शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पावसामुळे सहा दिवसांपासून रेणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:21 IST

तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्प हा २१.६ दलघमी क्षमतेचा आहे. चार वर्षांत हा प्रकल्प पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला आहे. ऑगस्टच्या ...

तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्प हा २१.६ दलघमी क्षमतेचा आहे. चार वर्षांत हा प्रकल्प पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात प्रकल्पात केवळ १४ टक्के पाणीसाठा होता. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे आणि अंबाजोगाई तालुक्यातील जोगाईवाडी, परळी तालुक्यातील मुरंबी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने या प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली. अवघ्या चार दिवसांत रेणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे प्रकल्पातून पहिल्यांदा ७ सप्टेंबर रोजी ६ दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.

त्यानंतर १५ दिवसांनी पुन्हा पावसाचा जोर वाढला. त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा जास्त होत असल्याने पुन्हा २२ सप्टेंबर रोजी सकाळी ४ दरवाजे व सायंकाळी ६ दरवाजे उघडून १५८.७० क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर २२ व २३ सप्टेंबर रोजी १० ते ३० सेमीने आणि २४ सप्टेंबर रोजी १० ते २० सेमीने व २५ सप्टेंबर रोजी अतिरिक्त पाणी सोडून देण्यात आले.

रविवारी सकाळी ७.३० वा. पुन्हा ४ दरवाजे १० सेमीने उघडून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. आतापर्यंत रेणा प्रकल्पातून ४० दलघमी एवढा पाण्याचा विसर्ग झाला आहे. या पाण्यामुळे रेणा नदी दुथडी भरुन वाहत आहे तर नदीवरील घनसरगाव, रेणापूर, खरोळ हे तिन्ही बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच दोनदा विसर्ग...

रेणा प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २१.६ दलघमी आहे. ६ दिवसांत प्रकल्पातून ४० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. रेणा मध्यम प्रकल्प हा दोनदा भरेल एवढा जलसाठा नदीपात्रात सोडून देण्यात आला असून इतिहासात पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर रेणा मध्यम प्रकल्प निर्माण झाल्यापासून पहिल्यांदाच दोनदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

४० दलघमी पाणी सोडले...

२२ सप्टेंबरपासून प्रकल्पात येवा मोठ्या प्रमाणात होत आहे. पंधरा दिवसात दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आतापर्यंत ४० दलघमी पाण्याचा विसर्ग झाला आहे. पाण्याचा येवा सुरु असल्याने आणखीन पाणी नदीपात्रात सोडण्याची प्रक्रिया चालू- बंद राहणार आहे, अशी माहिती प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी दिली.