शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे सहा दिवसांपासून रेणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:21 IST

तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्प हा २१.६ दलघमी क्षमतेचा आहे. चार वर्षांत हा प्रकल्प पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला आहे. ऑगस्टच्या ...

तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्प हा २१.६ दलघमी क्षमतेचा आहे. चार वर्षांत हा प्रकल्प पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात प्रकल्पात केवळ १४ टक्के पाणीसाठा होता. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे आणि अंबाजोगाई तालुक्यातील जोगाईवाडी, परळी तालुक्यातील मुरंबी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने या प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली. अवघ्या चार दिवसांत रेणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे प्रकल्पातून पहिल्यांदा ७ सप्टेंबर रोजी ६ दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.

त्यानंतर १५ दिवसांनी पुन्हा पावसाचा जोर वाढला. त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा जास्त होत असल्याने पुन्हा २२ सप्टेंबर रोजी सकाळी ४ दरवाजे व सायंकाळी ६ दरवाजे उघडून १५८.७० क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर २२ व २३ सप्टेंबर रोजी १० ते ३० सेमीने आणि २४ सप्टेंबर रोजी १० ते २० सेमीने व २५ सप्टेंबर रोजी अतिरिक्त पाणी सोडून देण्यात आले.

रविवारी सकाळी ७.३० वा. पुन्हा ४ दरवाजे १० सेमीने उघडून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. आतापर्यंत रेणा प्रकल्पातून ४० दलघमी एवढा पाण्याचा विसर्ग झाला आहे. या पाण्यामुळे रेणा नदी दुथडी भरुन वाहत आहे तर नदीवरील घनसरगाव, रेणापूर, खरोळ हे तिन्ही बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच दोनदा विसर्ग...

रेणा प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २१.६ दलघमी आहे. ६ दिवसांत प्रकल्पातून ४० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. रेणा मध्यम प्रकल्प हा दोनदा भरेल एवढा जलसाठा नदीपात्रात सोडून देण्यात आला असून इतिहासात पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर रेणा मध्यम प्रकल्प निर्माण झाल्यापासून पहिल्यांदाच दोनदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

४० दलघमी पाणी सोडले...

२२ सप्टेंबरपासून प्रकल्पात येवा मोठ्या प्रमाणात होत आहे. पंधरा दिवसात दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आतापर्यंत ४० दलघमी पाण्याचा विसर्ग झाला आहे. पाण्याचा येवा सुरु असल्याने आणखीन पाणी नदीपात्रात सोडण्याची प्रक्रिया चालू- बंद राहणार आहे, अशी माहिती प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी दिली.