शहरं
Join us  
Trending Stories
1
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
2
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
3
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
4
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
5
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
6
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
8
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
9
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
10
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
11
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
12
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
13
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
14
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
15
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
16
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
17
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
18
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
19
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
20
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 

बाबासाहेबांसारख्या महापुरुषांकडे जातीच्या चौकटीतून पाहू नका - श्रीपाल सबनीस

By admin | Updated: February 25, 2017 20:51 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांकडे जातीच्या चौकटीतून पाहू नका, असे प्रतिपादन साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले

ऑनलाइन लोकमत 
जळकोट (जि़लातूर), दि. 25 - कोणतेही महापुरुष हे एका जाती धमार्पुरते मर्यादित नसतात. त्यांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी कार्य केलेले आहे़ त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांकडे जातीच्या चौकटीतून पाहू नका, असे प्रतिपादन साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. 
 
जळकोट येथे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय आंबेडकरी विचार साहित्य संमेलनात ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन खा़डॉ. सुनील गायकवाड यांच्या हस्ते झाले. मंचावर प्रा.डॉ. माधव गादेकर, स्वागताध्यक्ष संग्राम कदम, साहित्यिक विलास सिंदगीकर, उपनगराध्यक्ष किशन धुळशेट्टे, बालाजी केंद्रे, मन्मथअप्पा किडे, अर्जुन आगलावे, ललिता सबनीस, नगरसेवक शिवानंद देशमुख, रमाकांत रायेवार, सोमेश्वर सोप्पा, जगन्नाथ मैलारे, मंगला बनसोडे, ललिता गायकवाड, कॉ. राजीव पाटील, विश्वनाथ चाटे, विठ्ठल चंदावार, संजय जेवरीकर, गणेश कापसे, बालाजी पडोळे, प्रा.रा.ना. पस्तापुरे, रामदास केदार यांची उपस्थिती होती. 
 
श्रीपाल सबनीस म्हणाले, मानवतावादाची प्रेरणा सर्व धर्मात असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु संत कबीर होते. महात्मा गौतम बुद्धांचा विचार अहिंसावादी आहे. म्हणून सहिष्णुता महत्वाची आहे. डॉ. बाबासाहेबांनी १९३५ पर्यंत हिंदू धर्माला साद घातली. मात्र त्यांची हाक, करुणा, अडचण कोणी हिंदू ऐकू शकला नाही. म्हणून त्यांनी हिंदू धर्माकडून अपेक्षा करणे सोडून दिले. बाबासाहेबांनी हिंदुत्ववादाचे समर्थन कधीच केले नाही, असेही ते म्हणाले. बाबासाहेबांचे विचार केवळ भारतापुरतेच मर्यादित राहिले नाहीत तर जगभरातील राष्ट्रांनी त्यांचे विचार स्वीकारले आहेत़ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोटाळ्यांमुळेच कमळ फुलले असे सांगून नोटाबंदी व सर्जिकल स्ट्राईकचे त्यांनी कौतुक केले. 
 
खा. गायकवाड म्हणाले, सबनीस यांचे साहित्य वास्तववादी असून बाबासाहेबांचे विचार समाजात पोहोचविण्यासाठी आंबेडकरी साहित्य संमेलनाची गरज आहे.
 
यावेळी सत्कारमूर्ती कवी विलास सिंदगीकर, स्वागताध्यक्ष संग्राम कदम, चंदशेखर कळसे, एम. जी. मोमीन आदींची भाषणे झाली. तत्पूर्वी विलास सिंदगीकर यांच्या आनंदगाणी या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सकाळी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. माधव वाघमारे यांनी तर आभार प्रा. सी.एम. कांबळे यांनी मानले़
 
गांधी आणि बुद्धांचा विचार अहिंसावादी
संघाचे मुकुट असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशात गेल्यावर गांधी आणि बुद्ध यांचा जय जयकार करतात. कारण हे दोन्ही महापुरुष अहिंसावादी होते. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून बाबासाहेबांनी गांधीजींचे प्राण वाचविले असेही सबनीस म्हणाले़