शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे शेतात पाणीचपाणी, नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST

निटूर : दोन दिवसांपूर्वी निटूर परिसरात अतिवृष्टी झाल्याने मांजरा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांत पाणीचपाणी ...

निटूर : दोन दिवसांपूर्वी निटूर परिसरात अतिवृष्टी झाल्याने मांजरा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांत पाणीचपाणी साचले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी शेतक-यांतून करण्यात येत आहे.

निलंगा तालुक्यातील निटूर, शेंद, मुगाव, ढोबळेवाडी, बसपूर, शिरोळ, गिरकचाळ, वळसांगवी, शिऊर, नदीवाडी, माचरटवाडी आदी गावांपासून मांजरा नदी वाहते. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्याने मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे.

परिणामी, शेतात पाणीचपाणी साचले आहे. पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नुकसानीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, मांजरा नदीवरील डोंगरगाव उच्चस्तरीय बंधारा भरला आहे. तसेच मसलगा प्रकल्प निम्मा भरला आहे. प्रशासनाने नुकसानीची पाहणी करुन पंचनामे करावेत, अशी मागणी येथील शेतकरी दिनकर निटुरे, अनिल पाटील, मुगावचे माजी सरपंच सुरेंद्र धुमाळ, बसपूरचे मोहनराव चव्हाण, ज्ञानोबा पाटील आदींनी केली आहे.

सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान...

मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यातील माकणी (थोर) येथील वामन सूर्यवंशी यांनी गट क्र. ४६३ मध्ये सोयाबीनची लागवड केली होती. हे पीक काढणीसाठी आले होते. मात्र, अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतक-याच्या कुटुंबीयांनी कृषी विभागाकडे कैफियत मांडून पंचनामा करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.