या रोपांचे गुणधर्म...
१. तुळस - उचकी लागणे, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यांमध्ये दुखणे वगैरे विकारांमध्ये तुळशी उपयुक्त असते. कफ तसेच वातदोषाचे शमन करणारी पित्त वाढविणारी तुळशी दुर्गंधीचा नाश करण्यास सक्षम असते. तुळशीमध्ये पर्यावरणाची शुद्धी करण्याचाही गुणधर्म असतो.
२. अश्वगंधा - अश्वगंधामध्ये अँटी ऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेंटरीचे गुण आढळतात यामुळे हृदयासंबंधित समस्येपासून वाचता येते, अश्वगंधा चूर्ण खाल्ल्याने हृदयाच्या मांसपेशी अधिक मजबूत होतात आणि कोलेस्ट्रॉलचा खराब स्तर कमी करण्यासाठी याची मदत होते.
३. आले - (अद्रक) अद्रकमध्ये अँटी फंगल, अँटी सेफ्टीक, अँटी बायोटिक, अँटी व्हायरल, असे विशेष गुण आहेत, त्याचबरोबर विविध प्रकारचे व्हिटॅमिन आणि खनिजे देखील आहेत, जे आपल्या स्वास्थ्यासाठी खूप लाभदायक आहे. म्हणून आल्याचा उपयोग औषधी सामग्रीमध्ये देखील केला जातो.
४. गिलोय - गिलोय गुडुची आणि अमृता म्हणूनही ओळखले जातात. हे अँटी ऑक्सिडंटमध्ये समृद्ध आहे जे मुक्त राडीकल्सशी लढायला मदत करते आणि पेशी निरोगी आणि रोगांपासून दूर ठेवते. सध्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिला जात आहे आणि हे करण्यासाठी गिलोय हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
५. पुदिना - आयुर्वेदानुसार पुदिना हा दीपक, पाचक, रुचकर स्वादप्रिय, हृदय, उष्ण वात व कफ दोषहारक व कृमीनाशक आहे. तसेच पुदिनामध्ये कॅल्शियम लोह, फॉस्फरस क, ड व ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते तर ब जीवनसत्त्व अत्यल्प प्रमाणात असते.
प्रतिक्रिया...
कोरोनाच्या संकट काळापासून तुळस, गवती चहा, पुदिना, गुळवेल, अश्वगंधा, शतावरी आदी वनस्पतींना पसंती वाढली आहे. सदरील वनस्पती शरीरासाठी आरोग्यदायी असल्याने खरेदीसाठी नागरिकांचा प्रतिसाद आहे. गेल्या तीन महिन्यात या वनस्पतींच्या विक्रीत वाढ झाली आहे. - भरत सूर्यवंशी, नर्सरी विक्रेते.