शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

मांजरा नदीवरील साई बॅरेजमध्ये पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:17 IST

मांजरा नदीवर लातूर तालुक्यात साई बॅरेज आहे. गत पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा शेतीतून अधिक उत्पादन काढण्यासाठी बॅरेज परिसरातील ...

मांजरा नदीवर लातूर तालुक्यात साई बॅरेज आहे. गत पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा शेतीतून अधिक उत्पादन काढण्यासाठी बॅरेज परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस, फळबागा तसेच भाजीपाल्याची लागवड केली आहे. सध्या मे महिना असल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. वाढत्या उन्हामुळे जलसाठे कोरडे पडत आहेत. परिणामी, बॅरेजमधील पाण्याने तळ गाठला आहे. या बॅरेज परिसरात शेती असलेल्या शेतकऱ्यांनी पाणीपट्टीपोटीची रक्कम भरणा केली आहे. परंतु, पाटबंधारे विभागाकडून बॅरेजमध्ये पाणी सोडण्यात येत नाही. परिणामी, उसासह फळबागा, भाजीपाला वाळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांना हक्काचे पाणी उपलब्ध करून दिले जात नसल्याने युवा सेनेचे कुलदीप सूर्यवंशी यांनी पाटबंधारे विभागास पाणी सोडण्याची मागणी करीत निवेदन दिले आहे. त्यावर तसेच अशोक पवार, ज्ञानेश्वर पवार, मनोहर पवार, संजय जगताप, हरिकिशन पवार, बळीराम पांडे, श्रीमंत पवार, गुरुनाथ स्वामी, काशिनाथ स्वामी, वसंत मिटकरी, शिवाजी मिटकरी, रामराव पवार, शामराव पवार, जीवन सूर्यवंशी, बाळू स्वामी, विष्णू पवार यांनीही निवेदन देऊन पाणी मागणी सोडण्याची मागणी केली आहे.