शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अनेक ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या स्त्रोता जवळ अस्वच्छता पाहणी दरम्यान दिसून आली आहे. त्यामुळे ...

जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अनेक ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या स्त्रोता जवळ अस्वच्छता पाहणी दरम्यान दिसून आली आहे. त्यामुळे पाणी स्त्रोतांची शुद्धीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. ज्या ग्रामपंचायतींना रेडकार्ड देण्यात आले आहेत. त्यांनी पाण्याच्या स्त्रोताचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. त्यांना त्या संदर्भात नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार....

दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, मलेरिया, डायरिया, टायफाईड, कॉलरा, कावीळ आदी आजार उद्भवतात. उलटी,जुलाब या समस्याही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शुद्ध पाणी पिणे गरजेचे आहे. दरवर्षी पावसाळ्यात प्रस्तुत आजार उद्भवत असतात. हे आजार उद्भवू नये म्हणून खबरदारी घेणे हा त्यावर पर्याय आहे.

आजारांची लक्षणे.....

पोट दुखणे, ताप येणे, उलटी,जुलाब लागणे,अशक्तपणा येणे, डोळे व अंग पिवळे पडणे, जेवणाला चव न लागणे आदी लक्षणे या आजारांची आहेत. सर्दी,ताप, खोकला अशीही लक्षणे या आजारांची असू शकतात.

पाणी उकळून पिलेले बरे.....

सध्या पावसाळा सुरू आहे.त्यामुळे नळाचे पाणी पीत असताना उकळून पिलेले बरे. जेणेकरून पाण्याचे शुद्धीकरण होईल आणि आजारी उद्भवणार नाहीत.

लातूर शहराला दररोज लागते २५ एमएलडी पाणी...

लातूर शहराची लोकसंख्या पाच लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे दरडोई व्यक्तीच्या पाण्याचा विचार केला तर लातूर शहरासाठी दररोज २५ एमएलडी पाण्याची गरज आहे. त्यानुसार महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मांजरा प्रकल्पातून दररोज पंचेचाळीस ते पन्नास एमएलडी पाणी उचलण्यात येते. आठदिवसा आड पाणीपुरवठा केला जात असला तरी त्याचा साठा करून दिवसाला २५ एमएलडी पिण्यासाठी पाणी लागते.