शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
2
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
3
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
4
भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व! मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
5
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
6
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
7
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
8
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
9
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
10
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
11
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
12
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
13
Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
14
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
15
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
16
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
17
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
18
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
19
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
20
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!

बसेसच्या फेऱ्या वाढूनही डिझेलचाच निघतोय खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST

उदगीर : टाळेबंदीच्या काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ...

उदगीर : टाळेबंदीच्या काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बसेस सुरु झाल्या. सध्या प्रवासी भारमान वाढले असले तरी बसच्या फेऱ्यातून केवळ डिझेलचाच खर्च निघत आहे. परिणामी, दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत राहिले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने सर्वच व्यवहार बंद पडले होते. शासनाने एसटी बस वाहतूक सेवाही बंद केली होती. त्यामुळे उदगीर बसस्थानकातून धावणाऱ्या बसेसही बंद झाल्या होत्या. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ५० टक्क्यांसह प्रवासी वाहतूक सुरु झाली. परंतु, अहमदपूर व लातूर या दोनच शहरापुरती वाहतूक सुरु होती. सुरुवातीला दिवसभरात १३ ते १४ फेऱ्या होत होत्या. हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाचे नियम शिथिल केले आणि उदगीर बसस्थानातून सुटणाऱ्या बसेसच्या संख्येत वाढ होत गेली. आता येथील बसस्थानकातून पुणे, औरंगाबाद, शेगाव, लातूर, अहमदपूर, सोलापूरसह हैदराबाद, निजामाबाद या आंतरराज्य बसेस धावत आहेत. आता दिवसातून ३२० बस फेऱ्या होत असून त्यातून ८ लाखाचे उत्पन्न मिळत आहे. हे उत्पन्न जेमतेम असल्याने डिझेलचा खर्च निघत आहे. दरम्यान, उत्पन्न घटल्याने दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही.

प्रवासी संख्या वाढणे गरजेचे...

सध्या सण, उत्सव सुरु झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार बसेसच्या फेऱ्यांतही वाढ केली आहे. दररोज ३२० बस फेऱ्यातून ८ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. यातून केवळ डिझेलचा खर्च निघत आहे. दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत. त्यामुळे कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत. प्रवासी संख्या वाढल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला पूर्वीचे दिवस येतील.

- यशवंत कानतोडे, स्थानक प्रमुख, उदगीर.