शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पाॅलिटेक्निकनंतर नोकरी मिळते का रे भाऊ? ३४०० जागांसाठी २४०० विद्यार्थ्यांचे अर्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST

लातूर : मागील काही वर्षांपासून पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली होती. यावर्षी या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याच्या प्रमाणात ...

लातूर : मागील काही वर्षांपासून पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली होती. यावर्षी या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याच्या प्रमाणात काहीअंशी वाढ झाली असून, ३ हजार ४०० जागांसाठी २ हजार ४०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

लातूर जिल्ह्यात १३ तंत्रनिकेतन असून, यामध्ये २ शासकीय तर ११ खासगी आहेत. शासकीयमध्ये ८२० विद्यार्थी क्षमता असून, खासगी महाविद्यालयात २ हजार ५८० क्षमता आहे. यंदाच्या वर्षांत संगणक, सिव्हिल, मॅकेनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्टॉनिक्स अन्ड कम्युनिकेशन, ऑटोमोबाइल या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. मागील काही वर्षांत पॉलिटेक्निककडे प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी झाले होते. परिणामी, काही खासगी महाविद्यालये बंद करण्यात आली. मात्र, आता पुन्हा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे.

एकूण पॉॅलिटेक्निक महाविद्यालये - १३

एकूण प्रवेश क्षमता - ३४००

एकूण प्रवेश अर्ज - २४००

पॉलिटेक्निक महाविद्यालये -

शासकीय - ०२

खाजगी -११

महाविद्यालयात प्रवेश क्षमता -

शासकीय - ८२०

खासगी - २५८०

संगणक, इलेक्ट्रीककडे विद्यार्थ्यांचा ओढा...

दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ओढा संगणक आणि इलेक्ट्रीकल या दोन शाखांकडे सर्वाधिक आहे. रोजगाराची शाश्वती असल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढत आहे. या दोन शाखांना विद्यार्थ्यांची पसंती आहे.

म्हणून पॉलिटेक्निकला पसंती...

लहानपणापासूनच अभियंता होण्याची इच्छा होती. दहावीला चांगले गुणही मिळाले आहेत. त्यामुळे पॉलिटेक्निकला प्रवेश घेणार आहे. अर्जही भरला असून, गुणवत्ता यादीची प्रतीक्षा आहे. आवडीची संगणक शाखा मिळेल अशी अपेक्षा आहे. गुणवत्ता यादीनंतरच चित्र स्पष्ट होईल. - मानसी महामुनी, विद्यार्थिनी

अनेकांचा ओढा विज्ञान, वाणिज्य, कला शाखेकडे असतो. मात्र, पहिल्यापासून इंजिनिअर होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे इलेक्ट्राॅनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन शाखेसाठी अर्ज दाखल केला आहे. दहावीच्या गुणांमुळे आवडीचे कॉलेज मिळेल. इंजिनिअर होऊन बाहेर देशात नोकरी करण्याचे स्वप्न असल्याने पॉलिटेक्निक करीत आहे. - बालाजी जाधव, विद्यार्थी

प्राचार्य म्हणतात...

विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निकडे प्रतिसाद वाढत चालला आहे. तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीची हमी असते. त्यातच महाविद्यालयात कॅम्पस येत असल्याने विद्यार्थी तंत्रनिकेतनकडे आकर्षित होत आहे. नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची संधी मिळत असल्याने पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.

-डॉ. अजय आगरकर

पॉलिटेक्निकच्या या वर्षांच्या प्रवेशासाठी शासनाच्या वतीने नियमावली दिली आहे. त्यानुसार ज्यांचे अर्ज कन्फर्म झाले नव्हते त्यांना संपर्क करून अर्ज भरण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद असून, रोजगाराची हमी असल्याने पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचे आकर्षण वाढले आहे. - व्ही.डी.नितनवरे