शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

राजीव सातव यांच्या निधनाने तरुण संघटक हरवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:17 IST

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या राजीव सातव यांची देशपातळीवर छाप होती. उत्कृष्ट संसदपटू म्हणून केंद्र सरकारने त्यांचा गौरव ...

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या राजीव सातव यांची देशपातळीवर छाप होती. उत्कृष्ट संसदपटू म्हणून केंद्र सरकारने त्यांचा गौरव केला होता. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा. सातव यांच्या अकाली निधनाचे दु:ख वेदनादायी आहे. त्यांच्या रुपात काँग्रेस पक्षाने एक तरुण व कर्तबगार नेतृत्व गमावले. यात पक्षाची मोठी हानी झाली आहे. जिल्हा पातळीपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत मोठी झेप घेणाऱ्या या उमद्या नेत्याबद्दल संपूर्ण देशाला कुतूहल होते. महाराष्ट्रासाठी तर ते अभिमान होते. त्यांच्या जाण्याने ग्रामीण भागातील विकासात्मक तरुण चेहऱ्याला काँग्रेस मुकली आहे. त्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली.

- माजी मंत्री दिलीपराव देशमुख

उमद्या मनाचा सहकारी गमावला

काँग्रेसचे नेते खा. राजीव सातव यांचे निधन ही अतिशय दु:खद घटना आहे. काँग्रेस पक्षाचा युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. आपल्या मितभाषी स्वभावाने त्यांनी सर्वांच्या मनात घर केले होते. युवक काँग्रेसमध्ये काम करीत असताना त्यांचे मार्गदर्शन सतत लाभत असे. त्यांच्या अकाली निधनाने एका उमद्या मनाच्या सहकाऱ्यास आपण मुकलो आहोत. - आ. धीरज देशमुख

मराठवाड्याचा कर्तबगार नेता

पंचायत समिती ते संसदेपर्यंत यशस्वी प्रवास करणारे खा. राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षात विविध जबाबदाऱ्या पार पाडत राज्यातच नव्हे, तर देशात आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण केली. मितभाषी, कुशल संघटक व दूरदृष्टीचे नेतृत्व होते. अत्यंत कमी वयात त्यांनी राष्ट्रीय पातळीवर यशस्वीपणे काम केले. माझे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध होते. त्यांच्या निधनामुळे राज्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्याचा कर्तबगार नेता आपण गमावला.

- माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर

उत्कृष्ट संसदपटू अशी ओळख

खा. राजीव सातव यांचा उत्कृष्ट संसदपटू म्हणून केंद्र शासनाने गौरव केला होता. मराठवाड्यातून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आपल्या कार्यातून ओळख निर्माण केली होती. गांधी कुटुंबियांशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे मराठवाडा व राज्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. भविष्यातील काँग्रेसचे ते युवा नेते होते. त्यांच्या निधनाने मराठवाड्याचा हिरा गमावला. - श्रीशैल उटगे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस