शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

ठिबक सिंचन अनुदान खात्यावर जमा होईना; शेतकरी मेटकुटीला!

By हरी मोकाशे | Updated: February 3, 2024 17:23 IST

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना : लाभार्थ्यांकडून वारंवार चौकशी सुरू

लातूर : शेतीसाठी पाण्याचा काटेकोरपणे वापर व्हावा आणि सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अनुदानावर ठिबक, तुषार संच दिले जाते. वर्ष उलटत आले तरी अद्यापही जिल्ह्यातील ५ हजार ७२० शेतकऱ्यांचे अनुदान मिळाले नाही. परिणामी, लाभार्थी मेटकुटीला आले असून, वारंवार चौकशी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

पाण्याचा होणारा अतिवापर टाळण्यासाठी आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध करून शेतीचा विकास साधण्यासाठी शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून ठिबक, तुषार सिंचन योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या कालावधीत शेती पिकांना आवश्यक प्रमाणात पाणी देऊन उत्पादन घेता येते. पिकांना गरजेपुरते पाणी मिळाल्याने पाण्याची बचत होते. याशिवाय, तणांची वाढ रोखण्यास मदत होते. त्यातून उत्पादनात वाढ होऊन आर्थिक स्तर उंचाविण्यास मदत होते. योजनेसंदर्भात सातत्याने जनजागृती केल्याने आणि काळाची गरज ओळखून बहुतांश शेतकरी ठिबक, तुषार सिंचनचा वापर करीत आहेत. मात्र, योजनेचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने मोठी आर्थिक समस्या निर्माण होत आहे.

५७२० लाभार्थ्यांचे अनुदान थकीत..प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या वर्षात जिल्ह्यातील २१ हजार ६५७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यातील बहुतांश अर्ज रद्द झाले. आतापर्यंत एकूण ५ हजार ७२० शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ठिबक अथवा तुषार सुरू केले आहे. वर्ष उलटत आले तरी अद्यापही अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही.

सर्वाधिक लाभार्थी निलंगा तालुक्यात...तालुका - लाभार्थी संख्याअहमदपूर - ४६५औसा - ७२१चाकूर - ३८६देवणी - ५३३जळकोट - २३९लातूर - ७०७निलंगा - १५३४रेणापूर - ३१९शिरूर अनंतपाळ - २२९उदगीर - ५८७एकूण - ५७२०

गतवर्षीच्या २५१ शेतकऱ्यांनाही प्रतीक्षा...सन २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील एकूण २० हजार १७५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नाेंदणी केली होती. त्यापैकी १२ हजार ६१९ शेतकऱ्यांचे अर्ज विविध कारणांनी रद्द झाले होते. केवळ ७ हजार ५५६ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले होते. त्यापैकी ७ हजार २९१ लाभार्थ्यांना डिसेंबरअखेरीस अनुदान वाटप करण्यात आले. अद्यापही २५१ शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित आहे.

सिंचन योजनेसाठी ८० टक्के अनुदान...प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत लाभार्थ्यास हेक्टरी ८० टक्के अनुदान देण्यात येते. त्यातील ५५ टक्के अनुदान हे केंद्र शासनाकडून दिले जाते. तर उर्वरित २५ टक्के अनुदान मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत देण्यात येते. लाभार्थ्यांस केवळ २० टक्के पैसे भरावे लागतात.

निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल...प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास ५ हजार ९७१ लाभार्थ्यांचे अनुदान थकीत आहे. त्यासाठी निधीची आवश्यक आहे. निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच निधी उपलब्ध होईल आणि अनुदान जमा करण्यात येईल.- शिवसांब लाडके, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूर