शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

बाबासाहेबांसारख्या महापुरुषांकडे जातीच्या चौकटीतून पाहू नका - श्रीपाल सबनीस

By admin | Updated: February 25, 2017 20:51 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांकडे जातीच्या चौकटीतून पाहू नका, असे प्रतिपादन साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले

ऑनलाइन लोकमत 
जळकोट (जि़लातूर), दि. 25 - कोणतेही महापुरुष हे एका जाती धमार्पुरते मर्यादित नसतात. त्यांनी समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी कार्य केलेले आहे़ त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांकडे जातीच्या चौकटीतून पाहू नका, असे प्रतिपादन साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. 
 
जळकोट येथे आयोजित पहिल्या राज्यस्तरीय आंबेडकरी विचार साहित्य संमेलनात ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन खा़डॉ. सुनील गायकवाड यांच्या हस्ते झाले. मंचावर प्रा.डॉ. माधव गादेकर, स्वागताध्यक्ष संग्राम कदम, साहित्यिक विलास सिंदगीकर, उपनगराध्यक्ष किशन धुळशेट्टे, बालाजी केंद्रे, मन्मथअप्पा किडे, अर्जुन आगलावे, ललिता सबनीस, नगरसेवक शिवानंद देशमुख, रमाकांत रायेवार, सोमेश्वर सोप्पा, जगन्नाथ मैलारे, मंगला बनसोडे, ललिता गायकवाड, कॉ. राजीव पाटील, विश्वनाथ चाटे, विठ्ठल चंदावार, संजय जेवरीकर, गणेश कापसे, बालाजी पडोळे, प्रा.रा.ना. पस्तापुरे, रामदास केदार यांची उपस्थिती होती. 
 
श्रीपाल सबनीस म्हणाले, मानवतावादाची प्रेरणा सर्व धर्मात असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु संत कबीर होते. महात्मा गौतम बुद्धांचा विचार अहिंसावादी आहे. म्हणून सहिष्णुता महत्वाची आहे. डॉ. बाबासाहेबांनी १९३५ पर्यंत हिंदू धर्माला साद घातली. मात्र त्यांची हाक, करुणा, अडचण कोणी हिंदू ऐकू शकला नाही. म्हणून त्यांनी हिंदू धर्माकडून अपेक्षा करणे सोडून दिले. बाबासाहेबांनी हिंदुत्ववादाचे समर्थन कधीच केले नाही, असेही ते म्हणाले. बाबासाहेबांचे विचार केवळ भारतापुरतेच मर्यादित राहिले नाहीत तर जगभरातील राष्ट्रांनी त्यांचे विचार स्वीकारले आहेत़ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोटाळ्यांमुळेच कमळ फुलले असे सांगून नोटाबंदी व सर्जिकल स्ट्राईकचे त्यांनी कौतुक केले. 
 
खा. गायकवाड म्हणाले, सबनीस यांचे साहित्य वास्तववादी असून बाबासाहेबांचे विचार समाजात पोहोचविण्यासाठी आंबेडकरी साहित्य संमेलनाची गरज आहे.
 
यावेळी सत्कारमूर्ती कवी विलास सिंदगीकर, स्वागताध्यक्ष संग्राम कदम, चंदशेखर कळसे, एम. जी. मोमीन आदींची भाषणे झाली. तत्पूर्वी विलास सिंदगीकर यांच्या आनंदगाणी या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सकाळी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. सूत्रसंचालन प्रा. माधव वाघमारे यांनी तर आभार प्रा. सी.एम. कांबळे यांनी मानले़
 
गांधी आणि बुद्धांचा विचार अहिंसावादी
संघाचे मुकुट असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशात गेल्यावर गांधी आणि बुद्ध यांचा जय जयकार करतात. कारण हे दोन्ही महापुरुष अहिंसावादी होते. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून बाबासाहेबांनी गांधीजींचे प्राण वाचविले असेही सबनीस म्हणाले़