शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

राजीव सातव यांच्या निधनाने तरुण संघटक हरवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:17 IST

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या राजीव सातव यांची देशपातळीवर छाप होती. उत्कृष्ट संसदपटू म्हणून केंद्र सरकारने त्यांचा गौरव ...

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या राजीव सातव यांची देशपातळीवर छाप होती. उत्कृष्ट संसदपटू म्हणून केंद्र सरकारने त्यांचा गौरव केला होता. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा. सातव यांच्या अकाली निधनाचे दु:ख वेदनादायी आहे. त्यांच्या रुपात काँग्रेस पक्षाने एक तरुण व कर्तबगार नेतृत्व गमावले. यात पक्षाची मोठी हानी झाली आहे. जिल्हा पातळीपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत मोठी झेप घेणाऱ्या या उमद्या नेत्याबद्दल संपूर्ण देशाला कुतूहल होते. महाराष्ट्रासाठी तर ते अभिमान होते. त्यांच्या जाण्याने ग्रामीण भागातील विकासात्मक तरुण चेहऱ्याला काँग्रेस मुकली आहे. त्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली.

- माजी मंत्री दिलीपराव देशमुख

उमद्या मनाचा सहकारी गमावला

काँग्रेसचे नेते खा. राजीव सातव यांचे निधन ही अतिशय दु:खद घटना आहे. काँग्रेस पक्षाचा युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. आपल्या मितभाषी स्वभावाने त्यांनी सर्वांच्या मनात घर केले होते. युवक काँग्रेसमध्ये काम करीत असताना त्यांचे मार्गदर्शन सतत लाभत असे. त्यांच्या अकाली निधनाने एका उमद्या मनाच्या सहकाऱ्यास आपण मुकलो आहोत. - आ. धीरज देशमुख

मराठवाड्याचा कर्तबगार नेता

पंचायत समिती ते संसदेपर्यंत यशस्वी प्रवास करणारे खा. राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षात विविध जबाबदाऱ्या पार पाडत राज्यातच नव्हे, तर देशात आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली. मितभाषी, कुशल संघटक व दूरदृष्टीचे नेतृत्व होते. अत्यंत कमी वयात त्यांनी राष्ट्रीय पातळीवर यशस्वीपणे काम केले. माझे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध होते. त्यांच्या निधनामुळे राज्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्याचा कर्तबगार नेता आपण गमावला.

- माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर

उत्कृष्ट संसदपटू अशी ओळख

खा. राजीव सातव यांचा उत्कृष्ट संसदपटू म्हणून केंद्र शासनाने गौरव केला होता. मराठवाड्यातून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आपल्या कार्यातून ओळख निर्माण केली होती. गांधी कुटुंबियांशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे मराठवाडा व राज्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. भविष्यातील काँग्रेसचे ते युवा नेते होते. त्यांच्या निधनाने मराठवाड्याचा हिरा गमावला. - श्रीशैल उटगे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस