शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

हॉटेल उघडले असले तरी जिभेचे लाड नकोत; आला पावसाळा, पोट सांभाळा, सात्विक आहाराकडे हवे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : पावसाळ्यात अग्नीमंद असतो. भूक कमी लागते. या मोसमात प्रतिकारशक्ती कमी असल्याने सकस आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : पावसाळ्यात अग्नीमंद असतो. भूक कमी लागते. या मोसमात प्रतिकारशक्ती कमी असल्याने सकस आणि सात्विक आहाराकडे लक्ष देण्याची गरज असते. त्यामुळे तळलेले, उघड्यावर ठेवलेले अन् गोड पदार्थ खाणे टाळायला हवेत, असा सल्ला आयुर्वेद तसेच आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

कोरोनामुळे हाॅटेल्स आणि रेस्टाॅरंट बंद होती. त्यामुळे अनेकांना जीभेचे चोचले पुरवता आले नाहीत. आता हाॅटेल्स सुरु झाली आहेत. परंतु, पावसाळा असल्याने जीभेचे चोचले पुरविणे आणखी काही दिवस टाळावे, असा सल्ला आहार आणि आयुर्वेद तज्ज्ञांनी दिला आहे. आहार आणि दिनचर्या नियमित नसल्याने पावसाळ्यात रोगराई पसरू शकते. ही रोगराई टाळण्यासाठी शुद्ध पाणी आणि सकस आहार महत्त्वाचा आहे. आहारात ज्वारीची भाकरी, मूगडाळ आणि फळांचा वापर गरजेनुसार करावा, असाही सल्ला दिला आहे.

रस्त्यावरील उघडे ठेवलेले अन्न नकोच

पावसाळ्यात अनेकजण तळलेल्या पदार्थांवर अर्थात भजींवर ताव मारतात. परंतु, हे पदार्थ खाणे हानिकारक आहे. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू व अन्य जलजन्य आजार उद्भवतात. त्यामुळे शुद्ध पाणी आणि सकस आहार घेणे आवश्यक आहे. प्रोटीनसाठी मांसाहार आवश्यक आहे. परंतु, या मोसमामध्ये त्याचा वापर कमी प्रमाणात होणे गरजेचे असते. मांसाहार जड खाद्यपदार्थ आहे. या मोसमात मीठाचे प्रमाणही कमी असायला हवे. हाॅटेलमधील तळीव पदार्थ सेवन करणे टाळले पाहिजे.

पावसाळ्यात अग्नीमंद असतो. भूक कमी लागते. त्यामुळे जड अन्न खाणे टाळायला हवे. मांसाहार, तळलेले आणि उघड्यावर ठेवलेले पदार्थ खाऊ नयेत. दिनचर्या नियमित असावी. व्यायाम, योगा, विपश्यना करावी. प्रतिकारशक्ती कमी असलेला हा मोसम आहे. त्यामुळे या हंगामात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

- डाॅ. सुधीर बनशेळकीकर, आयुर्वेद

पावसाळ्यात प्रतिकारशक्ती कमी असते. सर्दी, ताप, खोकला असे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे सकस आहार घेणे गरजेचे. व्यायामावरही लक्ष असणे आवश्यक. सफरचंद, डाळिंब, जांभूळ, पपई आदी फळे आहारात घ्यावीत. कच्चे सलाड खाण्याऐवजी उकडलेले सलाड घेणे फायदेशीर ठरेल. मीठ अल्प आणि कोमट पाण्याचा वापर आवश्यक.

- डाॅ. नितील लहाने, आहारतज्ज्ञ