शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

मांजरात सध्या ४३ टक्के पाणीसाठी; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतरच शेतीला पाणी

By हणमंत गायकवाड | Updated: September 2, 2022 17:01 IST

मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४३७.८० मि.मी. पाऊस झाला आहे.

लातूर : मांजरा प्रकल्पात सद्य:स्थितीत ४३.०५ टक्के जिवंत पाणीसाठा झाला असून, १५ ऑक्टोबरनंतर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतरच प्राप्त पाण्याचा विचार करून शेतीला पाणी सोडण्यासंदर्भातचा निर्णय होणार आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पात ७६.१९० दलघमी पाणीसाठा झाला आहे. शेतीला पाणी मिळण्यासाठी परतीच्या पावसाची वाट पाहावी लागणार आहे. 

मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४३७.८० मि.मी. पाऊस झाला आहे. शिवाय, मांजरा प्रकल्पाच्या वर अप्पर मांजरा प्रकल्प आहे. संगमेश्वर प्रकल्प म्हणून तो ओळखला जातो. या प्रकल्पात सद्य:स्थितीत केवळ २० टक्के पाणीसाठा आहे. हा प्रकल्प भरल्याशिवाय मांजरा धरण भरत नाही. या धरणाच्या अलिकडे पडलेल्या ४३०.८० मि.मी. पावसाच्या पाण्यावरच २८ टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणात पूर्वीचे २० टक्के पाणी आहे. या पाणी संचयामुळे लातूर, एमआयडीसी, कळंब, केज, धारूर, अंबाजोगाई आदी मोठ्या शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पण शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी आणखी धरण भरण्याची गरज आहे. 

डाव्या-उजव्या कालव्यातून शेतीला पाणी...शेतीला चार पाळ्यांसाठी एकूण ८० दलघमी पाणी लागते. पण सध्या धरणातच ७६.१९० दलघमी पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतीला पाणी सोडता येणार नाही. परतीच्या पावसाची वाट पाहावी लागणार आहे. मांजरा प्रकल्पाला दोन कालवे आहेत. उजवा आणि डावा. एका कालव्यातून दहा दलघमी पाणी एका पाळीसाठी सोडले जाते. दोन्ही कालव्यातून एक रोटेशन पूर्ण करण्यासाठी २० दलघमी लागते. अशा चार पाळ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी दिल्या तर ८० दलघमी पाणी लागते.

गतवर्षी ६० दलघमी पाणी दिले शेतीला...गतवर्षी ६० दलघमी पाणी शेतीसाठी सोडण्यात आले होते. ७५ टक्क्यांच्या वर धरण भरले होते. त्यामुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होऊन ६० दलघमी पाणी शेतीला दिले असल्याची माहिती शाखा अभियंता सूरज निकम यांनी दिली. 

ऑक्टोबरमध्ये सल्लागार समितीची बैठक....मांजरा कालवा सल्लागार समितीची बैठक १५ ऑक्टोबरनंतर होईल. त्यावेळी धरणात असलेले पाणी आणि पिण्यासाठी केलेले आरक्षण विचारात घेऊन शेतीला पाणी देण्यासंदर्भातचा निर्णय होईल. समितीमध्ये लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक आमदार आणि शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असतो.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणlaturलातूरagricultureशेती