होणार असल्याचे प्राचार्य डॉ.के.एम. बकवाड यांनी सांगितले.

अकरावी, आयटीआय, तंत्रनिकेतन एकूण प्रवेश क्षमता - ४६,१४४

कला शाखा - १६,२००

विज्ञान शाखा - १७,६४०

वाणिज्य शाखा - ५,०४०

एमसीव्हीसी शाखा - २,०६०

तंत्रनिकेतन - १,५००

आयटीआय - ३,६०४

गुणांवरच होणार विद्यार्थ्यांचे प्रवेश...

दहावीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झालेला आहे. सीईटी रद्द झाल्याने मेरिटनुसार अकरावीसाठी प्रवेश दिले जातील. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. - प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, शाहू महाविद्यालय

विद्यार्थ्यांना महाविद्यालयात नाेंदणी करावी लागणार असून त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. त्यानंतरच अकरावी वर्गासाठी प्रवेश दिले जातील. - प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, दयानंद महाविद्यालय

अकरावीसाठी दरवर्षी गुणवत्ता यादीनुसारच प्रवेश देण्यात येतात. यंदा सीईटी होणार होती. मात्र, ती रद्द करण्यात आली असल्याने शासनाच्या निर्देशानुसारच प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाईल. प्राचार्य. डॉ. सिद्राम डोंगरगे, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय

शासन निर्णयानुसार महाविद्यालयांना सूचना...

सीईटी रद्द करण्यात आली असली तरी शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयांना सूचना केल्या जातील. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया पार पडेल. जिल्ह्यात ४१ हजार ४० जागा आहेत. - डॉ. गणपत मोरे, शिक्षण उपसंचालक