शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मुगाच्या उताऱ्यात ४० टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर अनंतपाळ : खरिपातील मुगाच्या राशींचा हंगाम सुरू झाला असून, कृषी विभाग आणि पीक विमा कंपनीच्यावतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर अनंतपाळ : खरिपातील मुगाच्या राशींचा हंगाम सुरू झाला असून, कृषी विभाग आणि पीक विमा कंपनीच्यावतीने संयुक्त पीक कापणी प्रयोग घेतले जात आहेत. तालुक्यातील सावरगाव येथे एका शेतकऱ्याच्या शेतात घेण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगात मुगाच्या उताऱ्यात ४० टक्क्यांची घट झाल्याचे आढळून आले आहे. लागवडीचा खर्चही पदरी पडत नसल्याने खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीनसह सर्व पिकांना विमा लागू करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वाधिक उत्पन्न सोयाबीनचे घेतले जाते. त्यामुळे प्रत्येकवर्षी सोयाबीनचा पेरा वाढत आहे. यंदा एकूण लागवड २८ हजार ५०० हेक्टरपैकी २३ हजार ७०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी मूग, उडिदाची पेरणी केली होती. मृग नक्षत्रात पावसाने वेळेवर हजेरी लावली होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात सोयाबीनसह मूग, उडीद बहरले होते. परंतु, ऐन फुल, फळ धारणेच्या कालावधीत पावसाने जवळपास महिनाभर ताण दिला होता. त्यामुळे माळरानावरील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके करपली. त्यामुळे माळरानावरील मुगाचा उतारा कमालीचा घटला आहे. शिवाय कसदार जमिनीतील उताऱ्यात ४० टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे लागवडीचा खर्चही शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. खरीप हंगामातील पिकांना पीक विमा लागू करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

तालुक्यात ३२३ हेक्टरवर मूग...

शिरूर अनंतपाळ तालुक्यात यंदा मुगाचा पेरा घटला असून, एकूण लागवडीच्या केवळ ३२३ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली आहे. उडिदाचे क्षेत्र त्यापेक्षा कमी झाले असून, केवळ १५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरा कमी आणि उत्पादनात घट आल्याने शेतकरी हतबल होत आहेत.

शेतकरी झाले हतबल...

तालुक्यातील विविध गावांमध्ये सध्या मूग, उडिदाच्या राशी सुरू झाल्या आहेत. दरम्यान, तालुका कृषी कार्यालय आणि पीक विमा कंपनीच्यावतीने सावरगाव येथील शेतकरी राजेंद्र माने यांच्या शेतात पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. यावेळी एकरी २ क्विंटल ३६५ ग्रॅमचा उतारा आला आहे. सरासरी उत्पादनात ४० टक्क्यांची घट झाली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पेरणीसाठी झालेल्या लागवडीचा खर्चही पदरी पडत नसल्याचे शेतकरी राजेंद्र माने, कल्याणराव बिरादार, योगेश बिरादार, सीताराम पाटील, बालाजी बिरादार, शिवाजीराव बिरादार यांनी सांगितले.

सरसकट पीक विमा लागू करावा...

खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीनचे पीक बहरले असताना ऐन फुल-फळ धारणेच्या कालावधीत पावसाने जवळपास महिनाभर ताण दिल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे सरसकट पीक विमा लागू करण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.