शहरातील या दर्ग्याच्या सुशोभीकरणासाठी आमदार निधी देऊनही अद्याप काम सुरू झाले नाही. दरम्यान, समाज बांधवांनी वर्गणी जमा करून डागडुजीचे काम केले होते. तसेच शिवाजीनगर भागातील कब्रस्थानमध्ये नालीचे पाणी जात आहे. तिथे दोन नाल्या बांधण्यात याव्यात. कब्रस्थानातील अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यात यावीत, असे निवेदनात म्हटले आहे.
या कामासंदर्भात आपण स्वतःहून लक्ष देऊन लवकरात लवकर काम सुरू करून पूर्ण करू, असे आश्वासन आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले.
यावेळी मुजीब सौदागर, फारुख सौदागर, नईम खतीब, मुस्तफा शेख, महेबूब शेख, डॉ. जब्बार सौदागर, अय्युब शेख, हिरा खुरेशी, अमजत खुरेशी, अय्युब अत्तार, नवाब बागवान, शब्बीर बागवान, इस्माईल चौधरी, सिकंदर बागवान, अहेमद बागवान, पाशा बागवान, राजूअप्पा रेवते, मुनीर बागवान, अहेमद खुरेशी, महेमूद अत्तार, सिराज मोमीन, पाशा शेख आदींसह समाज बांधव उपस्थित होते.