शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुगाच्या उताऱ्यात ४० टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर अनंतपाळ : खरिपातील मुगाच्या राशींचा हंगाम सुरू झाला असून, कृषी विभाग आणि पीक विमा कंपनीच्यावतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर अनंतपाळ : खरिपातील मुगाच्या राशींचा हंगाम सुरू झाला असून, कृषी विभाग आणि पीक विमा कंपनीच्यावतीने संयुक्त पीक कापणी प्रयोग घेतले जात आहेत. तालुक्यातील सावरगाव येथे एका शेतकऱ्याच्या शेतात घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगात मुगाच्या उताऱ्यात ४० टक्क्यांची घट झाल्याचे आढळून आले आहे. लागवडीचा खर्चही पदरी पडत नसल्याने खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीनसह सर्व पिकांना विमा लागू करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वाधिक उत्पन्न सोयाबीनचे घेतले जाते. त्यामुळे प्रत्येकवर्षी सोयाबीनचा पेरा वाढत आहे. यंदा एकूण लागवड २८ हजार ५०० हेक्टरपैकी २३ हजार ७०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी मूग, उडिदाची पेरणी केली होती. मृग नक्षत्रात पावसाने वेळेवर हजेरी लावली होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात सोयाबीनसह मूग, उडीद बहरले होते. परंतु, ऐन फुल, फळ धारणेच्या कालावधीत पावसाने जवळपास महिनाभर ताण दिला होता. त्यामुळे माळरानावरील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके करपली. त्यामुळे माळरानावरील मुगाचा उतारा कमालीचा घटला आहे. शिवाय कसदार जमिनीतील उताऱ्यात ४० टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. खरीप हंगामातील पिकांना पीक विमा लागू करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

तालुक्यात ३२३ हेक्टरवर मूग...

शिरूर अनंतपाळ तालुक्यात यंदा मुगाचा पेरा घटला असून, एकूण लागवडीच्या केवळ ३२३ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली आहे. उडिदाचे क्षेत्र त्यापेक्षा कमी झाले असून, केवळ १५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरा कमी आणि उत्पादनात घट आल्याने शेतकरी हतबल होत आहेत.

शेतकरी झाले हतबल...

तालुक्यातील विविध गावांमध्ये सध्या मूग, उडिदाच्या राशी सुरू झाल्या आहेत. दरम्यान, तालुका कृषी कार्यालय आणि पीक विमा कंपनीच्यावतीने सावरगाव येथील शेतकरी राजेंद्र माने यांच्या शेतात पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. यावेळी एकरी २ क्विंटल ३६५ ग्रॅमचा उतारा आला आहे. सरासरी उत्पादनात ४० टक्क्यांची घट झाली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पेरणीसाठी झालेल्या लागवडीचा खर्चही पदरी पडत नसल्याचे शेतकरी राजेंद्र माने, कल्याणराव बिरादार, योगेश बिरादार, सीताराम पाटील, बालाजी बिरादार, शिवाजीराव बिरादार यांनी सांगितले.

सरसकट पीक विमा लागू करावा...

खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीनचे पीक बहरले असताना ऐन फुल-फळ धारणेच्या कालावधीत पावसाने जवळपास महिनाभर ताण दिल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे सरसकट पीक विमा लागू करण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.