शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

ठिबक सिंचन अनुदान खात्यावर जमा होईना; शेतकरी मेटकुटीला!

By हरी मोकाशे | Updated: February 3, 2024 17:23 IST

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना : लाभार्थ्यांकडून वारंवार चौकशी सुरू

लातूर : शेतीसाठी पाण्याचा काटेकोरपणे वापर व्हावा आणि सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अनुदानावर ठिबक, तुषार संच दिले जाते. वर्ष उलटत आले तरी अद्यापही जिल्ह्यातील ५ हजार ७२० शेतकऱ्यांचे अनुदान मिळाले नाही. परिणामी, लाभार्थी मेटकुटीला आले असून, वारंवार चौकशी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

पाण्याचा होणारा अतिवापर टाळण्यासाठी आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध करून शेतीचा विकास साधण्यासाठी शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून ठिबक, तुषार सिंचन योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या कालावधीत शेती पिकांना आवश्यक प्रमाणात पाणी देऊन उत्पादन घेता येते. पिकांना गरजेपुरते पाणी मिळाल्याने पाण्याची बचत होते. याशिवाय, तणांची वाढ रोखण्यास मदत होते. त्यातून उत्पादनात वाढ होऊन आर्थिक स्तर उंचाविण्यास मदत होते. योजनेसंदर्भात सातत्याने जनजागृती केल्याने आणि काळाची गरज ओळखून बहुतांश शेतकरी ठिबक, तुषार सिंचनचा वापर करीत आहेत. मात्र, योजनेचे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने मोठी आर्थिक समस्या निर्माण होत आहे.

५७२० लाभार्थ्यांचे अनुदान थकीत..प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या वर्षात जिल्ह्यातील २१ हजार ६५७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यातील बहुतांश अर्ज रद्द झाले. आतापर्यंत एकूण ५ हजार ७२० शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ठिबक अथवा तुषार सुरू केले आहे. वर्ष उलटत आले तरी अद्यापही अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही.

सर्वाधिक लाभार्थी निलंगा तालुक्यात...तालुका - लाभार्थी संख्याअहमदपूर - ४६५औसा - ७२१चाकूर - ३८६देवणी - ५३३जळकोट - २३९लातूर - ७०७निलंगा - १५३४रेणापूर - ३१९शिरूर अनंतपाळ - २२९उदगीर - ५८७एकूण - ५७२०

गतवर्षीच्या २५१ शेतकऱ्यांनाही प्रतीक्षा...सन २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील एकूण २० हजार १७५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नाेंदणी केली होती. त्यापैकी १२ हजार ६१९ शेतकऱ्यांचे अर्ज विविध कारणांनी रद्द झाले होते. केवळ ७ हजार ५५६ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले होते. त्यापैकी ७ हजार २९१ लाभार्थ्यांना डिसेंबरअखेरीस अनुदान वाटप करण्यात आले. अद्यापही २५१ शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित आहे.

सिंचन योजनेसाठी ८० टक्के अनुदान...प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत लाभार्थ्यास हेक्टरी ८० टक्के अनुदान देण्यात येते. त्यातील ५५ टक्के अनुदान हे केंद्र शासनाकडून दिले जाते. तर उर्वरित २५ टक्के अनुदान मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत देण्यात येते. लाभार्थ्यांस केवळ २० टक्के पैसे भरावे लागतात.

निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल...प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जवळपास ५ हजार ९७१ लाभार्थ्यांचे अनुदान थकीत आहे. त्यासाठी निधीची आवश्यक आहे. निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच निधी उपलब्ध होईल आणि अनुदान जमा करण्यात येईल.- शिवसांब लाडके, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूर