शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अतिवृष्टीमुळे शेतात पाणीचपाणी, नुकसानीच्या पंचनाम्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST

निटूर : दोन दिवसांपूर्वी निटूर परिसरात अतिवृष्टी झाल्याने मांजरा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांत पाणीचपाणी ...

निटूर : दोन दिवसांपूर्वी निटूर परिसरात अतिवृष्टी झाल्याने मांजरा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांत पाणीचपाणी साचले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी शेतक-यांतून करण्यात येत आहे.

निलंगा तालुक्यातील निटूर, शेंद, मुगाव, ढोबळेवाडी, बसपूर, शिरोळ, गिरकचाळ, वळसांगवी, शिऊर, नदीवाडी, माचरटवाडी आदी गावांपासून मांजरा नदी वाहते. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्याने मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे.

परिणामी, शेतात पाणीचपाणी साचले आहे. पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नुकसानीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, मांजरा नदीवरील डोंगरगाव उच्चस्तरीय बंधारा भरला आहे. तसेच मसलगा प्रकल्प निम्मा भरला आहे. प्रशासनाने नुकसानीची पाहणी करुन पंचनामे करावेत, अशी मागणी येथील शेतकरी दिनकर निटुरे, अनिल पाटील, मुगावचे माजी सरपंच सुरेंद्र धुमाळ, बसपूरचे मोहनराव चव्हाण, ज्ञानोबा पाटील आदींनी केली आहे.

सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान...

मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यातील माकणी (थोर) येथील वामन सूर्यवंशी यांनी गट क्र. ४६३ मध्ये सोयाबीनची लागवड केली होती. हे पीक काढणीसाठी आले होते. मात्र, अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतक-याच्या कुटुंबीयांनी कृषी विभागाकडे कैफियत मांडून पंचनामा करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.