शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

चार वर्गांसाठी आठ बाय आठची एकच खोली! आर्वी गायरानातील मनपाची शाळा की 'कोंडवाडा'

By हणमंत गायकवाड | Updated: January 15, 2024 16:26 IST

वर्गखोल्या बांधून देण्याची आणि काही मूलभूत सुविधा पुरवण्याची मुख्याध्यापकांनी वारंवार विनंती केली. परंतु, त्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

 

लातूर : शहरातील क्वाईल नगर झोपडपट्टीतून आर्वी गायरानामध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या मुलांसाठी मनपाच्या वतीने शाळा क्रमांक १० चालविली जाते. मात्र, या शाळेला ना इमारत, ना वर्गखोल्या, ना स्वच्छतागृह, ना किचन शेड. आठ बाय आठच्या एका खोलीत पहिली ते चौथीपर्यंतचे चार वर्ग चालविले जात असून, दाटीवाटीने बसवून ५३ मुलांना शिकविण्याची कसरत या शाळेतील दोन शिक्षकांना क1रावी लागत आहे.

वर्गखोल्या बांधून देण्याची आणि काही मूलभूत सुविधा पुरवण्याची मुख्याध्यापकांनी वारंवार विनंती केली. परंतु, त्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. लातूर शहरातून झोपडपट्टीतील नागरिक आर्वी गायरानांमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर पुनर्वसनात घरे बांधून देण्यात आली. त्यातील एका घरामध्ये मनपाची शाळा क्रमांक १० चालविली जात आहेः परंतु या वर्गखोलीची अवस्था बिकट झालेली आहे.

उंदीर-घुशीने पोखरले...उंदीर आणी घुशीने विटा-मातीचे बांधकाम पोखरून टाकले आहे. धोकादायक अवस्थेमध्ये मुलांची शाळा तिथे भरवली जाते.आठ बाय आठच्या खोलीमध्ये पहिली ते चौथीचे विद्यार्थी बसवले जातात आणि सहा बाय आठच्या खोलीत शालेय पोषण आहाराचे साहित्य ठेवलेले आहे.

या आहेत मागण्या... वर्गखोल्या बांधून द्याव्यातकार्यालय व किचनसाठी स्वतंत्र खोली असावी.विद्यार्थ्यांसाठी डेस्क असावेत. शिकविण्यासाठी बोर्ड हवेत.शाळेला कम्पाऊंड वॉल, मजबूत गेट असावे.मुला-मुलींसाठी स्वतंत्र टॉयलेट असावे.किमान चार वर्गखोल्या असाव्यात.आदी मागण्यांचे निवेदन मनपा प्रशासनाला मुख्याध्यापकांनी वारंवार दिलेल्या आहेत.

मुख्याध्यापक म्हणाले...शाळेसाठी दोन वर्गखोल्या आहेत. त्यापैकी एका खोलीत शालेय पोषण आहाराचे साहित्य आणि दुसरे वर्ग भरविले जाते. एक खोली ६ बाय ८ ची असून, दुसरी खोली ८ बाय ८ ची आहे. दोन्ही खोल्या नादुरुस्त आहेत. धोकादायक आहेत. एका खोलीत शालेय पोषण आहाराचे साहित्य तर दुसऱ्या खोलीत वर्ग भरविले जातात.  खोल्या मोडकळीस आल्याने वर्ग भरविण्याची भीती वाटते, असे मुख्याध्यापक अमोल इंद्राळे म्हणाले.

मुख्याध्यापकांचा पाठपुरावा...मुख्याध्यापकांनी आयुक्त, उपायुक्त व शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदने पाठवून वर्गखोली बांधून देण्याची मागणी केली. परंतु, त्या मागणीकडे दुर्लक्ष आहे. शाळेचे मुख्याध्यापक अमोल इंद्राळे यांनी १३ जून २०२२, २७ जानेवारी २०२२ आणि २१ मार्च २०२२ रोजी पत्र पाठवून वर्गखोली बांधकामाची तसेच शाळेची इमारत धोकादायक असल्याचे प्रशासनाला कळविले आहे. मात्र, त्यांच्या या मागणीची दखल आजपर्यंत घेतलेली नाही.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिकाEducation Sectorशिक्षण क्षेत्र