शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अनेक ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या स्त्रोता जवळ अस्वच्छता पाहणी दरम्यान दिसून आली आहे. त्यामुळे ...

जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. अनेक ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या स्त्रोता जवळ अस्वच्छता पाहणी दरम्यान दिसून आली आहे. त्यामुळे पाणी स्त्रोतांची शुद्धीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने केल्या आहेत. ज्या ग्रामपंचायतींना रेडकार्ड देण्यात आले आहेत. त्यांनी पाण्याच्या स्त्रोताचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. त्यांना त्या संदर्भात नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

दूषित पाण्यामुळे होणारे आजार....

दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, मलेरिया, डायरिया, टायफाईड, कॉलरा, कावीळ आदी आजार उद्भवतात. उलटी,जुलाब या समस्याही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शुद्ध पाणी पिणे गरजेचे आहे. दरवर्षी पावसाळ्यात प्रस्तुत आजार उद्भवत असतात. हे आजार उद्भवू नये म्हणून खबरदारी घेणे हा त्यावर पर्याय आहे.

आजारांची लक्षणे.....

पोट दुखणे, ताप येणे, उलटी,जुलाब लागणे,अशक्तपणा येणे, डोळे व अंग पिवळे पडणे, जेवणाला चव न लागणे आदी लक्षणे या आजारांची आहेत. सर्दी,ताप, खोकला अशीही लक्षणे या आजारांची असू शकतात.

पाणी उकळून पिलेले बरे.....

सध्या पावसाळा सुरू आहे.त्यामुळे नळाचे पाणी पीत असताना उकळून पिलेले बरे. जेणेकरून पाण्याचे शुद्धीकरण होईल आणि आजारी उद्भवणार नाहीत.

लातूर शहराला दररोज लागते २५ एमएलडी पाणी...

लातूर शहराची लोकसंख्या पाच लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे दरडोई व्यक्तीच्या पाण्याचा विचार केला तर लातूर शहरासाठी दररोज २५ एमएलडी पाण्याची गरज आहे. त्यानुसार महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मांजरा प्रकल्पातून दररोज पंचेचाळीस ते पन्नास एमएलडी पाणी उचलण्यात येते. आठदिवसा आड पाणीपुरवठा केला जात असला तरी त्याचा साठा करून दिवसाला २५ एमएलडी पिण्यासाठी पाणी लागते.