शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

अल्प पाण्यावर फुलविली हिरव्या मिरची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:20 IST

निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील प्रयाेगशील शेतकरी राम कावले यांना जेमतेम एक एकर शेती आहे. वडिलोपार्जित शेती प्रत्येक वर्षी ...

निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील प्रयाेगशील शेतकरी राम कावले यांना जेमतेम एक एकर शेती आहे. वडिलोपार्जित शेती प्रत्येक वर्षी उन्हाळ्या कोणतेही पीक घेतले जात नव्हते. यंदा मात्र, त्यांनी योग्य व्यवस्थापन व नियोजन करून मिरचीचे उत्पादन घ्यायचे ठरवले.

त्यासाठी जुन्या विहिरीतील गाळ काढून पाण्याची व्यवस्था करण्यात आली. एक एकर जागेत ठिंबकद्वारे पाण्याची व्यवस्था केली. सरी पाडण्यात आल्या, मल्चिंग पेपरचा उपयोग करत १० हजार मिरची रोपांची लागवड करण्यात आली. पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने बांधालगत त्यांनी पाण्यासाठी माेठा हौद बांधला. या हाैदातील पाणी लागेल तेव्हा वापरण्याची सुविधा उपल्ब्ध केली. सदरचे पाणी देत उन्हाळ्यात मिरचीची शेती फुलविली. खत, फवारणी, खुरपणी त्याचबराेबर योग्य खताची मात्रा दिली. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांकडून माहिती मिळवून हा पहिला प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे. सध्याला प्रत्येक एका झाडाची उंची चार फूट आहे. एका झाडाला १२५ ते १५० मिरची लगडली आहे. एका एकरात जवळपास दीड ते दोन लाखांची मिरची हाेणार असल्याचे सांगण्यात आले. चार दिवसांत मिरचीचा पहिली तोड होणार आहे.

काेराेना काळाची फलनिष्पत्ती...

राम कावले हे कामाच्या शाेधासाठी एका कंपनीत दाखल झाले हाेते. दरम्यान, कंपनीत कामावर लागताच काेराेनाचा काळा सुरु झाला. गत मार्चमध्ये लाॅकडाऊन जाहीर झाल्याने पुन्हा घराचा रस्ता धरावा लागला. खचून न जाता वडिलोपार्जित एक एकर शेतीत चांगले उत्पन्न घ्यावे, हा निश्चय करुन मिरचीची लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यातून चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा त्यांना सध्याला आहे. काेराेनाच्या काळात खचून न जाता, आपल्या हाती आहे त्या साधनांचा, शेतीचा, अवजारांचा उपयाेग करुन, संकटावर मात करता येइल, याचा आदर्श वस्तूपाळच शेतकरी राम कावले यांनी घालून दिला आहे. त्यांच्यासाठी काेराेनाचा काळ एक संधी ठरला आहे.

कर्जापाेटी साेडले हाेते गाव...

राम कावले म्हणाले, डोक्यावर बँकेचे कर्ज होते. यासाठीच लॉकडाऊनपूर्वी कंपनीत काम करावे, असे ठरवत गाव साेडले हाेते. मात्र, काेराेनाच्या महामारीने पुन्हा गावचाच रस्ता धरायला भाग पाडले. काेराेनाच्या लॉकडाऊनमुळे कंपनीतील लागलेले काम गेले. शेवटी खचून न जाता गावाकडे आलाे. वडिलांची असलेली एक एकर शेतीत काही तरी प्रयाेग करण्याचा निर्धार केला. आजा नियाेजन आणि आहे त्या अल्प पाण्याचे केलेल्या व्यवस्थापनातून हिरवी मिरची बहरली आहे.