शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

भाव कमी असूनही शेतकऱ्यांची सोयाबीनलाच पसंती; लातूर जिल्ह्यात ११२ टक्के पेरा

By हरी मोकाशे | Updated: July 13, 2024 19:13 IST

सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींवर दर ठरतात.

लातूर : गत खरीपात सोयाबीनचे उत्पादन घटले असतानाही बाजारपेठेत दर कमीच राहिला. त्यामुळे यंदाच्या हंगामात सोयाबीनचे क्षेत्र कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. शिवाय, वेळेवर पाऊसही झाला. परंतु, शेतकऱ्यांनी सोयाबीनलाच पसंती दिली असून आतापर्यंत जिल्ह्यात ४ लाख ८२ हजार ५३६ हेक्टरवर म्हणजे ११२ टक्के पेरा झाला आहे.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात उशीरा पाऊस झाला. तद्नंतर पावसाने मोठा ताण दिला. परिणामी, उत्पादनात जवळपास ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. उत्पादन घटल्याने दरात चांगली वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, सोयाबीन काढणीपासून ते दीपावलीच्या कालावधीपर्यंत चांगला दर राहिला. त्यानंतर मात्र, सातत्याने दरात घसरण होण्यास सुरुवात झाली. नव्या खरीप हंगामाच्या तोंडावर भाव वाढतील, अशी अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. सातत्याने ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दर राहिला.

५ लाख ८८ हजार हेक्टरवर पेरणी...पीक - पेरणीसोयाबीन - ४८२५३६तूर - ७०९२६मूग - ६८४४उडीद - ५८४४कापूस - १६१८६सूर्यफुल - १८कारळ - ५५तीळ - १३८भुईमूग - १५३ज्वारी - ३६६१बाजरी - १९९मका - २२७८

तीन तालुक्यांत शंभर टक्के पेरणी...तालुका - पेरणी (टक्के)लातूर - १०९.७८औसा - १०३.२९अहमदपूर - ९४.०६निलंगा - ८९.४४शिरुर अनं. - ९४.३४उदगीर - ९४.९८चाकूर - १०२.१७रेणापूर - ९९.१२देवणी - ९४.२३जळकोट - ९९.०६एकूण - ९८.१३

आतापर्यंत सरासरी २१३ मिमी पाऊस...जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २१३.८ मिमी पाऊस झाला आहे. लातूर तालुक्यात ३४३.४, औसा- ३४४.५, अहमदपूर- २८०.६, निलंगा- ३०३, उदगीर- १९७.८, चाकूर- २९४.९, रेणापूर- ३६७.४, देवणी- २१२.४, शिरुर अनंतपाळ- २२८.४, जळकोट तालुक्यात १७०.४ मिमी पाऊस झाला आहे.

सोयाबीन नगदी पीक...गेल्या काही वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे पीक पध्दतीत बदल झाला आहे. सध्या नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल आहे. दोन वर्षापासून दर कमी असले तरी आगामी काळात भाव वाढण्याची आशा आहे. त्यामुळे सोयाबीनची पेरणी केली आहे.- हनुमंत शेळके, शेतकरी.

सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक...सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींवर दर ठरतात. विदेशात सोयाबीन, पेंड याच्या मागणीनुसार दर मिळत असतो. त्याचा स्थानिक बाजारपेठेवर परिणाम होत असतो, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सरासरीपेक्षा अधिक पेरा...यंदा जिल्ह्यात ४ लाख २८ हजार १२१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित होता. मात्र, प्रत्यक्षात ४ लाख ८२ हजार ५३६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. वेळेवर पाऊस झाल्याने उडीद, मूग, तुरीचेही क्षेत्र वाढले आहे.- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र