शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

ओला दुष्काळ जाहीर करा; छावाचा रास्तारोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2022 12:11 IST

अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष दास साळुंके व माजी सरपंच ज्ञानेश्वर पिंड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे.

लातूर : ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी सकाळपासून लातूर- जहिराबाद महामार्गावरील मसलगा (ता. निलंगा) येथे छावा संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे.

अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष दास साळुंके व माजी सरपंच ज्ञानेश्वर पिंड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. लातूर- जहिराबाद महामार्गालगतच्या गावांत जाण्यासाठी रस्त्यांचे अर्धवट काम राहिल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे काही जणांचा बळी गेला आहे. ही अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करावीत. महामार्गालगत प्रत्येक गावाच्या बाजूस बसथांबा तयार करण्यात आला आहे. परंतु, तिथे प्रवाशांना थांबण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली नाही. ती उपलब्ध करावी.

प्रत्येक गावाजवळील पथदिवे सुरु करावेत. अर्धवट कामामुळे अपघात होऊन मयत झालेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून ५ लाख द्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी हे रास्तारोको आंदोलन सुरु आहे. यावेळी छावा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित आहेत. आंदोलनस्थळी जोरदार घोषणा देण्यात येत आहेत.