शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

खाद्यतेल, गॅस, पेट्रोलचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:19 IST

सध्याला भाजीमडईतील पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात असल्याने, कष्टकऱ्यांच्या ताटात भाज्या दिसून येत आहेत. मागील काही दिवसांमध्ये गॅस, पेट्रोल व ...

सध्याला भाजीमडईतील पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात असल्याने, कष्टकऱ्यांच्या ताटात भाज्या दिसून येत आहेत. मागील काही दिवसांमध्ये गॅस, पेट्रोल व डिझेलचे दर प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामध्ये भर म्हणून डाळींचे दरही वधारले आहेत. घरगुती गॅसच्या किंमत ८५० रुपयांच्या घरात गेली आहे. पेट्रोलने तर चक्क शंभरी गाठल्याने मध्यमवर्गीयांच्या खिशाला झळ बसत आहे. अशा स्थितीत हातावर पोट असलेल्या, असंघटित क्षेत्रातील कामगारवर्गावर उपासमारीचीच वेळ आली आहे. त्यातच मार्चअखेर असल्याने महावितरण कंपनीकडून थकलेल्या वीज बिलापोटी वीज पुरवठाच खंडित केला जात आहे. वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी तगादा लावत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने, मागील दोन महिन्यांपासून सामान्यांचे महिन्याचे बजेट काेलमडले आहे.

आणि डाळीही महागल्या...

डाळीचे दर दिवसेंदिवस वधारत आहेत. अशात बाजारात सध्याला भाजीपाला सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात मिळत आहे. परिणामी, काही प्रमाणात नागरिकांमध्ये समाधान व्यक्त हेत आहे. मात्र, आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. भाजीपालासुद्धा महाग होण्याची चिन्हे आहेत. सध्याला तूरदाळ १०५, उडीद १००, मूग १००, मसूर डाळ ८५, चना डाळ प्रतिकिलो ६५ तर पामतेल १२५, करडी तेल २००, शेंगदाणा तेल १७०, सोयाबीन तेल १४० , सूर्यफूल तेलाचा प्रतिकिलाेचा दर १५० रुपये आहे. परिणामी, सामान्य नागरिकांसह छोटे हॉटेलचालक, खानावळ व्यावसायिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. दर वाढविले तर ग्राहक दुरावेल या भीतीपाेटी दरही वाढविता येत नाहीत. गतवर्षी कोरोनाच्या काळात बिघडलेले आर्थिक गणित अजूनही सुधारले नाही.

शेतीच्या मशागतीवर परिणाम...

डिझेलचे दर वाढल्याने शेतातील उन्हाळी मशागतीच्या कामासाठी नांगरटीच्या खर्चात यंदा दीडपट वाढ झाली आहे. मागील वर्षी टॅक्टरने नांगरटीचा एकरी दर १ हजार २०० हाेता. यंदा डिझेलच्या किमती वाढल्याने १ हजार ८०० रुपयांवर दर गेला आहे. यातून शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. आता शेतीचा खर्चही वाढला आहे, असे शेतकरी ज्ञानेश्वर नारागुडे म्हणाले, तर मागील दोन महिन्यांपासून खाद्यतेल, डाळ आणि गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ग्राहकांसाठी खाद्यपदार्थ तयार करताना प्रतिप्लेट मागील वर्षाच्या तुलनेत यंदा खर्च जास्तीचा येत आहे. दरवाढ केल्यास ग्राहक कमी होईल, या भीतीपोटी थोड्याफार मिळणाऱ्या नफ्यावर व्यवसाय करावा लागत आहे. असे हाॅटेल चालक आकाश हजारे म्हणाले.