यावेळी मध्यम प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता विजय हिबार, शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी, राजकुमार तिलमदार, एम.जी. डुब्बे उपस्थित होते. रेणा नदीकाठी पाहणी करताना आ. कराड यांना शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती दिली. विमा कंपनीला ऑनलाइन माहिती देण्यासाठी ॲप चालत नाही. ऑनलाइन माहिती भरता येत नाही. अशा अनेक तक्रारी मांडल्या. शेतकऱ्यांना मदत करण्याच्या आणि नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करावे, अशा सूचना तहसीलदार पाटील, तालुका कृषी अधिकारी नागरगोजे यांना दिल्या.
यावेळी अनिल भिसे, डॉ. बाबासाहेब घुले, दशरथ सरवदे, सतीश आंबेकर, वसंतराव दहिफळे, पंस सभापती रमेश सोनवणे, उपसभापती अनंत चव्हाण, रेणापूरच्या नगराध्यक्षा आरती राठोड, उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, शरद दरेकर, वसंत करमुडे, श्रीकृष्ण पवार, दत्ता सरवदे, उज्ज्वल कांबळे, श्रीकृष्ण मोटेगावकर, गोपाळ शेंडगे, मुन्ना गुरले, रामभाऊ बडे, शिवाजी उपाडे, श्रीकांत सूर्यवंशी, महेश गाडे, महेंद्र गोडभरले, अभिजित मद्दे, राजू आलापुरे, रमा फुलारी, धनंजय म्हेत्रे, मारुती गालफाडे, सतीश कुलकर्णी, भास्कर दहिफळे, रामराव दहिफळे, आबासाहेब चव्हाण, श्रीकृष्ण जाधव, भूषण संपते, रमेश चव्हाण, शालिक गोडभरले, आजिम शेख, अच्युत कातळे, संगमेश्वर तत्तापुरे, राजू अत्तार आदींची उपस्थिती होती.