शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

विद्यार्थिनीचा मृत्यू; मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल

By admin | Updated: February 14, 2017 21:38 IST

इयत्ता दहावीत शिकणाऱ्या बालिका विनायक चिकटे या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात

ऑनलाइन लोकमत  लातूर, दि. 14 -  रेणापूर तालुक्यातील बावची येथील समाजकल्याण विभागाच्या निवासी शाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या बालिका विनायक चिकटे (१६, रा. हाडोळी बेलगाव ता. चाकूर) या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात विनायक चिकटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस. पांचाळ यांच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावची (ता. रेणापूर) येथे समाजकल्याण विभागाच्या वतीने मुलींची निवासी शाळा चालविली जाते. या शाळेत १७५ मुली सध्या शिक्षण घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बालिका चिकटे या विद्यार्थिनीला ताप, मळमळ आणि उलट्या होत होत्या. दरम्यान, शाळेतील कर्मचाऱ्यांनी बालिका हिला रेणापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर रविवारी पहाटे अचानक बालिकाची तब्येत बिघडली. तातडीने रेणापूर रुग्णालयात बालिका हिला दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी लातूरला हलविण्यास सांगितले. लातूर येथे बालिका चिकटेचा मृत्यू झाला. या प्रकरणी बालिकाचे वडील विनायक देवीदास चिकटे यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. माझ्या मुलीच्या मरणास जबाबदार असणाऱ्या मुख्याध्यापिका एस.एस. पांचाळ यांच्यावर गुन्हा दाखल करून अधीक्षक, समाजकल्याण आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी रेणापूर पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापिकेविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.