शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

मांजरात सध्या ४३ टक्के पाणीसाठी; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतरच शेतीला पाणी

By हणमंत गायकवाड | Updated: September 2, 2022 17:01 IST

मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४३७.८० मि.मी. पाऊस झाला आहे.

लातूर : मांजरा प्रकल्पात सद्य:स्थितीत ४३.०५ टक्के जिवंत पाणीसाठा झाला असून, १५ ऑक्टोबरनंतर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतरच प्राप्त पाण्याचा विचार करून शेतीला पाणी सोडण्यासंदर्भातचा निर्णय होणार आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पात ७६.१९० दलघमी पाणीसाठा झाला आहे. शेतीला पाणी मिळण्यासाठी परतीच्या पावसाची वाट पाहावी लागणार आहे. 

मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४३७.८० मि.मी. पाऊस झाला आहे. शिवाय, मांजरा प्रकल्पाच्या वर अप्पर मांजरा प्रकल्प आहे. संगमेश्वर प्रकल्प म्हणून तो ओळखला जातो. या प्रकल्पात सद्य:स्थितीत केवळ २० टक्के पाणीसाठा आहे. हा प्रकल्प भरल्याशिवाय मांजरा धरण भरत नाही. या धरणाच्या अलिकडे पडलेल्या ४३०.८० मि.मी. पावसाच्या पाण्यावरच २८ टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणात पूर्वीचे २० टक्के पाणी आहे. या पाणी संचयामुळे लातूर, एमआयडीसी, कळंब, केज, धारूर, अंबाजोगाई आदी मोठ्या शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पण शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी आणखी धरण भरण्याची गरज आहे. 

डाव्या-उजव्या कालव्यातून शेतीला पाणी...शेतीला चार पाळ्यांसाठी एकूण ८० दलघमी पाणी लागते. पण सध्या धरणातच ७६.१९० दलघमी पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतीला पाणी सोडता येणार नाही. परतीच्या पावसाची वाट पाहावी लागणार आहे. मांजरा प्रकल्पाला दोन कालवे आहेत. उजवा आणि डावा. एका कालव्यातून दहा दलघमी पाणी एका पाळीसाठी सोडले जाते. दोन्ही कालव्यातून एक रोटेशन पूर्ण करण्यासाठी २० दलघमी लागते. अशा चार पाळ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी दिल्या तर ८० दलघमी पाणी लागते.

गतवर्षी ६० दलघमी पाणी दिले शेतीला...गतवर्षी ६० दलघमी पाणी शेतीसाठी सोडण्यात आले होते. ७५ टक्क्यांच्या वर धरण भरले होते. त्यामुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होऊन ६० दलघमी पाणी शेतीला दिले असल्याची माहिती शाखा अभियंता सूरज निकम यांनी दिली. 

ऑक्टोबरमध्ये सल्लागार समितीची बैठक....मांजरा कालवा सल्लागार समितीची बैठक १५ ऑक्टोबरनंतर होईल. त्यावेळी धरणात असलेले पाणी आणि पिण्यासाठी केलेले आरक्षण विचारात घेऊन शेतीला पाणी देण्यासंदर्भातचा निर्णय होईल. समितीमध्ये लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक आमदार आणि शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असतो.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणlaturलातूरagricultureशेती