शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मांजरात सध्या ४३ टक्के पाणीसाठी; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतरच शेतीला पाणी

By हणमंत गायकवाड | Updated: September 2, 2022 17:01 IST

मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४३७.८० मि.मी. पाऊस झाला आहे.

लातूर : मांजरा प्रकल्पात सद्य:स्थितीत ४३.०५ टक्के जिवंत पाणीसाठा झाला असून, १५ ऑक्टोबरनंतर कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतरच प्राप्त पाण्याचा विचार करून शेतीला पाणी सोडण्यासंदर्भातचा निर्णय होणार आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पात ७६.१९० दलघमी पाणीसाठा झाला आहे. शेतीला पाणी मिळण्यासाठी परतीच्या पावसाची वाट पाहावी लागणार आहे. 

मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४३७.८० मि.मी. पाऊस झाला आहे. शिवाय, मांजरा प्रकल्पाच्या वर अप्पर मांजरा प्रकल्प आहे. संगमेश्वर प्रकल्प म्हणून तो ओळखला जातो. या प्रकल्पात सद्य:स्थितीत केवळ २० टक्के पाणीसाठा आहे. हा प्रकल्प भरल्याशिवाय मांजरा धरण भरत नाही. या धरणाच्या अलिकडे पडलेल्या ४३०.८० मि.मी. पावसाच्या पाण्यावरच २८ टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणात पूर्वीचे २० टक्के पाणी आहे. या पाणी संचयामुळे लातूर, एमआयडीसी, कळंब, केज, धारूर, अंबाजोगाई आदी मोठ्या शहरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पण शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी आणखी धरण भरण्याची गरज आहे. 

डाव्या-उजव्या कालव्यातून शेतीला पाणी...शेतीला चार पाळ्यांसाठी एकूण ८० दलघमी पाणी लागते. पण सध्या धरणातच ७६.१९० दलघमी पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतीला पाणी सोडता येणार नाही. परतीच्या पावसाची वाट पाहावी लागणार आहे. मांजरा प्रकल्पाला दोन कालवे आहेत. उजवा आणि डावा. एका कालव्यातून दहा दलघमी पाणी एका पाळीसाठी सोडले जाते. दोन्ही कालव्यातून एक रोटेशन पूर्ण करण्यासाठी २० दलघमी लागते. अशा चार पाळ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी दिल्या तर ८० दलघमी पाणी लागते.

गतवर्षी ६० दलघमी पाणी दिले शेतीला...गतवर्षी ६० दलघमी पाणी शेतीसाठी सोडण्यात आले होते. ७५ टक्क्यांच्या वर धरण भरले होते. त्यामुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होऊन ६० दलघमी पाणी शेतीला दिले असल्याची माहिती शाखा अभियंता सूरज निकम यांनी दिली. 

ऑक्टोबरमध्ये सल्लागार समितीची बैठक....मांजरा कालवा सल्लागार समितीची बैठक १५ ऑक्टोबरनंतर होईल. त्यावेळी धरणात असलेले पाणी आणि पिण्यासाठी केलेले आरक्षण विचारात घेऊन शेतीला पाणी देण्यासंदर्भातचा निर्णय होईल. समितीमध्ये लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक आमदार आणि शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असतो.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणlaturलातूरagricultureशेती