शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

पावसामुळे सहा दिवसांपासून रेणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:21 IST

तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्प हा २१.६ दलघमी क्षमतेचा आहे. चार वर्षांत हा प्रकल्प पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला आहे. ऑगस्टच्या ...

तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्प हा २१.६ दलघमी क्षमतेचा आहे. चार वर्षांत हा प्रकल्प पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात प्रकल्पात केवळ १४ टक्के पाणीसाठा होता. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे आणि अंबाजोगाई तालुक्यातील जोगाईवाडी, परळी तालुक्यातील मुरंबी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने या प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली. अवघ्या चार दिवसांत रेणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. त्यामुळे प्रकल्पातून पहिल्यांदा ७ सप्टेंबर रोजी ६ दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.

त्यानंतर १५ दिवसांनी पुन्हा पावसाचा जोर वाढला. त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा जास्त होत असल्याने पुन्हा २२ सप्टेंबर रोजी सकाळी ४ दरवाजे व सायंकाळी ६ दरवाजे उघडून १५८.७० क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर २२ व २३ सप्टेंबर रोजी १० ते ३० सेमीने आणि २४ सप्टेंबर रोजी १० ते २० सेमीने व २५ सप्टेंबर रोजी अतिरिक्त पाणी सोडून देण्यात आले.

रविवारी सकाळी ७.३० वा. पुन्हा ४ दरवाजे १० सेमीने उघडून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. आतापर्यंत रेणा प्रकल्पातून ४० दलघमी एवढा पाण्याचा विसर्ग झाला आहे. या पाण्यामुळे रेणा नदी दुथडी भरुन वाहत आहे तर नदीवरील घनसरगाव, रेणापूर, खरोळ हे तिन्ही बॅरेजेस पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच दोनदा विसर्ग...

रेणा प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २१.६ दलघमी आहे. ६ दिवसांत प्रकल्पातून ४० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. रेणा मध्यम प्रकल्प हा दोनदा भरेल एवढा जलसाठा नदीपात्रात सोडून देण्यात आला असून इतिहासात पहिल्यांदाच अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर रेणा मध्यम प्रकल्प निर्माण झाल्यापासून पहिल्यांदाच दोनदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

४० दलघमी पाणी सोडले...

२२ सप्टेंबरपासून प्रकल्पात येवा मोठ्या प्रमाणात होत आहे. पंधरा दिवसात दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आतापर्यंत ४० दलघमी पाण्याचा विसर्ग झाला आहे. पाण्याचा येवा सुरु असल्याने आणखीन पाणी नदीपात्रात सोडण्याची प्रक्रिया चालू- बंद राहणार आहे, अशी माहिती प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी दिली.